शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

अंत्यसंस्कारासाठी सरण महागले, लगद्याच्या विटांचा करणार वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:04 IST

औरंगाबाद : कोरोना, नैसर्गिक मृत्यूमुळे स्मशानभूमीमध्ये मागील महिनाभरापासून अंत्यसंस्कारासाठी अक्षरश: रांगा लागत आहेत. त्यातच सरणही महागले आहे. अंत्यसंस्कारासाठी लाकडाचा ...

औरंगाबाद : कोरोना, नैसर्गिक मृत्यूमुळे स्मशानभूमीमध्ये मागील महिनाभरापासून अंत्यसंस्कारासाठी अक्षरश: रांगा लागत आहेत. त्यातच सरणही महागले आहे. अंत्यसंस्कारासाठी लाकडाचा वापर थांबवून लगद्यापासून तयार होणाऱ्या विटांचा (ब्रिक्वेटस्‌) वापर करण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे. त्याकरिता लवकरच निविदा काढली जाणार आहे.

अंत्यसंस्कारासाठी लाकडांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. महापालिकेने तीन दशकांपूर्वी शहरात विद्युत दाहिनीचा प्रयोग केला होता. मात्र, तो यशस्वी झाला नाही. त्यामुळे आजही शहरातील विविध स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी शंभर टक्के लाकडांचाच वापर करण्यात येतो. झाडांची कत्तल करून लाकडे आणली जात असल्यामुळे पर्यावरण धोक्यात येत आहे. प्रदूषण वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी लाकडाचा वापर थांबविण्याच्या दृष्टीने पर्यायी व्यवस्था म्हणून लगद्यापासून तयार विटांचा वापर अंत्यसंस्कारासाठी करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात १६ स्मशानभूमींमध्ये मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जात असून, त्याकरिता लाकडांचा वापर होत आहे. सध्या कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. बाहेरच्या जिल्ह्यातील व बाहेरच्या गावातील कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतरही त्याच्यावर शहरातील स्मशानभूमीतच अंत्यसंस्कार केले जात असल्याने लाकडांचा वापर वाढलेला आहे. लाकडांचा वापर पूर्णपणे थांबविण्यासाठी लगद्यापासून किंवा ऊस, सोयाबीन यापासून तयार होणाऱ्या विटांचा (ब्रिक्वेटस्‌) वापर केला जाणार आहे. त्याकरिता मनपाने निविदा काढण्याची तयारी सुरू केली आहे, असे शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी सांगितले.