शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

गौरी-गणपतीसाठी सजली बाजारपेठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 00:49 IST

रावण अमावास्या अर्थातच पोळा सण साजरा करून श्रावणोत्सव संपला आणि भाद्रपदाच्या आगमनाने सर्वांना गणरायाचे आणि महालक्ष्मीच्या उत्सवाचे वेध लागले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : बैल पोळ्याच्या तोंडावर आलेल्या पावसाने बळीराजाला सुखावले आणि सर्वत्र पोळ्याचा उत्साह पाहायला मिळाला. श्रावण अमावास्या अर्थातच पोळा सण साजरा करून श्रावणोत्सव संपला आणि भाद्रपदाच्या आगमनाने सर्वांना गणरायाचे आणि महालक्ष्मीच्या उत्सवाचे वेध लागले. अवघ्या चार दिवसांवर गौरी-गणपतीचा सण येऊन ठेपला आहे. दि. २५ आॅगस्ट रोजी गणराय, तर दि. २९ आॅगस्ट रोजी महालक्ष्मीचे आगमन होत आहे. या निमित्ताने सर्वत्र जय्यत तयारीला सुरुवात झाली असून, गौरी-गणपतीच्या स्वागतासाठी बाजारपेठ सजली आहे.या दोन्ही उत्सवांमध्ये सर्वात जास्त महत्त्व असते ते सजावटीला. त्यामुळेच गणेशाच्या मूर्ती, महालक्ष्मीचे मुखवटे यांच्याइतकीच मागणी सजावटीच्या साहित्यालाही दिसून येत आहे. गणपती आणि महालक्ष्मीला लागणारे वेगवेगळे हार, मुकुट, पूजेचे आकर्षक सामान, वेगवेगळ्या प्रकारचे मखर, विविध प्रकारची तोरणे अशा विविधरंगी वस्तूंनी बाजारपेठ फुलून गेली आहे. गणपतीसाठी थर्माकोलच्या मखरांना जास्त मागणी असल्याचे दिसून येते. हे मखर अन्य मखरांच्या तुलनेत स्वस्त आहेत. यामध्ये मंदिर, कमळ, सिंहासन असे विविध आकार उपलब्ध आहेत. १५० रुपयांपासून ते १००० रुपयांपर्यंत याच्या किमती दिसून येत आहेत. महालक्ष्मीसाठी कापडी मखरांमध्ये विविध प्रकार पाहायला मिळतात.गौरी-गणपतीसाठीचे अनेक आकर्षक दागिनेही महिला वर्गाला खुणावत आहेत. मोत्यांचे, फुलांचे हार आणि या हारांना मध्यभागी मोठे पदक असे आपण नेहमीच पाहतो; पण यंदा मात्र हिरव्या पानांचे हार आणि पदकाच्या जागी आंबा, सफरचंद, संत्री या फळांचे पदक असे नावीन्यपूर्ण हार बाजारात आले आहेत. यंदाही ‘जय मल्हार’ पगडीला विशेष पसंती मिळेल, असा कयास आहे. याशिवाय महालक्ष्मीच्या साड्या, कपडे यांचे असंख्य प्रकार बाजारात पाहायला मिळतात.