शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
3
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
4
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
5
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
6
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
7
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
8
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
9
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
10
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
11
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत
12
‘इंडिया’ आघाडी सरकारला आठ मुद्द्यांवर घेरणार! अधिवेशनापूर्वी घटक पक्षांची व्हर्च्युअल बैठक
13
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग
14
७ राज्यांत पेच; भाजपच्या अध्यक्ष निवडीला विलंब, २९ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्या पूर्ण!
15
सरकारी कार्यालयांच्या वेळा वेगवेगळ्या; मुंबईत गर्दी कमी करण्यासाठी नवीन उपाय!
16
डिजिटल अरेस्टच्या गुन्ह्यात देशात पहिल्यांदाच शिक्षा; पश्चिम बंगालमध्ये ९ जणांना जन्मठेप, उत्तर प्रदेशात ७ वर्षांची शिक्षा
17
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
18
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
19
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
20
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू

बरखास्त केलेली भरारी पथके पुन्हा कार्यान्वित

By admin | Updated: October 30, 2014 00:30 IST

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात बुधवारपासून पदवी परीक्षांना सुरुवात झाली

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात बुधवारपासून पदवी परीक्षांना सुरुवात झाली. परीक्षा सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला म्हणजेच मंगळवारी रात्री कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी तडकाफडकी १७ भरारी पथके बरखास्त करण्याचा धक्कादायक निर्णय घेतला होता. आज बामुक्टा या संघटनेच्या शिष्टमंळाने कुलगुरूंची भेट घेऊन विविध तांत्रिक बाबी निदर्शनास आणून दिल्यावर भरारी पथके पुन्हा कार्यान्वित करण्यात आली.विद्यापीठ प्रशासनाने यंदा कॉपीमुक्त धोरण कडकपणे राबविण्याचा निर्णय घेतला आहे. एखादा विद्यार्थी कॉपी करताना पकडला गेल्यास त्याचा संपूर्ण वर्षाचा परफॉर्मन्स रद्द करण्याचा निर्णयही प्रशासनाने घेतलाय. परीक्षा मंडळातील ज्येष्ठ सदस्य डॉ. कल्याण लघाने यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीच्या निर्देशाप्रमाणे विद्यापीठ कार्यक्षेत्रात म्हणजेच चार जिल्ह्यांमध्ये १७ भरारी पथके नेमली होती. भरारी पथके स्थापन करताना त्यामध्ये प्राध्यापकांची सेवाज्येष्ठता, आरक्षण व महिला या तिन्ही निकषांची पूर्तता करण्यात आलेली नाही, म्हणून कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी मंगळवारी रात्री उशिरा सर्व १७ भरारी पथके बरखास्त करण्याचा निर्णय घेतला होता.आज बामुक्टा संघटनेच्या शिष्टमंडळाने कुलगुरूंची भेट घेऊन सेवाज्येष्ठता, आरक्षण, महिलांचा समावेश असल्याबद्दलची सर्व माहिती दिली. तब्बल ४५ मिनिटे चर्चा करण्यात आली. त्यानंतर कुलगुरू डॉ. चोपडे यांनी सर्व भरारी पथके पुन्हा कार्यान्वित करण्यात येत असल्याचे जाहीर केले. शिष्टमंडळात अधिष्ठाता विलास खंदारे, डॉ. एस.एस. शेख, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य शिवाजी कदम, सिनेट सदस्य डॉ. गणी पटेल, डॉ. संभाजी वाघमारे, डॉ. जिगे, डॉ. लक्ष्मीकांत शिंदे, डॉ. संजय सांभाळकर, डॉ. संजय पाटील, बाबा सलामपुरे आदींची उपस्थिती होती.