शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

सानेगुरुजींच्या विचारांची मशाल तेवत ठेवावी- वझे

By admin | Updated: September 8, 2014 00:53 IST

जालना: वाचन, मनन, चिंतन, प्रेम, सदाचार आदी सद्गुणांची जपणूक करीत आचार, विचार, भावन आणि अंतर्बाह्य वर्तनातून बालमनावर संस्काराचे बीजारोपण करण्याची मोठी जबाबदारी शिक्षकांवर आहे.

जालना: वाचन, मनन, चिंतन, प्रेम, सदाचार आदी सद्गुणांची जपणूक करीत आचार, विचार, भावन आणि अंतर्बाह्य वर्तनातून बालमनावर संस्काराचे बीजारोपण करण्याची मोठी जबाबदारी शिक्षकांवर आहे. याची जाणीव ठेवून सानेगुरुजींच्या आदर्श विचारांची मशाल सतत तेवत ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन ज्येष्ठ अभिनेते प्रा. माधव वझे यांनी रविवारी येथे केले.अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा हेलस (ता. मंठा) व सुयश प्रतिष्ठान यांच्या तर्फे आयोजित जिल्हास्तरीय व मराठवाडा विभागस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी कथामालेचे कार्यवाह माधव बावळे हे होते. यावेळी डॉ. केशव तुपे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना वझे म्हणाले, आहे त्या परिस्थितीशी खंबीरपणे तोंड देत शिक्षणक्षेत्रात नैतिक अधिष्ठान निर्माण करुन शिक्षकांनी समाजात एक जरब निर्माण केली पाहिजे.बावळे म्हणाले, साने गुरुजींनी बालकांसाठी साहित्य फुलविले. त्याप्रमाणेच भविष्याचा वेध घेणाऱ्या साहित्य निर्मितीची गरज आहे. प्रत्येक शाळेत कथामाला सुरु करण्याचे आवाहन त्यांनी केले. डॉ. तुपे म्हणाले, संत ज्ञानेश्वर आणि सानेगुरुजींचा पिंड एकाच रसायनाने बनलेला आहे. गुरुजींनी पसायदानाचा विस्तार करीत ‘खरा तो एकचि धर्म’ हा मंत्र समाजाला दिला. प्रा. वझे यांच्या हस्ते प्रशांत गौतम, रामकिसन सोळंके, सर्जेराव लहाने, शिवाजी अंबुलगेकर, शिवाजी गावंडे, संतोष गर्जे, प्राचार्या डॉ. कमलाताई ठकार, तृप्ती अंधारे यांचा समावेश होता. पहिल्याच डॉ. नरेंद्र दाभोळकर स्मृती पुरस्कार लातूर येथील माधव बावगे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी उपस्थित शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त करुन कथामालेच्या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी दत्तात्रय हेलसकर, प्रा. सुहास सदाव्रते, जयश्री सोन्नेकर, प्रा. दिगंबर दाते, प्रा. बसवराज कोरे, डॉ. रावसाहेब ढवळे, युनिस हिंगोरा, उपप्राचार्य रामराजे रामराजे लाखे, सुनील मतकर, नागेश मापारी, आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)