शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
4
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
5
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
6
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
7
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
8
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
9
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
10
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
11
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
12
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
13
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
14
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
15
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
16
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
17
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
18
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
19
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
20
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!

७०४ ग्रा़पं़मध्ये पाणी साठवा गाव वाचवा अभियान

By admin | Updated: July 4, 2014 00:10 IST

परभणी : जिल्हा परिषदेच्या ग्रामविकास व संबंधित विभागाच्या वतीने पाणी साठवा गाव वाचवा हे अभियान ७०४ ग्रामपंचायतीमध्ये राबविण्यात येणार आहे.

परभणी : ग्रामीण भागात पडलेल्या पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरविण्यासाठी व गावात पडलेला पाऊस साठवून पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामविकास व संबंधित विभागाच्या वतीने पाणी साठवा गाव वाचवा हे अभियान ७०४ ग्रामपंचायतीमध्ये राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचायतींना या अभियानात सहभागी करून घेण्यात येणार आहे. त्यासाठी पाणी साठवा गाव वाचवा हे अभियान १५ जून ते १५ आॅक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. ग्रामपंचायतींना प्रोत्साहन देण्यासाठी तालुका व जिल्हास्तरावर स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. यासाठी ग्रामपंचायतींनी भौगोलिक रचना, भूगर्भस्तर आणि भूजल पातळीच्या क्षमतेनुसार केलेल्या कामाचा तपशिलासह आपले अर्ज ३१ डिसेंबरपर्यंत पंचायत समितीकडे सादर करावयाचे आहेत. पंचायत समितीने निवड समितीद्वारे अर्जाची छानणी करून प्रत्यक्षात झालेल्या कामाची पाहणी करून उत्कृष्ट व पात्र ग्रामपंचायतीचे अर्ज जिल्हास्तरीय स्पर्धेकरीता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे ३१ जानेवारीपर्यंत पाठवावेत. जिल्ह्यातील प्राप्त झालेल्या अर्जाची छानणी करून जिल्हास्तरीय सहनियंत्रण समितीच्या मान्यतेने १५ फेब्रुवारीपर्यंत जिल्हास्तरावरील उत्कृष्ट ग्रामपंचायतीची निवड करण्यात येणार आहे. या स्पर्धेत तालुका व जिल्हास्तरीय विजयी ग्रा.पं.ला प्रथम, द्वितीय, तृतीय प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. पाणी साठवा गाव वाचवा या अभिनव स्पर्धात्मक योजनेत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींंनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष डुमरे, पंचायत विभागाचे उपविभागीय अधिकारी एम.व्ही. करडखेडकर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)सहनियंत्रण समिती गठीतनिसर्गाचा असमतोल आणि पाणी व्यवस्थापनाच्या अभावामुळे ग्रामीण जनतेत नेहमीच पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी शासनाने ग्रामीण भागामध्ये जलसंधारण व पाणीपुरवठ्यासंबंधी विविध विभागाच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या योजनेच्या अंमलबजावणसाठी ‘पाणी साठवा गाव वाचवा’ या कार्यक्रामाच्या माध्यमातून योग्य समन्वय साधून पाऊस पाणी संकलन, भूजल पातळीची वाढ, पाणी व्यवस्थापन या प्रमुख बाबीवर ग्रामपंचायतींना सहभागी करून घेऊन काम करून घेण्यात येणार आहे. अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरावर ग्रामविकास मंत्री, जिल्हास्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी, तालुकास्तरावर गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सहनियंत्रण समिती गठीत करण्यात येणार आहेत