शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

मनपाकडून जखमेवर ‘मीठ’

By admin | Updated: September 15, 2016 00:36 IST

औरंगाबाद : महापालिका प्रशासनाने मोठा गाजावाजा करून शहरात व्यापक प्रमाणात खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेतली आहे. ही मोहीम निव्वळ ‘धूळफेक’असल्याचे निदर्शनास येत आहे.

औरंगाबाद : महापालिका प्रशासनाने मोठा गाजावाजा करून शहरात व्यापक प्रमाणात खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेतली आहे. ही मोहीम निव्वळ ‘धूळफेक’असल्याचे निदर्शनास येत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही पॅचवर्कच्या नावावर कोट्यवधी रुपये खर्च होणार असले तरी हा खर्च पाण्यात जात आहे. ज्या ठिकाणी डांबरी पॅचवर्क करण्यात येत आहे, तेथील खडी दुसऱ्याच दिवशी रस्त्यावर पसरत आहे. या निकृष्ट दर्जाकडे महापालिकेतील अधिकारी सोयीकरपणे ‘डोळेझाक’ करीत आहेत.मागील तीन महिन्यांपासून औरंगाबादकर खड्ड्यांमुळे त्रस्त झाले आहेत. खड्ड्यांच्या मुद्यावर मागील दोन महिन्यांपासून महापालिकेत प्रशासन विरुद्ध पदाधिकारी, असा ‘कलगीतुरा’रंगला आहे. दोघांच्या वादात सर्वसामान्य नागरिक खड्ड्यांमुळे मेटाकुटीला आले आहेत. अखेर प्रशासनाने गणेशोत्सव डोळ्यासमोर ठेवून उदार अंत:करणाने विसर्जन मार्गावरील पॅचवर्क सुरू केले. प्रत्येक वॉर्डनिहाय १० लाख रुपयांच्या पॅचवर्कला मंजुरी देण्यात आली. ९० लाख ते १ कोटी रुपये पॅचवर्कवर खर्च करण्यात येणार आहे. अनेक वॉर्डांमध्ये मनपाच्या निविदा प्रक्रियेला कंत्राटदारांनी प्रतिसाद न दिल्याने डांबर लॉबीकडून ‘६७-३ सी’या आणीबाणीच्या कलमान्वये काम होत आहे.मनपाने पहिल्या टप्प्यात विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर खड्डे बुजविण्यास सुरुवात केली आहे. अनेक ठिकाणी मुरमाने खड्डे बुजविण्यात येत आहेत. आज टाकलेला मुरूम उद्या निघून जात आहे. जिथे डांबरी पॅचवर्क सुरू आहे, त्या रस्त्यांची गत निराळीच आहे. या पॅचवर्कमध्ये एवढी जाड खडी वापरण्यात येत आहे की, ती दुसऱ्याच दिवशी निघून जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालय ते सलीम अली सरोवर, हडको कॉर्नर ते सिद्धार्थनगर येथील रस्त्यांवर हे चित्र पाहायला मिळत आहे.