शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

७०४ ग्रा़पं़मध्ये पाणी साठवा गाव वाचवा अभियान

By admin | Updated: July 4, 2014 00:10 IST

परभणी : जिल्हा परिषदेच्या ग्रामविकास व संबंधित विभागाच्या वतीने पाणी साठवा गाव वाचवा हे अभियान ७०४ ग्रामपंचायतीमध्ये राबविण्यात येणार आहे.

परभणी : ग्रामीण भागात पडलेल्या पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरविण्यासाठी व गावात पडलेला पाऊस साठवून पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामविकास व संबंधित विभागाच्या वतीने पाणी साठवा गाव वाचवा हे अभियान ७०४ ग्रामपंचायतीमध्ये राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचायतींना या अभियानात सहभागी करून घेण्यात येणार आहे. त्यासाठी पाणी साठवा गाव वाचवा हे अभियान १५ जून ते १५ आॅक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. ग्रामपंचायतींना प्रोत्साहन देण्यासाठी तालुका व जिल्हास्तरावर स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. यासाठी ग्रामपंचायतींनी भौगोलिक रचना, भूगर्भस्तर आणि भूजल पातळीच्या क्षमतेनुसार केलेल्या कामाचा तपशिलासह आपले अर्ज ३१ डिसेंबरपर्यंत पंचायत समितीकडे सादर करावयाचे आहेत. पंचायत समितीने निवड समितीद्वारे अर्जाची छानणी करून प्रत्यक्षात झालेल्या कामाची पाहणी करून उत्कृष्ट व पात्र ग्रामपंचायतीचे अर्ज जिल्हास्तरीय स्पर्धेकरीता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे ३१ जानेवारीपर्यंत पाठवावेत. जिल्ह्यातील प्राप्त झालेल्या अर्जाची छानणी करून जिल्हास्तरीय सहनियंत्रण समितीच्या मान्यतेने १५ फेब्रुवारीपर्यंत जिल्हास्तरावरील उत्कृष्ट ग्रामपंचायतीची निवड करण्यात येणार आहे. या स्पर्धेत तालुका व जिल्हास्तरीय विजयी ग्रा.पं.ला प्रथम, द्वितीय, तृतीय प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. पाणी साठवा गाव वाचवा या अभिनव स्पर्धात्मक योजनेत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींंनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष डुमरे, पंचायत विभागाचे उपविभागीय अधिकारी एम.व्ही. करडखेडकर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)सहनियंत्रण समिती गठीतनिसर्गाचा असमतोल आणि पाणी व्यवस्थापनाच्या अभावामुळे ग्रामीण जनतेत नेहमीच पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी शासनाने ग्रामीण भागामध्ये जलसंधारण व पाणीपुरवठ्यासंबंधी विविध विभागाच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या योजनेच्या अंमलबजावणसाठी ‘पाणी साठवा गाव वाचवा’ या कार्यक्रामाच्या माध्यमातून योग्य समन्वय साधून पाऊस पाणी संकलन, भूजल पातळीची वाढ, पाणी व्यवस्थापन या प्रमुख बाबीवर ग्रामपंचायतींना सहभागी करून घेऊन काम करून घेण्यात येणार आहे. अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरावर ग्रामविकास मंत्री, जिल्हास्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी, तालुकास्तरावर गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सहनियंत्रण समिती गठीत करण्यात येणार आहेत