शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान कुठे आहेत? पाकिस्तान संसदेत पीटीआयचा गदारोळ; बहिणी तुरुंगाबाहेच बसून...
2
"२ तारखेपर्यंत मला युती टिकवायचीय"; शिवसेनेसोबतच्या वादावर रविंद्र चव्हाणांचे मोठे राजकीय संकेत...
3
“भाजपा पैसे वाटल्याशिवाय जिंकू शकत नाही, भविष्यात महायुती टिकणार नाही”: विजय वडेट्टीवार
4
ट्रेनमध्ये प्रवास करताना नेटवर्क का जाते? इंटरनेट का होते स्लो? जाणून घ्या 'या' समस्येवरचा उपाय
5
एकपेक्षा जास्त लग्न करणे गुन्हा...'या' राज्यात विधेयक मंजूर; दंडासह कठोर शिक्षेची तरतूद
6
ॲपल अडकली? भारतात ₹३.२० लाख कोटी दंडाची टांगती तलवार; कायदा बदलला अन्...
7
३०० सीट वाढणार, ४ कोच कायमस्वरुपी जोडले जाणार; वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद
8
मन हेलावून टाकणारी घटना...! पती, पत्‍नी, प्रियकर अन् एक अजब करार...! सर्वत्र होतेय चर्चा 
9
टाटा सिएरा खरेच ₹११.४९ लाखांना मिळणार? नेक्सॉन, हॅरिअरलाच खाऊन टाकणार..., हो, नाही...
10
अरेच्चा! भारतीयांना 'हे' शब्द नीट उच्चारताच येत नाही; तुम्ही Croissant, Ghibli चा उच्चार चुकवता?
11
Hong Kong Fire : अग्निकल्लोळ! हाँगकाँगमध्ये इमारतीला कशी लागली एवढी मोठी आग? ५५ जणांचा मृत्यू, २७९ जण बेपत्ता
12
अजय देवगणच्या अश्लील डीपफेकवर दिल्ली हायकोर्टाचा मोठा आदेश, अभिनेत्यालाही केले सवाल
13
घुसखोरांना मतदानाचा अधिकार द्यायचा का? SIR प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाची महत्वपूर्ण टिप्पणी
14
WPL 2026 Auction : होऊ द्या खर्च! मुंबई इंडियन्सनं Amelia Kerr साठी निम्मी पर्स केली रिकामी
15
याला म्हणतात ढासू शेअर...! 5 वर्षांत 2 रुपयांच्या स्टॉकनं केलं करोडपती, दिला 93806.67% चा बंपर परतावा
16
भयानक...! हाँगकाँगच्या गगनचुंबी आगीत अद्याप २७९ हून अधिक लोक बेपत्ता; ५५ मृतदेह सापडले, ७६ गंभीर...
17
वळणावर 'ती' ट्रेन आली अन् होत्याचं नव्हतं झालं; चीनमध्ये रेल्वे अपघातात ११ कर्मचाऱ्यांचा मृत्यू
18
मिठी मारली, कपाळाचं चुंबन घेतलं अन् गळ्यावर फिरवला...; नववधूला प्रियकरानेच क्रूरपणे संपवले!
19
“न्याय मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही”; नीलम गोऱ्हे यांनी घेतली गौरी पालवे कुटुंबीयांची भेट
20
तुमचा पैसा नाही, सन्मान पाहिजे; दिव्यांगांसाठी विशेष शो करा, सुप्रीम कोर्टाचे समय रैनाला आदेश
Daily Top 2Weekly Top 5

‘दिल्ली ते गल्ली’ खड्ड्यातच खरी कमाई; मग खड्डे बुजतीलच कसे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 00:55 IST

दिल्ली ते गल्लीपर्यंत जागोजागी खड्डे पडले आहेत. कारण महानगरपालिका कुठलीही असो, तेथील अधिकारी व नगरसेवकांची खरी कमाई खड्ड्यातच आहे.

