शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

मराठवाड्यात टँकरने गाठली शंभरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 00:04 IST

मराठवाड्यात जानेवारीअखेरीस टंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे, मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत जानेवारी महिन्यातच पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून, औरंगाबाद, जालना आणि नांदेड जिल्ह्यांतील ८६ गावांमध्ये १०० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. फेबु्रवारीनंतर टँकर संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देटंचाईच्या झळा : औरंगाबाद जिल्ह्यात पावनेदोन लाख नागरिकांना टँकरने पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठवाड्यात जानेवारीअखेरीस टंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे, मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत जानेवारी महिन्यातच पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून, औरंगाबाद, जालना आणि नांदेड जिल्ह्यांतील ८६ गावांमध्ये १०० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. फेबु्रवारीनंतर टँकर संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.टंचाईच्या झळा औरंगाबाद जिल्ह्याला बसत असून, औरंगाबाद, गंगापूर, फुलंब्री, वैजापूर, खुलताबाद, कन्नड, सिल्लोड या ७ तालुक्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरूआहे.जिल्ह्यातील ७८ गावांमधील तब्बल १ लाख ७५ हजार नागरिकांची तहान ८९ टँकरद्वारे भागविण्यात येत आहे. औरंगाबादसह परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यामध्ये कमी पाऊस झाला. त्या जिल्ह्यांत येत्या उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. टँकर वाढविण्याचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे येत आहेत.जालना जिल्ह्यात ९८ टक्के पाऊस झाला, तरी भोकरदन आणि जाफ्राबाद तालुक्यांत टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे. त्या तालुक्यातील चार गावांमधील १२ हजार नागरिकांना ६ टँकरने पाणी दिले जात आहे. नांदेड जिल्ह्याच्या विविध भागांत ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.टँकर सुरू असलेलेगावे, लोकसंख्यातालुका गावे लोकसंख्या टँकरऔरंगाबाद ३ ६३४८ ४फुलंब्री २० ५३२१० २९गंगापूर ४२ १०२६५२ ४६वैजापूर ४ ११०१ ४खुलताबाद ४ ५२७६ ३सिल्लोड ३ ४५२८ ३भोकरदन ३ ११२४१ ५जाफराबाद १ ८८२ १नांदेड ५ ११०० ५