शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

थेट जनतेतूनच व्हावी सरपंचाची निवड

By admin | Updated: December 31, 2016 00:16 IST

उस्मानाबाद : जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पडली आहे.

उस्मानाबाद : जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पडली आहे. अशाच पद्धतीने सरपंचाची निवड करण्याचा विचार शासनस्तरावर सुरू असून, याबाबत एका समितीही गठित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील लोकांची मते जाणून घेतली असता तब्बल ८२ टक्के नागरिकांनी होय शासनाने सरपंचाची निवडही थेट जनतेतून करण्याचा निर्णय घ्यावा, अशी भूमिका मांडली आहे. थेट निवडीची प्रक्रिया ग्रामपंचायतीतही राबविल्यास गावा-गावातील तंटे कमी होतील, असा विश्वास ग्रामस्थांना वाटतो आहे.नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीवेळी राज्य शासनाने नगराध्यक्षाची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेतानाच नगराध्यक्षाला अधिकचे अधिकार देऊन या पदाला महत्त्वही मिळवून दिले. शहरी भागातील बहुतांश नागरिकांनी थेट नगराध्यक्ष निवडीच्या शासनाच्या निर्णयाचे स्वागतच केले होते. आता सरपंचाची निवडही थेट जनतेतून करण्याचे विचाराधीन आहे.यासाठी राज्याच्या ग्रामविकास विभागाने एका समितीची स्थापना केली असून, या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्याच्या निर्णयावर अंतिम निर्णय होणार आहे. दरम्यान, शासनाच्या या भूमिकेबाबत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांची मते जाणून घेतली असता तब्बल ८२ टक्के ग्रामस्थांनी सरपंचाच्या थेट जनतेतून होणाऱ्या निवडीला आपली पसंती दर्शविली आहे, तर १८ टक्के नागरिकांना अद्यापही ग्रामपंचायत सदस्यांमार्फत सरपंचाची निवड व्हावी असे वाटते. लोकमतने या विषयासंदर्भात ग्रामस्थांची मत-मतांतरे सर्व्हेक्षणाच्या माध्यमातून प्रश्नावलीद्वारे जाणून घेतली.सरपंचाची निवड थेट जनतेतून केल्यास काय परिणाम होईल असा प्रश्न ग्रामस्थांना यावेळी विचारण्यात आला होता. यावर सर्वाधिक म्हणजे ४१ टक्के ग्रामस्थांनी सरपंचाची निवड थेट जनतेतून केल्यास गावा-गावातील तंटे कमी होतील, असे मत नोंदविले आहे. २७ टक्के ग्रामस्थांना अशा पद्धतीने सरपंचाची निवड झाल्यास सक्षम तसेच जनतेच्या मनातील व्यक्तीला या पदावर बसण्याची संधी मिळेल असे वाटते, तर २१ टक्के नागरिकांना सरपंचाची निवड थेट जनतेतून झाल्यास निवडणुकीदरम्यान होणारी सदस्यांची पळवापळवी थांबेल असा विश्वास वाटतो. काही ग्रामस्थांनी सरपंचाची निवड थेट जनतेतून करतानाच नगराध्यक्षाप्रमाणेच सरपंचालाही अधिकचे अधिकार देऊन हे पद अधिक बळकट करण्याची आवश्यकता व्यक्त केली असून, अशा पद्धतीची कार्यपद्धती सरपंच निवडीवेळी राबविल्यास ग्रामीण भागातील विकासकामांना गती मिळण्यास मतद होईल, असा विश्वास ११ टक्के ग्रामस्थांना वाटतो आहे. (प्रतिनिधी)