प्रशांत तेलवाडकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : दिल्ली ते गल्लीपर्यंत जागोजागी खड्डे पडले आहेत. कारण महानगरपालिका कुठलीही असो, तेथील अधिकारी व नगरसेवकांची खरी कमाई खड्ड्यातच आहे. जनतेची सेवा करणाºया नगरसेवकांना तर पगारही मिळत नाही. निवडणुकीत ओतलेला पैसा मग कुठून काढतील. मग, रस्त्यावर खड्डे पडले नाही तर त्या बिचाºयांची घरे कशी चालतील... जेवढे खड्डे अधिक तेवढी कमाई अधिक... यामुळे कितीही ओरड होवो, आंदोलन होवो, रस्त्यावर खड्डे पडणारच... असा मार्मिक टोला हिंदीतील हास्यकवी सुरेंद्र शर्मा यांनी लगावला.युवक बिरादरीतर्फे आयोजित एलोरा मिलन सोहळ्यानिमित्त सुरेंद्र शर्मा औरंगाबादेत मुक्कामी आले होते. त्यांनी लोकमतच्या प्रतिनिधीशी दीड तास दिलखुलास गप्पा मारल्या. देशातील सद्य:स्थितीचे धीरगंभीरपणे; पण मार्मिक विवेचन त्यांनी केले. ‘मी रचलेले विडंबनपर काव्य चुका करणाºयांना सावध करण्यासाठी असते, त्यांना जखमी करण्यासाठी नव्हे,’ असे म्हणत त्यांनी धर्माच्या नावावर चाललेल्या दुकानदारीच्या विषयाला हात घातला.धर्म को मानते है पर धर्म की नही मानतेकाही लोकांनी धर्माच्या नावावर दुकानदारी सुरू केलीय, या प्रश्नावर सुरेंद्र शर्मा म्हणाले, पहिले धर्माच्या नावावर उन्नती झाली... नंतर म्हटले गेले की, आम्ही धर्म वाढविणार, त्यानंतर धर्माच्या नावावरच पोळी भाजणे सुरू केले. आता तर धर्मालाच ओरबडणे सुरू केले आहे. आम्ही धर्म स्वीकारतो; पण त्या धर्माचे विचार प्रत्यक्षात अमलात आणत नाहीत. यातूनच भोंदूबाबा तयार झाले.दहशतवाद संपवा तरच शांतीदेशात गरीब व श्रीमंतांमधील दरी वाढत असल्याने समस्या निर्माण झाल्या आहेत. दहशतवाद, नक्षलवादीवृत्ती त्यातूनच वाढीस लागली आहे. दहशतवादी मारलेच पाहिजेत, तसेच दहशतवादच मिटविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे; कारण देशात काही जणांकडे फेकून देण्याइतक्या पोळ्या आहेत, तर काही जणांना त्या पोळीचे दर्शन होत नाही, हा विरोधाभास संपविला तर अनेक समस्या कमी होतील.जीएसटी कसा गोळा करावा हे सरकारने मधमाशीकडून शिकावेमी काही अर्थतज्ज्ञ नाही, पण देशात फिरतो. लोक जे बोलतात त्यावरून जीएसटीमुळे सुविधा नाही तर अडचणी अधिक वाढल्या असे दिसते. कारण, व्यवसाय सोडून तांत्रिक समस्यांना जास्त तोंड द्यावे लागत आहे. चाणक्याने असे म्हटले होते की, मधमाशी फुलाची सुंदरता व सुगंध खराब न करता जसे मध सोशून घेते तसाच कर गोळा करावा. मी सुद्धा तेच म्हणतो की, सरकारनेही व्यापाºयांना कोणताही त्रास न होऊ देता जीएसटी गोळा करावा.दुसºयांच्या पत्नीवर काव्य केले तर लोक मारतीलतुम्ही नेहमी आपल्याच पत्नीवर व्यंगात्मक काव्य का करता, असे विचारता सुरेंद्र शर्मा म्हणाले की, दुसºयाच्या पत्नीवर काव्य केले, तर लोक मला कविसंमेलनातच स्टेजवर येऊन मारतील. त्यामुळे आपल्याच पत्नीवर काव्य करीत असतो; मात्र आता माझा माझ्या पत्नीतील इंटरेस्ट कमी झाला, पण तुम्ही एवढा इंटरेस्ट का दाखविता, असे म्हणत त्यांनी हास्य फुलविले.