शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

‘दिल्ली ते गल्ली’ खड्ड्यातच खरी कमाई; मग खड्डे बुजतीलच कसे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 00:55 IST

दिल्ली ते गल्लीपर्यंत जागोजागी खड्डे पडले आहेत. कारण महानगरपालिका कुठलीही असो, तेथील अधिकारी व नगरसेवकांची खरी कमाई खड्ड्यातच आहे.

प्रशांत तेलवाडकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : दिल्ली ते गल्लीपर्यंत जागोजागी खड्डे पडले आहेत. कारण महानगरपालिका कुठलीही असो, तेथील अधिकारी व नगरसेवकांची खरी कमाई खड्ड्यातच आहे. जनतेची सेवा करणाºया नगरसेवकांना तर पगारही मिळत नाही. निवडणुकीत ओतलेला पैसा मग कुठून काढतील. मग, रस्त्यावर खड्डे पडले नाही तर त्या बिचाºयांची घरे कशी चालतील... जेवढे खड्डे अधिक तेवढी कमाई अधिक... यामुळे कितीही ओरड होवो, आंदोलन होवो, रस्त्यावर खड्डे पडणारच... असा मार्मिक टोला हिंदीतील हास्यकवी सुरेंद्र शर्मा यांनी लगावला.युवक बिरादरीतर्फे आयोजित एलोरा मिलन सोहळ्यानिमित्त सुरेंद्र शर्मा औरंगाबादेत मुक्कामी आले होते. त्यांनी लोकमतच्या प्रतिनिधीशी दीड तास दिलखुलास गप्पा मारल्या. देशातील सद्य:स्थितीचे धीरगंभीरपणे; पण मार्मिक विवेचन त्यांनी केले. ‘मी रचलेले विडंबनपर काव्य चुका करणाºयांना सावध करण्यासाठी असते, त्यांना जखमी करण्यासाठी नव्हे,’ असे म्हणत त्यांनी धर्माच्या नावावर चाललेल्या दुकानदारीच्या विषयाला हात घातला.धर्म को मानते है पर धर्म की नही मानतेकाही लोकांनी धर्माच्या नावावर दुकानदारी सुरू केलीय, या प्रश्नावर सुरेंद्र शर्मा म्हणाले, पहिले धर्माच्या नावावर उन्नती झाली... नंतर म्हटले गेले की, आम्ही धर्म वाढविणार, त्यानंतर धर्माच्या नावावरच पोळी भाजणे सुरू केले. आता तर धर्मालाच ओरबडणे सुरू केले आहे. आम्ही धर्म स्वीकारतो; पण त्या धर्माचे विचार प्रत्यक्षात अमलात आणत नाहीत. यातूनच भोंदूबाबा तयार झाले.दहशतवाद संपवा तरच शांतीदेशात गरीब व श्रीमंतांमधील दरी वाढत असल्याने समस्या निर्माण झाल्या आहेत. दहशतवाद, नक्षलवादीवृत्ती त्यातूनच वाढीस लागली आहे. दहशतवादी मारलेच पाहिजेत, तसेच दहशतवादच मिटविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे; कारण देशात काही जणांकडे फेकून देण्याइतक्या पोळ्या आहेत, तर काही जणांना त्या पोळीचे दर्शन होत नाही, हा विरोधाभास संपविला तर अनेक समस्या कमी होतील.जीएसटी कसा गोळा करावा हे सरकारने मधमाशीकडून शिकावेमी काही अर्थतज्ज्ञ नाही, पण देशात फिरतो. लोक जे बोलतात त्यावरून जीएसटीमुळे सुविधा नाही तर अडचणी अधिक वाढल्या असे दिसते. कारण, व्यवसाय सोडून तांत्रिक समस्यांना जास्त तोंड द्यावे लागत आहे. चाणक्याने असे म्हटले होते की, मधमाशी फुलाची सुंदरता व सुगंध खराब न करता जसे मध सोशून घेते तसाच कर गोळा करावा. मी सुद्धा तेच म्हणतो की, सरकारनेही व्यापाºयांना कोणताही त्रास न होऊ देता जीएसटी गोळा करावा.दुसºयांच्या पत्नीवर काव्य केले तर लोक मारतीलतुम्ही नेहमी आपल्याच पत्नीवर व्यंगात्मक काव्य का करता, असे विचारता सुरेंद्र शर्मा म्हणाले की, दुसºयाच्या पत्नीवर काव्य केले, तर लोक मला कविसंमेलनातच स्टेजवर येऊन मारतील. त्यामुळे आपल्याच पत्नीवर काव्य करीत असतो; मात्र आता माझा माझ्या पत्नीतील इंटरेस्ट कमी झाला, पण तुम्ही एवढा इंटरेस्ट का दाखविता, असे म्हणत त्यांनी हास्य फुलविले.