शहरं
Join us  
Trending Stories
1
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
2
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
3
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
5
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
6
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
7
मोठी बातमी! मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटातील १२ दोषींची निर्दोष मुक्तता, राज्य सरकारला दणका
8
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल
9
छावा संघटना मारहाण: राष्ट्रवादीचे युवा शाखेचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण फरार; ११ जणांवर गुन्हा दाखल
10
राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल; छावा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण प्रकरणी कारवाई
11
हा हल्ला पूर्वनियोजित, सुनील तटकरेंच्या सांगण्यावरून...; विजय घाडगे पाटलांचा मोठा दावा
12
भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम...
13
छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणी सूरज चव्हाण यांनी मागितली माफी, म्हणाले...
14
Vi युझर्ससाठी महत्त्वाची बातमी, स्वस्त रिचार्ज प्लान्समध्ये केले बदल; Airtel आणि Jio काय करणार?
15
IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग
16
Stock Market Today: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Bank Nifty सुस्साट, 'या' शेअर्समध्ये तेजी
17
जडीबुटी विकणाऱ्या दोन साधूंना मुले चोरणारे समजून मारहाण; थोडक्यात टळली पालघर घटनेची पुनरावृत्ती
18
ना साईड बिझनेस, ना शेअर बाजाराच्या टीप्स; ४५ व्या वर्षी ₹४.७ कोटींसोबत होऊ शकता रिटायर, काय आहे ‘सिक्रेट प्लान’
19
तयार रहा...! पेट्रोल, डिझेलच्या किंमती ८-१० रुपयांनी वाढण्याची शक्यता; भारत ट्रम्प यांच्या डोळ्यात खुपतोय...
20
सोनिया गांधींना भेटण्यासाठी जात होतात त्याचे काय? योगेश कदम यांचा उद्धव ठाकरेंना टोला

सव्वाकोटी रुपये थकित

By admin | Updated: July 20, 2014 00:32 IST

विठ्ठल कटके , रेणापूर राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत गेल्या वर्षी तालुक्यातील १ हजार २०० शेतकऱ्यांनी स्वखर्चातून ठिबक व तुषार संच खरेदी केले़

विठ्ठल कटके , रेणापूरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत गेल्या वर्षी तालुक्यातील १ हजार २०० शेतकऱ्यांनी स्वखर्चातून ठिबक व तुषार संच खरेदी केले़ परंतु, यातील ९०० शेतकऱ्यांचे जवळपास सव्वाकोटी रूपयांचे अनुदान थकित राहिल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत़ अनुदानासाठी दररोज तालुका कृषी कार्यालयाकडे हेलपाटे मारत आहेत़केंद्र व राज्य शासनाकडून अल्पभूधारक व बहुभूधारक शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन योजना आहे़ या योजनेअंतर्गत ठिबक व तुषार संचासाठी अल्पभुधारकांना ६० टक्के तर बहुभूधारकांना पन्नास टक्के अनुदान दिले जाते़ रेणापूर तालुक्यातून सन २०१२-१३ या वर्षात ठिबक व तुषार संच खरेदीसाठी एकूण १ हजार २०५ शेतकऱ्यांनी तालुका कृषी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केले़ त्यातील ९ प्रस्ताव कृषी खात्याने नाकारून १ हजार १९६ प्रस्ताव अनुदानासाठी पात्र ठरविले़ मंजुरी मिळाल्यानंतर केंद्र व राज्य शासनाचे अनुदान मिळेल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी १ लाख ते २ लाख रुपये स्वत: खर्च केला़ या प्रस्तावापैकी शासनाकडून २७४ शेतकऱ्यांना सन १०१२-१३ मध्ये ७२ लाख ३५ हजार ६०३ रूपयांचे अनुदान अदा करण्यात आले़त्यानंतर तालुका कृषी विभागाने ९२२ प्रस्तावांना पूर्वसंमती दिली. त्यांची तपासणी करून सर्व प्रस्ताव लातूरच्या उपविभागीय कृषी कार्यालयाकडे पाठविले़ परंतु, या शेतकऱ्यांचे केंद्र शासनाचे एक कोटी दहा लाख व राज्य शासनाचे २८ लाख असे एकूण १ कोटी ३८ लाख रूपये अनुदान अद्याप मिळाले नाही़ अनुदान मिळावे म्हणून शेतकरी एक वर्षापासून तालुका कृषी कार्यालयाकडे खेटे घालत आहेत़ अनुदान मिळेल या अपेक्षेने या शेतकऱ्यांनी खाजगी सावकारांकडून बँकेकडून कर्ज काढून ठिबक व तुषार संच खरेदी करून त्याचा वापर सुरू केला़ परंतु, अनुदान रखडल्यामुळे हे सर्व शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत़ हे अनुदान लवकर देण्याची मागणी होत आहे़ शेतकरी आर्थिक संकटात़़़या योजनेअंतर्गत दोन एकरावर स्वत:चे ९० हजार रूपये खर्चून ठिबक संच बसविला़ सव्वा इंच बोअरच्या पाण्यावर बागायती शेती करण्याचे धाडस केले़ परंतु, निसर्गाची अवकृपा व शासनाकडून अनुदान न मिळाल्याने आर्थिक अडचणीत सापडल्याचे कामखेडा येथील दिगंबर गिरी या शेतकऱ्याने सांगितले़सन २०१२-१३ वर्षात तालुक्यात या योजनेतंर्गत २७४ शेतकऱ्यांना ७२ लाख ३५ हजार ६०३ रूपयांचे अनुदान अदा करण्यात आले़ उर्वरित ९२२ शेतकऱ्यांचे जवळपास १ कोटी ३८ लाख रूपयांचे अनुदान रखडले आहे़ शासनाकडून अनुदान मिळताच ते वाटप करण्यात येईल, असे तालुका कृषी अधिकारी देवेंद्र जाधव यांनी सांगितले़