शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

बरखास्त केलेली भरारी पथके पुन्हा कार्यान्वित

By admin | Updated: October 30, 2014 00:30 IST

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात बुधवारपासून पदवी परीक्षांना सुरुवात झाली

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात बुधवारपासून पदवी परीक्षांना सुरुवात झाली. परीक्षा सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला म्हणजेच मंगळवारी रात्री कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी तडकाफडकी १७ भरारी पथके बरखास्त करण्याचा धक्कादायक निर्णय घेतला होता. आज बामुक्टा या संघटनेच्या शिष्टमंळाने कुलगुरूंची भेट घेऊन विविध तांत्रिक बाबी निदर्शनास आणून दिल्यावर भरारी पथके पुन्हा कार्यान्वित करण्यात आली.विद्यापीठ प्रशासनाने यंदा कॉपीमुक्त धोरण कडकपणे राबविण्याचा निर्णय घेतला आहे. एखादा विद्यार्थी कॉपी करताना पकडला गेल्यास त्याचा संपूर्ण वर्षाचा परफॉर्मन्स रद्द करण्याचा निर्णयही प्रशासनाने घेतलाय. परीक्षा मंडळातील ज्येष्ठ सदस्य डॉ. कल्याण लघाने यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीच्या निर्देशाप्रमाणे विद्यापीठ कार्यक्षेत्रात म्हणजेच चार जिल्ह्यांमध्ये १७ भरारी पथके नेमली होती. भरारी पथके स्थापन करताना त्यामध्ये प्राध्यापकांची सेवाज्येष्ठता, आरक्षण व महिला या तिन्ही निकषांची पूर्तता करण्यात आलेली नाही, म्हणून कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी मंगळवारी रात्री उशिरा सर्व १७ भरारी पथके बरखास्त करण्याचा निर्णय घेतला होता.आज बामुक्टा संघटनेच्या शिष्टमंडळाने कुलगुरूंची भेट घेऊन सेवाज्येष्ठता, आरक्षण, महिलांचा समावेश असल्याबद्दलची सर्व माहिती दिली. तब्बल ४५ मिनिटे चर्चा करण्यात आली. त्यानंतर कुलगुरू डॉ. चोपडे यांनी सर्व भरारी पथके पुन्हा कार्यान्वित करण्यात येत असल्याचे जाहीर केले. शिष्टमंडळात अधिष्ठाता विलास खंदारे, डॉ. एस.एस. शेख, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य शिवाजी कदम, सिनेट सदस्य डॉ. गणी पटेल, डॉ. संभाजी वाघमारे, डॉ. जिगे, डॉ. लक्ष्मीकांत शिंदे, डॉ. संजय सांभाळकर, डॉ. संजय पाटील, बाबा सलामपुरे आदींची उपस्थिती होती.