शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

रशियन स्टील कंपनीच्या प्लांट उभारणीला सुुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 07:27 IST

औरंगाबाद : दिवाळीचा मुहूर्त साधत ‘नोव्होलिपेत्सक स्टील’ (एनएलएमके) या रशियातील सर्वात मोठ्या स्टील उद्योगाने ‘ऑरिक सिटी’मध्ये प्लांट उभारणीच्या कामाला ...

औरंगाबाद : दिवाळीचा मुहूर्त साधत ‘नोव्होलिपेत्सक स्टील’ (एनएलएमके) या रशियातील सर्वात मोठ्या स्टील उद्योगाने ‘ऑरिक सिटी’मध्ये प्लांट उभारणीच्या कामाला सुरुवात केली आहे. ही बहुराष्ट्रीय कंपनी दोन टप्प्यांत तब्बल ५ हजार ८०० कोटी रुपयांची गुंतवणूक औरंगाबादेत करणार आहे.

करमाड रेल्वेस्टेशनच्या अलीकडे ऑरिक सिटीलगत सुमारे ४३ एकरवर (१ लाख ७७ हजार ५३७ चौरस मीटर) हा प्रकल्प उभारला जाणार आहे. ‘एनएलएमके’ ही कंपनी ट्रान्सफॉर्मरसाठी लागणारे विशेष स्टील तयार करते. भारतासह जगभरातील ३०-४० देशांत ही कंपनी स्टीलचा पुरवठा करते. या कंपनीच्या माध्यमातून सुमारे दीड हजार स्थानिकांना रोजगार मिळेल, तसेच निर्यातीलाही चालना मिळणार आहे. जागा ताब्यात घेऊन लगेच उद्योगाची पायाभरणी करण्यासाठी या उद्योगाच्या लेखा व आयटी विभागाचे प्रमुख राकेशकुमार श्रीवास्तव, तसेच एक रशियन प्रतिनिधी औरंगाबादेत आले. त्यांनी ५ नोव्हेंबर रोजी ‘ऑरिक’लगतच्या जागेचा ताबा घेतला. त्यानंतर या उद्योगाच्या प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट टीममार्फत प्रत्यक्ष प्लांट उभारणीच्या कामाला सुरुवात झाली आहे.

ऑगस्ट महिन्यामध्ये ‘एनएलएमके’च्या रशियातील मुख्य कार्यालयातून जागेचा ताबा घेऊन लगेच प्लांट उभारणीच्या कामाला सुरुवात करता येईल का, अशी विचारणा ''''एमआयडीसी''''चे तत्कालीन सहमुख्य कार्यकारी अधिकारी, तथा ''''ऑरिक''''चे व्यवस्थापकीय संचालक कैलास जाधव यांच्याकडे मेलद्वारे विचारणा केली होती. औरंगाबादेतील कोरोनाची सद्य:स्थिती कशी आहे. लॉकडाऊनची स्थिती कशी आहे. प्लांट उभारणीसाठी बांधकाम मजूर उपलब्ध होतील का. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, राज्य, तसेच केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांबाबत विचारणा करण्यात आली होती. तेव्हा कैलास जाधव यांनी या उद्योगाच्या रशियातील व्यवस्थापकीय संचालकांना तात्काळ उत्तर दिले व सप्टेंबर महिना किंवा त्यानंतर कधीही औरंगाबादेत येऊन ताबा घेऊ शकता व लगेच बांधकामालाही सुरुवात करता येईल, असे कळविले होते.

चौकट.....

‘आरबी’ समूहाचीही तयारी

घर, बाथरूम, कपडे स्वच्छ करण्यासाठी लागणारे हार्पिक, लायसॉल, डेटॉल, वनिश, फिनिश आदी आंतरराष्ट्रीय दर्जाची उत्पादने तयार करणाऱ्या रेकीट बेंकिजर (आरबी) या उद्योग समूहाने औरंगाबादेत कंपनी सुरू करण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, केंद्र व राज्य शासनाकडून मिळणाऱ्या सवलतीबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असल्यामुळे या कंपनीचा सामंजस्य करार तूर्तास थांबला आहे.