शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
3
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
4
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
5
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
6
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
7
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
8
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
9
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
10
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
11
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
12
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
13
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
14
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
15
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
16
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
17
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
18
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
19
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
20
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...

जेवढे ठरले होते तेवढाच पगार हवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:04 IST

औरंगाबाद : कोरोनाच्या पहिल्या, दुसऱ्या लाटेत महापालिकेतील आरोग्य विभागाने ७५० आरोग्य कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीवर नियुक्ती केली होती. शासनाने ठरवून ...

औरंगाबाद : कोरोनाच्या पहिल्या, दुसऱ्या लाटेत महापालिकेतील आरोग्य विभागाने ७५० आरोग्य कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीवर नियुक्ती केली होती. शासनाने ठरवून दिलेल्या नियमापेक्षा जास्त पगार डॉक्टरांना देण्यात आला. जिल्हा प्रशासनाने महापालिकेच्या या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून शासन नियमानुसारच पगार देण्याचे आदेश दिले. त्यामुळे कोरोनाकाळात काम करणाऱ्या डॉक्टरांचा ताफा शुक्रवारी मनपात दाखल झाला. नोकरीवर घेताना जेवढा पगार ठरला होता तेवढाच द्या, असा त्यांनी आग्रह धरला.

महापालिकेने आयुष, बीडीएस डॉक्टरांना ५० हजार रुपये, एमबीबीएस डॉक्टरांना १ लाख रुपये पगार निश्चित केला. काही महिने पगारही देण्यात आला. अलीकडे जवळपास ६०० कर्मचाऱ्यांची सेवा मनपाने थांबवली. यामध्ये डॉक्टर, कर्मचाऱ्यांचा पगार बाकी होता. अलीकडेच शासनाने मनपाला पगारासाठी ८ कोटी रुपये दिले. हा निधी देताना आयुष, बीडीएस डॉक्टरांना ३० हजार रुपये तर एमबीबीएस डाॅक्टरांना ७० हजार रुपये द्यावेत, असे आदेश दिले. त्यानुसार मनपाने कारवाई सुरू केली. शुक्रवारी याची कुणकूण लागताच कंत्राटी डॉक्टर महापालिकेत दाखल झाले. कंत्राटी पद्धतीवर घेताना जो पगार ठरला होता, त्यानुसारच पगार देण्यात यावा. आम्ही कमी पगार अजिबात घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. यावेळी डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांची भेट घेतली.