शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
2
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
3
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
4
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
5
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
6
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
7
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
8
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
9
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
10
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
11
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
12
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
13
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
14
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
15
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
16
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
17
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
18
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
19
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
20
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ

संजय राऊतांनी झापले; कदमांनी गोंजारले...

By admin | Updated: June 9, 2016 23:53 IST

औरंगाबाद : शिवसेना नेते खा.संजय राऊत यांनी बुधवारी ‘भाजपचे केंद्रातील मोदी सरकार म्हणजे निजामाच्या बापाचे सरकार आहे,’ अशा तिखट शब्दात टीका केली.

औरंगाबाद : शिवसेना नेते खा.संजय राऊत यांनी बुधवारी ‘भाजपचे केंद्रातील मोदी सरकार म्हणजे निजामाच्या बापाचे सरकार आहे,’ अशा तिखट शब्दात टीका केली. त्याला चोवीस तास उलटण्याच्या आत सेनेने ‘यू- टर्न घेतला. देवेंद्र फडणवीस हे तर दूरदृष्टी असलेले मुख्यमंत्री आहेत, अशा शब्दात सेना नेते तथा औरंगाबादचे पालकमंत्री रामदास कदम यांनी भाजपावर स्तुतिसुमने उधळली. त्यावरून ‘एकाने झोडपायचे अन् सत्तेसाठी दुसऱ्याने गोंजारायचे’ असा सेनेचा दुटप्पीपणा पुन्हा एकदा पाहावयाला मिळाला.खा. राऊत यांनी बुधवारी औरंगाबादेत सेनेच्या मेळाव्यात केंद्र सरकारवर जहरी टीका केली होती. त्यांनी मोदींना लक्ष्य करीत केंद्र सरकारची तुलना निजाम राजवटीशी केली होती. त्यावरून दिवसभर ‘युती’त चांगलीच जुगलबंदी रंगली होती. गुरुवारी औरंगाबादेत पालकमंत्री रामदास कदमांनी भाजपच्या या जखमेवर मलम लावण्याचा प्रयत्न केला. पत्रकारांशी बोलताना रामदास कदम म्हणाले, खा.राऊत हे काय बोलले हे मला माहिती नाही. ते केंद्रात असतात, तिकडे काय चालले आहे, मला माहिती नाही, याबाबत तुम्हीच त्यांना विचारा. ते केंद्राच्या बाबतीत बोलले, राज्य सरकारच्या बाबत बोलले नाही. राज्यातील परिस्थिती मला माहिती आहे. मला जे बोलावेसे वाटले, ते मी बोललो. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना काम करीत आहे. फडणवीस आणि ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारचे समांतर कामकाज सुरू आहे. राज्यात फडणवीस सरकार अत्यंत चांगले काम करीत आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी अधिकारी एस.जी.पडवळ यांनी केले. यावेळी खा.चंद्रकांत खैरे, आ.संजय शिरसाट, इम्तियाज जलील, महापौर त्र्यंबक तुपे, सभापती मोहन मेघावाले, जि. प. अध्यक्ष श्रीराम महाजन, जिल्हाधिकारी डॉ.निधी पांडे, सीईओ डॉ.अभिजित चौधरी, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी उपस्थित होते.हरिभाऊ बागडे- रामदास कदमांची जुगलबंदीजिल्ह्यातील १२०० शेतकऱ्यांना जिल्हा कृषी विभागातर्फे मोफत बियाणांच्या वाटपाचा कार्यक्रम पालकमंत्री कदम यांच्या हस्ते सिडको नाट्यगृहात पार पडला. सिल्लोड, सोयगाव, कन्नडमधील शेतकऱ्यांना एकरी एक बॅग बियाणे देण्यात आले. यात मका वाणाच्या, तर उर्वरित तालुक्यातील शेतकऱ्यांना मका, कापूस बियाणांचे वाटप करण्यात आले. यावेळी विधानसभा अध्यक्ष बागडे यांना उद्देशून कदम म्हणाले, बागडे साहेब, मराठवाड्यात शिवसेनेने १०० पोेकलेन जलयुक्त शिवारासाठी दिले. ५५ टँकर दिले, पाण्याच्या टाक्या दिल्या. त्यावर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी या कार्यक्रमात शिवसेनेला सौम्य असा चिमटा काढला. १३७२ खेडे जिल्ह्यात आहेत. बियाणे वाटपासाठी फक्त १२०० शेतकरी काढण्यात आले. एका गावात एकच शेतकरी गरिबीच्या संकटात आहे काय? असा सवाल त्यांनी केला.