शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

सातारा- देवळाईत नागरिकांचा ‘जागते रहो’ चा नारा

By admin | Updated: December 23, 2015 00:10 IST

औरंगाबाद : सातारा- देवळाई परिसरात सर्वत्र अंधार आणि विरळ वसाहती असल्याने चोऱ्यामाऱ्या वाढल्या असून, महिनाभरात किमान ६ घरफोड्या झाल्या आहेत.

औरंगाबाद : सातारा- देवळाई परिसरात सर्वत्र अंधार आणि विरळ वसाहती असल्याने चोऱ्यामाऱ्या वाढल्या असून, महिनाभरात किमान ६ घरफोड्या झाल्या आहेत. एकाच वसाहतीत अनेकदा चोऱ्यांचे प्रकारही घडूनही पोलिसांना तपासात साफ अपयश आले आहे. अखेर साईनाथनगरातील नागरिकांनी स्वत:च रात्रीची गस्त सुरू केलीआहे. मनपाला कळवूनही परिसरात दिवाळीला दिवे लागले नाहीत. दोन दिवसांपूर्वीच सातारा यात्रा संपली तरीदेखील दिवे लावण्यात आलेले नसल्याची खंत नागरिकांंतून व्यक्त होत आहे. रात्री अंधार असल्याने घर गाठताना नागरिकांना धाकधूक वाटत आहे.परिसरात अधूनमधूनच पोलिसांची गस्त दिसते, असे सांगण्यात येते. तरी विरळ वस्ती, अंधार आणि त्यातही खाजगी सुरक्षारक्षकांचाही अभाव आहे. काही अपार्टमेंटमध्ये वॉचमन ठेवले जात आहेत. तरीही चोऱ्या थांबत नसल्याने आठ ते दहा जणांनी साईनाथनगरात गटागटाने गस्त घालण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांचीही परिसरात गस्त दिसावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. सजग नागरिकांचा उपक्रमस्वप्नील शिरसाट, विलास काळे, अतुल चौधरी, ऋषिकेश वारुणे, प्रल्हाद बेळगे, रवी जाधव, अजय काळे, प्रभाकर बाबा भुसारे, आकाश शर्मा आदींसह नागरिकांचा समावेश आहे. सजगता महत्त्वाचीपोलीस निरीक्षक कैलास प्रजापती म्हणाले की, सातारा परिसरात आमच्या कर्मचाऱ्यांची गस्त सुरूच असते, एवढेच नव्हे तर अनेक ठिकाणी गस्ती पथकांसाठी भेट रजिस्टरही आहे. त्यात गस्ती पथकांकडून नोंद केली जाते. काही ठिकाणी चोऱ्या झाल्या असून, त्यांचा तपास सुरू आहे. बीट अंमलदार व कर्मचारी त्या प्रकरणी तपास करीत आहेत. रहिवाशांंनीही आपल्या कॉलनीत संशयित व्यक्ती फिरताना आढळून आल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे. कॉलनीतील पहारेकऱ्यांची माहिती पोलीस ठाण्यातहीनोंदवावी.