शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

संजय राऊतांनी झापले; कदमांनी गोंजारले...

By admin | Updated: June 9, 2016 23:53 IST

औरंगाबाद : शिवसेना नेते खा.संजय राऊत यांनी बुधवारी ‘भाजपचे केंद्रातील मोदी सरकार म्हणजे निजामाच्या बापाचे सरकार आहे,’ अशा तिखट शब्दात टीका केली.

औरंगाबाद : शिवसेना नेते खा.संजय राऊत यांनी बुधवारी ‘भाजपचे केंद्रातील मोदी सरकार म्हणजे निजामाच्या बापाचे सरकार आहे,’ अशा तिखट शब्दात टीका केली. त्याला चोवीस तास उलटण्याच्या आत सेनेने ‘यू- टर्न घेतला. देवेंद्र फडणवीस हे तर दूरदृष्टी असलेले मुख्यमंत्री आहेत, अशा शब्दात सेना नेते तथा औरंगाबादचे पालकमंत्री रामदास कदम यांनी भाजपावर स्तुतिसुमने उधळली. त्यावरून ‘एकाने झोडपायचे अन् सत्तेसाठी दुसऱ्याने गोंजारायचे’ असा सेनेचा दुटप्पीपणा पुन्हा एकदा पाहावयाला मिळाला.खा. राऊत यांनी बुधवारी औरंगाबादेत सेनेच्या मेळाव्यात केंद्र सरकारवर जहरी टीका केली होती. त्यांनी मोदींना लक्ष्य करीत केंद्र सरकारची तुलना निजाम राजवटीशी केली होती. त्यावरून दिवसभर ‘युती’त चांगलीच जुगलबंदी रंगली होती. गुरुवारी औरंगाबादेत पालकमंत्री रामदास कदमांनी भाजपच्या या जखमेवर मलम लावण्याचा प्रयत्न केला. पत्रकारांशी बोलताना रामदास कदम म्हणाले, खा.राऊत हे काय बोलले हे मला माहिती नाही. ते केंद्रात असतात, तिकडे काय चालले आहे, मला माहिती नाही, याबाबत तुम्हीच त्यांना विचारा. ते केंद्राच्या बाबतीत बोलले, राज्य सरकारच्या बाबत बोलले नाही. राज्यातील परिस्थिती मला माहिती आहे. मला जे बोलावेसे वाटले, ते मी बोललो. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना काम करीत आहे. फडणवीस आणि ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारचे समांतर कामकाज सुरू आहे. राज्यात फडणवीस सरकार अत्यंत चांगले काम करीत आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी अधिकारी एस.जी.पडवळ यांनी केले. यावेळी खा.चंद्रकांत खैरे, आ.संजय शिरसाट, इम्तियाज जलील, महापौर त्र्यंबक तुपे, सभापती मोहन मेघावाले, जि. प. अध्यक्ष श्रीराम महाजन, जिल्हाधिकारी डॉ.निधी पांडे, सीईओ डॉ.अभिजित चौधरी, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी उपस्थित होते.हरिभाऊ बागडे- रामदास कदमांची जुगलबंदीजिल्ह्यातील १२०० शेतकऱ्यांना जिल्हा कृषी विभागातर्फे मोफत बियाणांच्या वाटपाचा कार्यक्रम पालकमंत्री कदम यांच्या हस्ते सिडको नाट्यगृहात पार पडला. सिल्लोड, सोयगाव, कन्नडमधील शेतकऱ्यांना एकरी एक बॅग बियाणे देण्यात आले. यात मका वाणाच्या, तर उर्वरित तालुक्यातील शेतकऱ्यांना मका, कापूस बियाणांचे वाटप करण्यात आले. यावेळी विधानसभा अध्यक्ष बागडे यांना उद्देशून कदम म्हणाले, बागडे साहेब, मराठवाड्यात शिवसेनेने १०० पोेकलेन जलयुक्त शिवारासाठी दिले. ५५ टँकर दिले, पाण्याच्या टाक्या दिल्या. त्यावर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी या कार्यक्रमात शिवसेनेला सौम्य असा चिमटा काढला. १३७२ खेडे जिल्ह्यात आहेत. बियाणे वाटपासाठी फक्त १२०० शेतकरी काढण्यात आले. एका गावात एकच शेतकरी गरिबीच्या संकटात आहे काय? असा सवाल त्यांनी केला.