शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

४० गावांच्या अभिलेखांचे जतन

By admin | Updated: April 1, 2015 01:00 IST

लातूर : लातूर जिल्ह्यातील भूमी अभिलेख विभागाने आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगीकार केला आहे़ या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कार्यालयीन गतिमानता आणण्याचे कार्य केले जात आहे़

लातूर : लातूर जिल्ह्यातील भूमी अभिलेख विभागाने आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगीकार केला आहे़ या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कार्यालयीन गतिमानता आणण्याचे कार्य केले जात आहे़ त्या अंतर्गत सर्व्हेनंबरची टीपण, आकार बंद, एकत्रिकरण योजनेचे पुस्तक, पक्का बुक तसेच ब्रिटीश काळातील असणारे ४० गावांचे सर्व जुने अभिलेखांचे स्कॅनिंग एका महिन्यात पूर्ण केले आहे़ तसेच दुसऱ्या टप्प्यात ८९ गावांचे स्कॅनिंगही पूर्ण केले जाणार आहे़लातूर येथील भूमी अभिलेख कार्यालयाने राजीव गांधी प्रशासकीय गतीमानता अभियाना अंतर्गत आपल्या कार्यालयाची गतीमानता वाढवण्यासाठी कार्यालयात आधुनिक तंत्रज्ञानाचा स्विकार केला आहे़ त्यात आॅनलाईन मोजणी प्रणाली, फेरफार करणे, आदी सुविधा नागरिकांना उपलब्ध करून दिल्या आहेत़ शासनाच्या निर्देशानुसार ब्रिटीशकालीन तसेच त्यानंतरचे अभिलेखे जतन करण्याची मोहीम शासनाने हाती घेतली आहे़ या मोहिमेत एका महिन्यात ४० गावांचे जुने अभिलेख्याचे स्कॅनिंग करण्यात आले आहे़ या जुन्या अभिलेखात आकार बंद, एकत्रिकरण योजनेचे पुस्तक,पक्का बुक, आणि टीपण यांचा समावेश आहे़ ११९ गावांचे टीपण या अभिलेख्याचे स्कॅनिंग पूर्ण करण्यात आले आहे़ तर ८९ गावांच्या अभिलेखांचे काम सुरू असून येत्या महिन्यात काम पूर्ण करणार असल्याचे उपअधिक्षक दिनेश ढोकले यांनी सांगीतले़ तसेच १९९४ नंतर सिटीसर्व्हेंचे कार्यालय बंद झाल्यानंतर मागील काही दिवसांत लातूर तालुक्यातील जेवळी व शिरूर अनंतपाळ तालुक्यातील थेरगांवचे मोजणी करून आखिवपत्रीका तयार केले आहे़ (प्रतिनिधी)