शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

सव्वाकोटी रुपये थकित

By admin | Updated: July 20, 2014 00:32 IST

विठ्ठल कटके , रेणापूर राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत गेल्या वर्षी तालुक्यातील १ हजार २०० शेतकऱ्यांनी स्वखर्चातून ठिबक व तुषार संच खरेदी केले़

विठ्ठल कटके , रेणापूरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत गेल्या वर्षी तालुक्यातील १ हजार २०० शेतकऱ्यांनी स्वखर्चातून ठिबक व तुषार संच खरेदी केले़ परंतु, यातील ९०० शेतकऱ्यांचे जवळपास सव्वाकोटी रूपयांचे अनुदान थकित राहिल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत़ अनुदानासाठी दररोज तालुका कृषी कार्यालयाकडे हेलपाटे मारत आहेत़केंद्र व राज्य शासनाकडून अल्पभूधारक व बहुभूधारक शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन योजना आहे़ या योजनेअंतर्गत ठिबक व तुषार संचासाठी अल्पभुधारकांना ६० टक्के तर बहुभूधारकांना पन्नास टक्के अनुदान दिले जाते़ रेणापूर तालुक्यातून सन २०१२-१३ या वर्षात ठिबक व तुषार संच खरेदीसाठी एकूण १ हजार २०५ शेतकऱ्यांनी तालुका कृषी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केले़ त्यातील ९ प्रस्ताव कृषी खात्याने नाकारून १ हजार १९६ प्रस्ताव अनुदानासाठी पात्र ठरविले़ मंजुरी मिळाल्यानंतर केंद्र व राज्य शासनाचे अनुदान मिळेल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी १ लाख ते २ लाख रुपये स्वत: खर्च केला़ या प्रस्तावापैकी शासनाकडून २७४ शेतकऱ्यांना सन १०१२-१३ मध्ये ७२ लाख ३५ हजार ६०३ रूपयांचे अनुदान अदा करण्यात आले़त्यानंतर तालुका कृषी विभागाने ९२२ प्रस्तावांना पूर्वसंमती दिली. त्यांची तपासणी करून सर्व प्रस्ताव लातूरच्या उपविभागीय कृषी कार्यालयाकडे पाठविले़ परंतु, या शेतकऱ्यांचे केंद्र शासनाचे एक कोटी दहा लाख व राज्य शासनाचे २८ लाख असे एकूण १ कोटी ३८ लाख रूपये अनुदान अद्याप मिळाले नाही़ अनुदान मिळावे म्हणून शेतकरी एक वर्षापासून तालुका कृषी कार्यालयाकडे खेटे घालत आहेत़ अनुदान मिळेल या अपेक्षेने या शेतकऱ्यांनी खाजगी सावकारांकडून बँकेकडून कर्ज काढून ठिबक व तुषार संच खरेदी करून त्याचा वापर सुरू केला़ परंतु, अनुदान रखडल्यामुळे हे सर्व शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत़ हे अनुदान लवकर देण्याची मागणी होत आहे़ शेतकरी आर्थिक संकटात़़़या योजनेअंतर्गत दोन एकरावर स्वत:चे ९० हजार रूपये खर्चून ठिबक संच बसविला़ सव्वा इंच बोअरच्या पाण्यावर बागायती शेती करण्याचे धाडस केले़ परंतु, निसर्गाची अवकृपा व शासनाकडून अनुदान न मिळाल्याने आर्थिक अडचणीत सापडल्याचे कामखेडा येथील दिगंबर गिरी या शेतकऱ्याने सांगितले़सन २०१२-१३ वर्षात तालुक्यात या योजनेतंर्गत २७४ शेतकऱ्यांना ७२ लाख ३५ हजार ६०३ रूपयांचे अनुदान अदा करण्यात आले़ उर्वरित ९२२ शेतकऱ्यांचे जवळपास १ कोटी ३८ लाख रूपयांचे अनुदान रखडले आहे़ शासनाकडून अनुदान मिळताच ते वाटप करण्यात येईल, असे तालुका कृषी अधिकारी देवेंद्र जाधव यांनी सांगितले़