शहरं
Join us  
Trending Stories
1
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
2
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
3
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
4
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
5
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
6
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
9
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
10
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
11
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
12
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
13
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
15
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
20
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार

बाजार सावरता सावरेना!

By admin | Updated: December 29, 2016 23:02 IST

लातूर : पाचशे, हजारांच्या नोटा चलनातून रद्द होऊन आता ५० दिवस उलटले आहेत़ मात्र रिझर्व्ह बँकेकडून पुरेसा चलनपुरवठा होत नसल्याने बँका हतबल झाल्या

लातूर : पाचशे, हजारांच्या नोटा चलनातून रद्द होऊन आता ५० दिवस उलटले आहेत़ मात्र रिझर्व्ह बँकेकडून पुरेसा चलनपुरवठा होत नसल्याने बँका हतबल झाल्या असून, चिल्लरचेही वांदेच आहे़ परिणामी, लातूर शहरातील बाजार सावरता सावरत नसल्याचे चित्र आहे़ दरम्यान, गुरूवारी चलन तुटवड्यामुळे काही बँकांच्या एटीएममध्ये खडखडाट होता़ शिवाय, काही बँकांमध्येही पैशाचा तुटवडा असल्याचे सूत्रांनी सांगितले़ पाचशे आणि एक हजारांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयाला पन्नास दिवस पूर्ण झाले आहेत़ चलन टंचाईबरोबरच रोकड टंचाईच्या स्थितीमध्ये फारसी सुधारणा झाली नाही़ काही बँकांच्या एटीएममधून पैसे मिळत असले तरी त्याला मर्यादा आहेत़ दोन हजार रूपयांच्या नव्या नोटेशिवाय पैसे नागरिकांना मिळत नाहीत़ त्यामुळे व्यवहारही ठप्प झाले आहेत़ जेमतेम व्यवहारापुरते हाती चलन खेळत असल्यामुळे मोठे व्यवहार करता येत नसल्याची अडचण निर्माण झाली आहे़ राष्ट्रीयकृत बँकांना पुरेसे चलन वेळेवर मिळत नसल्याने लातूर शहरातील अनेक एटीएममध्ये गुरूवारी खडखडाट होता़ त्यामुळे या एटीएमवरून त्या एटीएमवर पैशाच्या शोधात अनेकजण गुरूवारी फिरताना दिसून आले़ विशेष म्हणजे विद्यार्थी, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांची चलन आणि रोकड टंचाईमुळे आर्थिक कोंडी झाली आहे़ बँक खात्यावर पैसे आहेत, मात्र मोजकेच पैसे एटीएममधून मिळत आहेत़ त्यामुळे दोन हजारांपेक्षा पुढचा व्यवहार करता येत नसल्याचे नागरिकांनी सांगितले़ पन्नास दिवसानंतरही नव्या नोटांबाबत पर्यायी व्यवस्था केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेकडून न झाल्याने अडचणींचा डोंगर दिवसेंदिवस वाढत आहे़