शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

सव्वाकोटी रुपये थकित

By admin | Updated: July 20, 2014 00:32 IST

विठ्ठल कटके , रेणापूर राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत गेल्या वर्षी तालुक्यातील १ हजार २०० शेतकऱ्यांनी स्वखर्चातून ठिबक व तुषार संच खरेदी केले़

विठ्ठल कटके , रेणापूरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत गेल्या वर्षी तालुक्यातील १ हजार २०० शेतकऱ्यांनी स्वखर्चातून ठिबक व तुषार संच खरेदी केले़ परंतु, यातील ९०० शेतकऱ्यांचे जवळपास सव्वाकोटी रूपयांचे अनुदान थकित राहिल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत़ अनुदानासाठी दररोज तालुका कृषी कार्यालयाकडे हेलपाटे मारत आहेत़केंद्र व राज्य शासनाकडून अल्पभूधारक व बहुभूधारक शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन योजना आहे़ या योजनेअंतर्गत ठिबक व तुषार संचासाठी अल्पभुधारकांना ६० टक्के तर बहुभूधारकांना पन्नास टक्के अनुदान दिले जाते़ रेणापूर तालुक्यातून सन २०१२-१३ या वर्षात ठिबक व तुषार संच खरेदीसाठी एकूण १ हजार २०५ शेतकऱ्यांनी तालुका कृषी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केले़ त्यातील ९ प्रस्ताव कृषी खात्याने नाकारून १ हजार १९६ प्रस्ताव अनुदानासाठी पात्र ठरविले़ मंजुरी मिळाल्यानंतर केंद्र व राज्य शासनाचे अनुदान मिळेल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी १ लाख ते २ लाख रुपये स्वत: खर्च केला़ या प्रस्तावापैकी शासनाकडून २७४ शेतकऱ्यांना सन १०१२-१३ मध्ये ७२ लाख ३५ हजार ६०३ रूपयांचे अनुदान अदा करण्यात आले़त्यानंतर तालुका कृषी विभागाने ९२२ प्रस्तावांना पूर्वसंमती दिली. त्यांची तपासणी करून सर्व प्रस्ताव लातूरच्या उपविभागीय कृषी कार्यालयाकडे पाठविले़ परंतु, या शेतकऱ्यांचे केंद्र शासनाचे एक कोटी दहा लाख व राज्य शासनाचे २८ लाख असे एकूण १ कोटी ३८ लाख रूपये अनुदान अद्याप मिळाले नाही़ अनुदान मिळावे म्हणून शेतकरी एक वर्षापासून तालुका कृषी कार्यालयाकडे खेटे घालत आहेत़ अनुदान मिळेल या अपेक्षेने या शेतकऱ्यांनी खाजगी सावकारांकडून बँकेकडून कर्ज काढून ठिबक व तुषार संच खरेदी करून त्याचा वापर सुरू केला़ परंतु, अनुदान रखडल्यामुळे हे सर्व शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत़ हे अनुदान लवकर देण्याची मागणी होत आहे़ शेतकरी आर्थिक संकटात़़़या योजनेअंतर्गत दोन एकरावर स्वत:चे ९० हजार रूपये खर्चून ठिबक संच बसविला़ सव्वा इंच बोअरच्या पाण्यावर बागायती शेती करण्याचे धाडस केले़ परंतु, निसर्गाची अवकृपा व शासनाकडून अनुदान न मिळाल्याने आर्थिक अडचणीत सापडल्याचे कामखेडा येथील दिगंबर गिरी या शेतकऱ्याने सांगितले़सन २०१२-१३ वर्षात तालुक्यात या योजनेतंर्गत २७४ शेतकऱ्यांना ७२ लाख ३५ हजार ६०३ रूपयांचे अनुदान अदा करण्यात आले़ उर्वरित ९२२ शेतकऱ्यांचे जवळपास १ कोटी ३८ लाख रूपयांचे अनुदान रखडले आहे़ शासनाकडून अनुदान मिळताच ते वाटप करण्यात येईल, असे तालुका कृषी अधिकारी देवेंद्र जाधव यांनी सांगितले़