शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

महसूलच्या जुन्या कागदपत्रांचे जतन !

By admin | Updated: May 22, 2015 00:34 IST

लातूर : भूमीअभिलेख व महसूलच्या जुन्या तसेच दुर्मिळ कागदपत्रांचे जतन करण्यासाठी स्कॅनिंगचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे

लातूर : भूमीअभिलेख व महसूलच्या जुन्या तसेच दुर्मिळ कागदपत्रांचे जतन करण्यासाठी स्कॅनिंगचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. लातूर जिल्ह्यातील चार केंद्रांवर दर दिवसाला ४ हजार पानांचे स्कॅनिंग केले जात आहे. या सर्व कागदपत्रांचे संकलन जिल्हाधिकारी कार्यालयातील मेटा डाटावर केले जाणार आहे. आतापर्यंत १ लाख ५५ हजार ८०० दस्ताऐवज स्कॅनिंग झाले आहेत.महसूल विभागातील जुने खासरा पाहणी, कुळ रजिस्टर, पाहणी पत्र, सातबारा, फेरफार आदी दस्ताऐवज खराब होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्व कागदपत्रांचे संकलन करून स्कॅनिंग करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील रेणापूर, चाकूर, अहमदपूर, लातूर या चार केंद्रांवर या कागदपत्रांचे स्कॅनिंगचे काम सुरू आहे. तहसील कार्यालयाअंतर्गत १ लाख ५५ हजार ८०० या जुन्या दस्ताऐवजांचे स्कॅनिंग पूर्ण झाले आहे. भूमीअभिलेखाअंतर्गत असलेल्या कब्जा पावती, आकारबंद, जबाब फाईल, पक्का बुक, शेत पुस्तक, गटांचे नकाशे, एकाधिकार योजना, प्रती बुक, आकार फोड आदी जुन्या कागदपत्रांचे जतन करण्यात येत आहेत. या कागदपत्रांचे स्कॅनिंगही सुरू करण्यात आले आहे. ५१ गावांतील रेकॉर्डचे स्कॅनिंग झाले असून, भूमीअभिलेख अंतर्गत ५७ हजार ८६२ दस्ताऐवज स्कॅनिंग झाले आहेत. महसूलच्या १४ तलाठ्यांची टीम या कामी गुंतलेली आहे. चार केंद्रांवर ते काम सुरू आहे. त्यांच्या सोबतीला संगणकावर काम करणारे तज्ज्ञ कर्मचारी नियुक्त केले आहेत. दिवसाला ४ हजार महत्वाची कागदपत्रे स्कॅन केली जात आहेत. महसूलसाठी लातूर तालुक्यातील ५७ गावांची महत्त्वाची कागदपत्रे या मोहिमेत जतन केली जात आहेत.प्रशासकीय कामकाजासाठी जुन्या कागदपत्रांची गरज लागते. त्यामुळे ही महत्वाची कागदपत्रे संगणकात जतन केली जात आहेत. मागचे संदर्भ पाहण्यासाठी या कागदपत्रांची गरज लागते. त्यामुळे जिल्हाभरात ही मोहीम राबविण्यात येत आहे. महिनाभरात सर्व जुने अभिलेखे स्कॅन होतील, अशी माहितीही निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे यांनी दिली. (प्रतिनिधी)स्कॅनिंग झालेली सर्व कागदपत्रे जिल्हाधिकारी कार्यालयातील मेटा डाटा या संगणकीय प्रणालीवर अपलोड करण्यात आली आहेत. स्कॅनिंग केलेल्या कागदपत्रांचे व्यवस्थित प्रिंटिंग येते का, त्याची दुसरी चांगली प्रत संगणकाच्या प्रिंटरमधून बाहेर पडते का, याबाबतची तपासणी करून मेटाडाटा या प्रणालीवर ते लोड करण्यात आले आहेत. दुर्मिळ आणि जीर्ण झालेली कागदपत्रे संगणकीय प्रणालीमुळे जतन करता येत आहेत, असे महसूल विभागाच्या वतीने सांगण्यात आले.महसूलची १ लाख ५५ हजार ८०० आणि भूमीअभिलेख विभागाची ५७ हजार ८६२ महत्वाची कागदपत्रे स्कॅनिंग झाली आहेत. सध्या चाकूर, लातूर, औसा, रेणापूर आणि अहमदपूर येथील केंद्रांवर स्कॅनिंगचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दिवसाला ४ हजार कागदपत्रे स्कॅनिंग केले जात असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे यांनी सांगितले.