शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
4
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
5
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
6
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
7
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
8
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
9
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
10
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
11
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
12
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
13
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
14
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
15
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
16
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
17
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
18
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
19
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
20
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल

छावाने जाळले ‘सनफ्लॉवर’चे बॅनर

By admin | Updated: July 16, 2016 01:14 IST

लातूर : येथील तावरजा नदीवर रुंदीकरण आणि खोलीकरणावरुन सुरु झालेला वाद मिटायचे नाव घेत नाहीये. श्री. श्री. रविशंकर परिवाराच्या ‘आर्ट आॅफ लिव्हिंग’ने हे काम केल्याचे सांगितले जाते.

लातूर : येथील तावरजा नदीवर रुंदीकरण आणि खोलीकरणावरुन सुरु झालेला वाद मिटायचे नाव घेत नाहीये. श्री. श्री. रविशंकर परिवाराच्या ‘आर्ट आॅफ लिव्हिंग’ने हे काम केल्याचे सांगितले जाते. त्यात ‘सनफ्लॉवर वेल्फेअर फाऊंडेशन’नेही आम्हीच काम केल्याचा दावा करुन काही दिवसांपूर्वी तावरजाच्या पुलावर बॅनर लावले होते. शुक्रवारी छावाच्या कार्यकर्त्यांनी ते बॅनर जाळून आंदोलन केले. गेल्या काही दिवसांपासून तावरजा नदीच्या खोलीकरणाचे काम आम्हीच केले असा दावा ‘सनफ्लॉवर फाऊंडेशन’च्या संगीता लातूरकर यांनी केला होता. जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी सुरुवातीला हे काम श्री. श्री. रविशंकर परिवाराने केल्याचे सांगितले. यानंतर लातूरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाने नदी खोलीकरणासाठी परवानगी दिलेली पत्रेच पत्रकारांना दाखविली होती. यानंतर जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी कामाच्या श्रेयावरुन वाद उत्पन्न केल्याचे कारण दाखवित त्यांच्याशी केलेला आपल्या कार्यालयाचा पत्रव्यवहार रद्द केला होता. मात्र त्यानंतर ‘सनफ्लॉवर फाऊंडेशन’च्या वतीने तावरजा नदीच्या पुलावर आपले बॅनर लावले होते. शुक्रवारी छावाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. गणेश गोमचाळे यांच्या नेतृत्वाखाली सनफ्लॉवर फाऊंडेशनचे बॅनर जाळण्यात आले. त्यामुळे हा वाद आणखीन चिघळला आहे. यावेळी छावाचे बाळासाहेब सपाटे, दीपक नरवडे, बालाजी निकम, लखन बोराडे आदींची उपस्थिती होती़(प्रतिनिधी) सनफ्लॉवर फाऊंडेशनने २७ किलोमीटरचे काम १५० मजूर व १५ जेसीबीच्या सहाय्याने केल्याचा दावा करते. मग त्यातील वाळू, मुरुम, गाळ, माती हे गौण खनिज गेले कुठे ? याला टिप्परच वापरले नाहीत. मांजरा नदीचे १८ किमीचे काम खोलीकरणासाठी पाच महिन्याचा कालावधी लागतो, मग सनफ्लॉवरने २७ किमीचे काम एक महिन्यात कसे केले. जिल्हाधिकाऱ्यांनी या संस्थेला दिलेल्या कामाच्या मान्यतेचाही खुलासा करावा, अशी मागणी केली आहे. तावरजावर आम्ही काम केले़ परंतु बॅनर जाळणाऱ्याशी आमचा संबंध नाही. आम्ही काम करतो. हिंसक कृत्य करीत नाही. २० किमीचे काम आर्ट आॅफ लिव्हिंगने २०१४-१५ या वर्षात केले़ पहिल्या वर्षी साडेबारा किमी तर दुसऱ्या वर्षी साडेसात किमीचे काम केले. हे लातूरकूरांना माहीत आहे. त्यामुळे कुणी केलेल्या दाव्याकडे आम्ही गांभीर्यानेही पहात नाही, असे महादेव गोमारे म्हणाले़हे काम छावाच्या कार्यकर्त्यांचे नसून सुपारी देऊन केले गेले आहे. माझ्या कामाला प्रत्येक गावातील शेतकरी साक्षीदार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने मी प्रत्यक्ष काम केले आहे. माझे बॅनर जाळले पण मी केलेले काम कसे जाळणार ? असा सवाल संगीता लातूरकर यांनी केला.छावाच्या कृत्याला मी कायद्याने उत्तर देणार असल्याचे त्या म्हणाल्या.