शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
2
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
3
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
4
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
5
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
6
HSC Exam Result 2025: १२ वी परीक्षेत १२४ केंद्रांवर गैरप्रकार; त्रुटी आढळल्यास केंद्र कायमस्वरूपी बंद करणार - शरद गोसावी
7
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
8
HI हर्षा, माझ्याशी लग्न करशील?; असलमच्या प्रपोजलला कुंभमधील व्हायरल गर्लचं बेधडक उत्तर
9
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले
10
विश्वास बसला नसता...! युक्रेनने समुद्री ड्रोनद्वारे रशियाचे सुखोई फायटरजेट पाडले; अमेरिकेसह सर्व देशांच्या सैन्यांना धक्का
11
आमिर खानच्या बहुचर्चित 'सितारे जमीन पर'चं पहिलं पोस्टर आऊट, 'या' दिवशी रिलीज होणार सिनेमा
12
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा आणखी एक कट उघड; गुप्तचर विभागाची माहिती, अलर्ट जारी
13
"लग्नानंतर ४ वर्षांनी घटस्फोट झाला आणि...", Divorce बद्दल पहिल्यांदाच बोलला स्वप्नील जोशी
14
Video - रेस्टॉरंटमध्ये टेबल न मिळाल्याने संतापले मंत्री; रातोरात बोलावली फूड सेफ्टी टीम अन्...
15
धक्कादायक! पुण्यात नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणाविरोधात गुन्हा दाखल
16
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
17
निवेदिता सराफ यांच्याकडून घडलेली 'ती' चूक, अशोक सराफ यांनी पत्नीला चांगलंच सुनावलं
18
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
19
घरातल्या कमोडमध्ये झाला मोठा धमाका, वेस्टर्न टॉयलेटचा स्फोट होऊन तरुण गंभीर जखमी!
20
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल

थेट जनतेतूनच व्हावी सरपंचाची निवड

By admin | Updated: December 31, 2016 00:16 IST

उस्मानाबाद : जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पडली आहे.

उस्मानाबाद : जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पडली आहे. अशाच पद्धतीने सरपंचाची निवड करण्याचा विचार शासनस्तरावर सुरू असून, याबाबत एका समितीही गठित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील लोकांची मते जाणून घेतली असता तब्बल ८२ टक्के नागरिकांनी होय शासनाने सरपंचाची निवडही थेट जनतेतून करण्याचा निर्णय घ्यावा, अशी भूमिका मांडली आहे. थेट निवडीची प्रक्रिया ग्रामपंचायतीतही राबविल्यास गावा-गावातील तंटे कमी होतील, असा विश्वास ग्रामस्थांना वाटतो आहे.नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीवेळी राज्य शासनाने नगराध्यक्षाची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेतानाच नगराध्यक्षाला अधिकचे अधिकार देऊन या पदाला महत्त्वही मिळवून दिले. शहरी भागातील बहुतांश नागरिकांनी थेट नगराध्यक्ष निवडीच्या शासनाच्या निर्णयाचे स्वागतच केले होते. आता सरपंचाची निवडही थेट जनतेतून करण्याचे विचाराधीन आहे.यासाठी राज्याच्या ग्रामविकास विभागाने एका समितीची स्थापना केली असून, या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्याच्या निर्णयावर अंतिम निर्णय होणार आहे. दरम्यान, शासनाच्या या भूमिकेबाबत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांची मते जाणून घेतली असता तब्बल ८२ टक्के ग्रामस्थांनी सरपंचाच्या थेट जनतेतून होणाऱ्या निवडीला आपली पसंती दर्शविली आहे, तर १८ टक्के नागरिकांना अद्यापही ग्रामपंचायत सदस्यांमार्फत सरपंचाची निवड व्हावी असे वाटते. लोकमतने या विषयासंदर्भात ग्रामस्थांची मत-मतांतरे सर्व्हेक्षणाच्या माध्यमातून प्रश्नावलीद्वारे जाणून घेतली.सरपंचाची निवड थेट जनतेतून केल्यास काय परिणाम होईल असा प्रश्न ग्रामस्थांना यावेळी विचारण्यात आला होता. यावर सर्वाधिक म्हणजे ४१ टक्के ग्रामस्थांनी सरपंचाची निवड थेट जनतेतून केल्यास गावा-गावातील तंटे कमी होतील, असे मत नोंदविले आहे. २७ टक्के ग्रामस्थांना अशा पद्धतीने सरपंचाची निवड झाल्यास सक्षम तसेच जनतेच्या मनातील व्यक्तीला या पदावर बसण्याची संधी मिळेल असे वाटते, तर २१ टक्के नागरिकांना सरपंचाची निवड थेट जनतेतून झाल्यास निवडणुकीदरम्यान होणारी सदस्यांची पळवापळवी थांबेल असा विश्वास वाटतो. काही ग्रामस्थांनी सरपंचाची निवड थेट जनतेतून करतानाच नगराध्यक्षाप्रमाणेच सरपंचालाही अधिकचे अधिकार देऊन हे पद अधिक बळकट करण्याची आवश्यकता व्यक्त केली असून, अशा पद्धतीची कार्यपद्धती सरपंच निवडीवेळी राबविल्यास ग्रामीण भागातील विकासकामांना गती मिळण्यास मतद होईल, असा विश्वास ११ टक्के ग्रामस्थांना वाटतो आहे. (प्रतिनिधी)