शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

सातारा- देवळाई नगर परिषद केव्हा?

By admin | Updated: May 24, 2014 02:09 IST

साहेबराव हिवराळे, औरंगाबाद सातारा-देवळाई नगर परिषदेसाठी १९ आक्षेप दाखल झाले असून, त्याचे निराकरण झाल्यानंतरच नगर परिषदेला हिरवा कंदील मिळणार आहे,

साहेबराव हिवराळे, औरंगाबाद सातारा-देवळाई नगर परिषदेसाठी १९ आक्षेप दाखल झाले असून, त्याचे निराकरण झाल्यानंतरच नगर परिषदेला हिरवा कंदील मिळणार आहे, असे असले तरी निवडणुकांमधील राजकीय हालचालींमुळे तसेच आक्षेपांचा निपटारा करण्यात प्रशासकीय विलंब होत असल्यामुळे नगर परिषद अस्तिवात येणार केव्हा असा सवाल उपस्थित होत आहे. लोकसभेची आचारसंहिता संपताच पदवीधर मतदारसंघाची आचारसंहिता कालपासून लागू झाली आहे. किमान एक महिन्याचा कालावधी लोटल्यानंतर पुन्हा विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल. आता नगर परिषद २०१५ मध्येच अस्तित्वात येईल, अशी धारणा सातारा -देवळाई परिसरातील नागरिकांत निर्माण झाली आहे. नगर परिषद येईल तेव्हा येईल; परंतु सफाई, पाणीटंचाई, वीज आदी प्रश्न सोडविण्याकडे ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांचे दुर्लक्ष आहे. लेखी तक्रार देऊनही पदाधिकारी व अधिकारी त्याकडे लक्ष देत नाहीत. सातारा-देवळाई परिसराचा विस्तार पाहता ग्रामपंचायतीच्या आवाक्याबाहेर स्थिती गेल्याचे दिसते. नगर परिषदेत आमचाही समावेश असावा, आम्हाला का वगळण्यात आले इत्यादी विषय आहेत. या भागात बँका, शाळा, महाविद्यालये, मंगल कार्यालये असून, उत्तम दर्जाची म्हणता येईल अशी एकही सुविधा ग्रामपंचायत देऊ शकत नाही, म्हणून शासनाने सातारा-देवळाई परिसराला नगर परिषदेचा दर्जा देण्याची घोषणा वर्षभरापूर्वी केली होती. त्यामुळे रहिवाशांच्या आशा पल्लवित झाल्या असल्या तरी घोषणेची अद्याप पूर्तता झालेली नाही. लवकरात लवकर नगर परिषदेचा विषय निकाली काढावा, अशी मागणी माजी सरपंच यशवंत कदम, वाल्मीक पाटील, विठ्ठल काळे आदींनी केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात राजपूत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आक्षेपांवर प्रथम सुनावणी होणार आहे. त्यानंतर नगर परिषदेविषयी लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांच्याकडे या आक्षेपांच्या सर्व फाईल वर्ग केल्या असून, तीन जणांनी आपले आक्षेप परत घेतले असून, आता फक्त १९ आक्षेप शिल्लक आहेत.सातारा-देवळाई परिसरातील आक्षेपांचे निराकरण करण्यासाठी जिल्हा प्रशासन लवकरच नोटिसा बजावणार असून, त्यावेळी सदरील तक्रारींवर सविस्तर चर्चा होऊन त्याचे समाधान केल्याशिवाय नगर परिषदेचा चेंडू टोलवणे शक्य नाही.