शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

सातारा- देवळाईत नागरिकांचा ‘जागते रहो’ चा नारा

By admin | Updated: December 23, 2015 00:10 IST

औरंगाबाद : सातारा- देवळाई परिसरात सर्वत्र अंधार आणि विरळ वसाहती असल्याने चोऱ्यामाऱ्या वाढल्या असून, महिनाभरात किमान ६ घरफोड्या झाल्या आहेत.

औरंगाबाद : सातारा- देवळाई परिसरात सर्वत्र अंधार आणि विरळ वसाहती असल्याने चोऱ्यामाऱ्या वाढल्या असून, महिनाभरात किमान ६ घरफोड्या झाल्या आहेत. एकाच वसाहतीत अनेकदा चोऱ्यांचे प्रकारही घडूनही पोलिसांना तपासात साफ अपयश आले आहे. अखेर साईनाथनगरातील नागरिकांनी स्वत:च रात्रीची गस्त सुरू केलीआहे. मनपाला कळवूनही परिसरात दिवाळीला दिवे लागले नाहीत. दोन दिवसांपूर्वीच सातारा यात्रा संपली तरीदेखील दिवे लावण्यात आलेले नसल्याची खंत नागरिकांंतून व्यक्त होत आहे. रात्री अंधार असल्याने घर गाठताना नागरिकांना धाकधूक वाटत आहे.परिसरात अधूनमधूनच पोलिसांची गस्त दिसते, असे सांगण्यात येते. तरी विरळ वस्ती, अंधार आणि त्यातही खाजगी सुरक्षारक्षकांचाही अभाव आहे. काही अपार्टमेंटमध्ये वॉचमन ठेवले जात आहेत. तरीही चोऱ्या थांबत नसल्याने आठ ते दहा जणांनी साईनाथनगरात गटागटाने गस्त घालण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांचीही परिसरात गस्त दिसावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. सजग नागरिकांचा उपक्रमस्वप्नील शिरसाट, विलास काळे, अतुल चौधरी, ऋषिकेश वारुणे, प्रल्हाद बेळगे, रवी जाधव, अजय काळे, प्रभाकर बाबा भुसारे, आकाश शर्मा आदींसह नागरिकांचा समावेश आहे. सजगता महत्त्वाचीपोलीस निरीक्षक कैलास प्रजापती म्हणाले की, सातारा परिसरात आमच्या कर्मचाऱ्यांची गस्त सुरूच असते, एवढेच नव्हे तर अनेक ठिकाणी गस्ती पथकांसाठी भेट रजिस्टरही आहे. त्यात गस्ती पथकांकडून नोंद केली जाते. काही ठिकाणी चोऱ्या झाल्या असून, त्यांचा तपास सुरू आहे. बीट अंमलदार व कर्मचारी त्या प्रकरणी तपास करीत आहेत. रहिवाशांंनीही आपल्या कॉलनीत संशयित व्यक्ती फिरताना आढळून आल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे. कॉलनीतील पहारेकऱ्यांची माहिती पोलीस ठाण्यातहीनोंदवावी.