शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
5
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
7
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
8
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
9
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
10
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
11
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
12
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
13
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
14
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
16
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
17
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
19
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
20
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!

मराठवाडा साहित्य संमेलनात सारस्वतांची मांदियाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:05 IST

औरंगाबाद : ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनात ग्रंथ प्रदर्शन, उद्धघाटन सोहळा, प्रकट मुलाखत, कथाकथन, कविसंमेलन, परिसंवाद, नाटक अशा भरगच्च ...

औरंगाबाद : ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनात ग्रंथ प्रदर्शन, उद्धघाटन सोहळा, प्रकट मुलाखत, कथाकथन, कविसंमेलन, परिसंवाद, नाटक अशा भरगच्च साहित्य व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष राजेश करपे यांनी दिली. या संमेलनात १७० पेक्षा अधिक सारस्वतांचा प्रत्यक्ष सहभाग असणार आहे.

लोकसंवाद फाऊंडेशनतर्फे आयोजित ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनात पहिल्या दिवशी शनिवारी (दि.२५) सकाळी ९.३० वाजता मावळते अध्यक्ष ऋषीकेश कांबळे यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन होईल. १० वाजता संमेलनाचे उद्घाटन राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होईल. संमेलनाचे अध्यक्ष बाबू बिरादार असून, यावेळी आमदार सतीश चव्हाण, मधुकरराव मुळे यांची प्रमुख उपस्थिती असेल. पहिल्या दिवशी सायंकाळी ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ हा नाट्यप्रयोग सादर होईल. दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी १० वाजता साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक श्रीकांत देशमुख यांची प्रकट मुलाखत रवींद्र तांबोळी, गजानन जाधव, पृथ्वीराज तौर हे घेतील. १.३० वाजता दिगंबर कदम यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथनाचा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये राजेंद्र गहाळ, बबन महामुनी, शंकर विभुते, विलास सिंदगीकर आणि अनिता येलमटे यांचा सहभाग असेल. सायंकाळी ४ वाजता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत साहित्य संमेलनाचा समारोप होईल. आयोजक समितीचे मुख्य कार्यवाह डॉ. राम चव्हाण, उपाध्यक्ष डॉ. चेतना सोनकांबळे, डॉ. फुलचंद सलामपुरे, समन्वयक डॉ. रामचंद्र काळुंखे आदी यावेळी उपस्थित होते.

चौकट,

ज्वलंत विषयावर चार परिसंवाद

पहिल्या दिवशी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात ५ ते ७ वाजेदरम्यान विचारवंत जयदेव डोळे यांच्या अध्यक्षतेखाली ‘प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता आज शून्यावर आली आहे!’ या विषयावर पहिला परिसंवाद होईल. यात ज्येष्ठ पत्रकार नंदकिशोर पाटील, संजय आवटे, अलका धूपकर, रवींद्र केसकर, वैजीनाथ अनमुलवाड सहभागी होतील. डॉ. ना. गो. नांदापूरकर सभागृहात सु. ग. चव्हाण यांच्या अध्यक्षेखाली ‘आजच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर संत साहित्य हेच उत्तर’ या विषयावर परिसंवादाचे दुसरे पुष्प गुंफले जाईल. यात दीपा श्रीरसागर, राम रौनेकर, रवींद्र बेंबरे, संजय जगताप आणि मोहीब कादरी हे सहभागी होतील. दुसऱ्या दिवशी ‘आजचा शेतकरी धोरणकर्त्या राजकारण्यांचा बळी !’ या विषयावर तिसरा आणि ‘मराठी लेखिका-कवयित्रींचे लेखन स्त्रीवादात अडकले आहे!’ या विषयावर चौथा परिसंवाद होईल.

चौकट,

दोन कविसंमेलने

पहिल्या दिवशी दुपारी २ ते ५ या वेळेत संजीवनी तडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली मान्यवर कवींचे संमेलन होईल. दुसऱ्या दिवशी १.३० नरसिंग इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली दुसरे कविसंमेलन होणार आहे. या दोन्ही कवी संमेलनात तब्बल ११० पेक्षा अधिक मराठवाड्यातील कवींचा सहभाग असणार आहे.