शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
2
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
3
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
4
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
5
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
6
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
7
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
8
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
9
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
10
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
11
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
12
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
13
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
14
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
15
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
16
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
17
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
18
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
19
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
20
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”

बरखास्त केलेली भरारी पथके पुन्हा कार्यान्वित

By admin | Updated: October 30, 2014 00:30 IST

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात बुधवारपासून पदवी परीक्षांना सुरुवात झाली

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात बुधवारपासून पदवी परीक्षांना सुरुवात झाली. परीक्षा सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला म्हणजेच मंगळवारी रात्री कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी तडकाफडकी १७ भरारी पथके बरखास्त करण्याचा धक्कादायक निर्णय घेतला होता. आज बामुक्टा या संघटनेच्या शिष्टमंळाने कुलगुरूंची भेट घेऊन विविध तांत्रिक बाबी निदर्शनास आणून दिल्यावर भरारी पथके पुन्हा कार्यान्वित करण्यात आली.विद्यापीठ प्रशासनाने यंदा कॉपीमुक्त धोरण कडकपणे राबविण्याचा निर्णय घेतला आहे. एखादा विद्यार्थी कॉपी करताना पकडला गेल्यास त्याचा संपूर्ण वर्षाचा परफॉर्मन्स रद्द करण्याचा निर्णयही प्रशासनाने घेतलाय. परीक्षा मंडळातील ज्येष्ठ सदस्य डॉ. कल्याण लघाने यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीच्या निर्देशाप्रमाणे विद्यापीठ कार्यक्षेत्रात म्हणजेच चार जिल्ह्यांमध्ये १७ भरारी पथके नेमली होती. भरारी पथके स्थापन करताना त्यामध्ये प्राध्यापकांची सेवाज्येष्ठता, आरक्षण व महिला या तिन्ही निकषांची पूर्तता करण्यात आलेली नाही, म्हणून कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी मंगळवारी रात्री उशिरा सर्व १७ भरारी पथके बरखास्त करण्याचा निर्णय घेतला होता.आज बामुक्टा संघटनेच्या शिष्टमंडळाने कुलगुरूंची भेट घेऊन सेवाज्येष्ठता, आरक्षण, महिलांचा समावेश असल्याबद्दलची सर्व माहिती दिली. तब्बल ४५ मिनिटे चर्चा करण्यात आली. त्यानंतर कुलगुरू डॉ. चोपडे यांनी सर्व भरारी पथके पुन्हा कार्यान्वित करण्यात येत असल्याचे जाहीर केले. शिष्टमंडळात अधिष्ठाता विलास खंदारे, डॉ. एस.एस. शेख, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य शिवाजी कदम, सिनेट सदस्य डॉ. गणी पटेल, डॉ. संभाजी वाघमारे, डॉ. जिगे, डॉ. लक्ष्मीकांत शिंदे, डॉ. संजय सांभाळकर, डॉ. संजय पाटील, बाबा सलामपुरे आदींची उपस्थिती होती.