शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

तेच मुद्दे तीच चर्चा : शहराच्या विकासाचा चघळचोथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:05 IST

औरंगाबाद : तेच सभागृह आणि चर्चा करणारे चेहरेही तेच. फक्त व्यासपीठावरील नेते बदलले. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंनी शहराच्या विकासावर चर्चा ...

औरंगाबाद : तेच सभागृह आणि चर्चा करणारे चेहरेही तेच. फक्त व्यासपीठावरील नेते बदलले. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंनी शहराच्या विकासावर चर्चा करण्यासाठी यावेळी पुन्हा एकदा सेनेने शहरातील बुद्धिवंतांची बैठक बोलावली होती त्याचे हे चित्र.

जालना रोडवरील एका हॉटेलमध्ये उद्योग, नगररचना, बांधकाम, पर्यटन क्षेत्रातील विविध तज्ज्ञांनी शहर व जिल्हा विकासाच्या अनुषंगाने मुद्दे मांडताना १९९५ साली युतीचे सरकार आल्यानंतर शिवसेनाप्रमुखांसमक्ष ज्या घटकांवर चर्चा झाली होती, दुर्देवाने आजही त्याच बाबींवर चर्चा करावी लागत असल्याचे उद्योजक उल्हास गवळी म्हणाले. सीआयआयचे विभागीय अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी म्हणाले, शहरात ४० आयटी उद्योग आहेत. साडेतीन हजार रोजगार त्यामध्ये आहेत. शहराला औद्योगिक वातावरण आहे. कॉस्ट ऑफ ऑपरेशन कमी आहे. त्यामुळे मुंबई, पुण्यानंतर येथे गुंतवणूक सोपी आहे. भूमिपुत्रांनी आंतरराष्ट्रीय उद्योग सुरू केले आहेत. राज्याच्या तुलनेत औरंगाबादचा ग्रोथ रेट २८ टक्के आहे. या तुलनेत अनुदान पुरवावे लागेल. धोरणात्मक विचार करावा लागेल. येथील व्हेंडर्सला काम मिळेल, असे निर्णय व्हावेत. रोजगारनिर्मितीसाठी आयटी क्षेत्राला चालना देणे गरजेचे आहे.

ऋषी बागला यांनी विमानतळ, रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढावी, यावर लक्ष केंद्रित केले. उद्योजक राम भोगले, जसवंतसिंग, प्रमोद खैरनार आदींनी सर्वांगीण मते मांडली.

१३ मिनिटे १० सेकंद बोलले ठाकरे

सर्वांची मते ऐकून घेतल्यानंतर पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, आधी नागरिकांशी बोलायचे ठरविले, त्यानंतर पदाधिकाऱ्यांशी बोलणार आहे. विकाससंवाद (डेव्हलपमेंट डायलॉग) औरंगाबादमधून सुरू करतो आहे. आता कामे करून दाखवू शकतो. तीन चाकाचे सरकार असल्यामुळे जास्त स्थिर आहे. शहरासाठी मास्टर प्लान फेजवाईज तयार करणे गरजेचे आहे. आता वर्कींग ग्रूप स्थापन केला पाहिजे. नागरिकांमधून विविध संघटनांचे लोक वर्किंग ग्रूपमध्ये असले पाहिजे. एनजीओप्रमाणे सीजीओ निर्माण करू. मास्टर प्लान करणे सोपे आहे. परंतु, त्यातील काही गोष्टी होतात काही होत नाहीत. त्यावर मॉनिटरींग गरजेचे आहे. निवडणुकीपुरते हे काम नाही, शहर पुढे कसे दिसेल. यासाठी काम करावे लागेल. पर्यटन, पर्यावरण, शहरविकासासाठी काय करावे लागेल, यासाठी जानेवारीअखेरीस पुन्हा चर्चा करू. रेल्वे, विमानतळाचे मुद्दे ऐकले, परंतु स्टेकहोल्डर्सचा मुद्दा लक्षात घेतला आहे. दोन-तीन दिवस राऊंडटेबल चर्चा करू.

चौकट

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खचाखच भरला हॉल

कोरोनाच्या पार्श्वभूमी असताना हॉटेलचे सभागृह खचाखच भरले होते. जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, पोलीस आयुक्त, कुलगुरू यांच्यासह सरकारच्या मंत्री, आमदार, पदाधिकाऱ्यांसह १०० हून अधिक उद्योजकांच्या साक्षीने हा कार्यक्रम झाला.