शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
6
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
7
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
8
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
9
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
10
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
11
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
12
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
13
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
14
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
15
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
16
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
17
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
18
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
19
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
20
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले

थेट जनतेतूनच व्हावी सरपंचाची निवड

By admin | Updated: December 31, 2016 00:16 IST

उस्मानाबाद : जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पडली आहे.

उस्मानाबाद : जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पडली आहे. अशाच पद्धतीने सरपंचाची निवड करण्याचा विचार शासनस्तरावर सुरू असून, याबाबत एका समितीही गठित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील लोकांची मते जाणून घेतली असता तब्बल ८२ टक्के नागरिकांनी होय शासनाने सरपंचाची निवडही थेट जनतेतून करण्याचा निर्णय घ्यावा, अशी भूमिका मांडली आहे. थेट निवडीची प्रक्रिया ग्रामपंचायतीतही राबविल्यास गावा-गावातील तंटे कमी होतील, असा विश्वास ग्रामस्थांना वाटतो आहे.नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीवेळी राज्य शासनाने नगराध्यक्षाची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेतानाच नगराध्यक्षाला अधिकचे अधिकार देऊन या पदाला महत्त्वही मिळवून दिले. शहरी भागातील बहुतांश नागरिकांनी थेट नगराध्यक्ष निवडीच्या शासनाच्या निर्णयाचे स्वागतच केले होते. आता सरपंचाची निवडही थेट जनतेतून करण्याचे विचाराधीन आहे.यासाठी राज्याच्या ग्रामविकास विभागाने एका समितीची स्थापना केली असून, या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्याच्या निर्णयावर अंतिम निर्णय होणार आहे. दरम्यान, शासनाच्या या भूमिकेबाबत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांची मते जाणून घेतली असता तब्बल ८२ टक्के ग्रामस्थांनी सरपंचाच्या थेट जनतेतून होणाऱ्या निवडीला आपली पसंती दर्शविली आहे, तर १८ टक्के नागरिकांना अद्यापही ग्रामपंचायत सदस्यांमार्फत सरपंचाची निवड व्हावी असे वाटते. लोकमतने या विषयासंदर्भात ग्रामस्थांची मत-मतांतरे सर्व्हेक्षणाच्या माध्यमातून प्रश्नावलीद्वारे जाणून घेतली.सरपंचाची निवड थेट जनतेतून केल्यास काय परिणाम होईल असा प्रश्न ग्रामस्थांना यावेळी विचारण्यात आला होता. यावर सर्वाधिक म्हणजे ४१ टक्के ग्रामस्थांनी सरपंचाची निवड थेट जनतेतून केल्यास गावा-गावातील तंटे कमी होतील, असे मत नोंदविले आहे. २७ टक्के ग्रामस्थांना अशा पद्धतीने सरपंचाची निवड झाल्यास सक्षम तसेच जनतेच्या मनातील व्यक्तीला या पदावर बसण्याची संधी मिळेल असे वाटते, तर २१ टक्के नागरिकांना सरपंचाची निवड थेट जनतेतून झाल्यास निवडणुकीदरम्यान होणारी सदस्यांची पळवापळवी थांबेल असा विश्वास वाटतो. काही ग्रामस्थांनी सरपंचाची निवड थेट जनतेतून करतानाच नगराध्यक्षाप्रमाणेच सरपंचालाही अधिकचे अधिकार देऊन हे पद अधिक बळकट करण्याची आवश्यकता व्यक्त केली असून, अशा पद्धतीची कार्यपद्धती सरपंच निवडीवेळी राबविल्यास ग्रामीण भागातील विकासकामांना गती मिळण्यास मतद होईल, असा विश्वास ११ टक्के ग्रामस्थांना वाटतो आहे. (प्रतिनिधी)