शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

रशियन स्टील कंपनीच्या प्लांट उभारणीला सुुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 07:27 IST

औरंगाबाद : दिवाळीचा मुहूर्त साधत ‘नोव्होलिपेत्सक स्टील’ (एनएलएमके) या रशियातील सर्वात मोठ्या स्टील उद्योगाने ‘ऑरिक सिटी’मध्ये प्लांट उभारणीच्या कामाला ...

औरंगाबाद : दिवाळीचा मुहूर्त साधत ‘नोव्होलिपेत्सक स्टील’ (एनएलएमके) या रशियातील सर्वात मोठ्या स्टील उद्योगाने ‘ऑरिक सिटी’मध्ये प्लांट उभारणीच्या कामाला सुरुवात केली आहे. ही बहुराष्ट्रीय कंपनी दोन टप्प्यांत तब्बल ५ हजार ८०० कोटी रुपयांची गुंतवणूक औरंगाबादेत करणार आहे.

करमाड रेल्वेस्टेशनच्या अलीकडे ऑरिक सिटीलगत सुमारे ४३ एकरवर (१ लाख ७७ हजार ५३७ चौरस मीटर) हा प्रकल्प उभारला जाणार आहे. ‘एनएलएमके’ ही कंपनी ट्रान्सफॉर्मरसाठी लागणारे विशेष स्टील तयार करते. भारतासह जगभरातील ३०-४० देशांत ही कंपनी स्टीलचा पुरवठा करते. या कंपनीच्या माध्यमातून सुमारे दीड हजार स्थानिकांना रोजगार मिळेल, तसेच निर्यातीलाही चालना मिळणार आहे. जागा ताब्यात घेऊन लगेच उद्योगाची पायाभरणी करण्यासाठी या उद्योगाच्या लेखा व आयटी विभागाचे प्रमुख राकेशकुमार श्रीवास्तव, तसेच एक रशियन प्रतिनिधी औरंगाबादेत आले. त्यांनी ५ नोव्हेंबर रोजी ‘ऑरिक’लगतच्या जागेचा ताबा घेतला. त्यानंतर या उद्योगाच्या प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट टीममार्फत प्रत्यक्ष प्लांट उभारणीच्या कामाला सुरुवात झाली आहे.

ऑगस्ट महिन्यामध्ये ‘एनएलएमके’च्या रशियातील मुख्य कार्यालयातून जागेचा ताबा घेऊन लगेच प्लांट उभारणीच्या कामाला सुरुवात करता येईल का, अशी विचारणा ''''एमआयडीसी''''चे तत्कालीन सहमुख्य कार्यकारी अधिकारी, तथा ''''ऑरिक''''चे व्यवस्थापकीय संचालक कैलास जाधव यांच्याकडे मेलद्वारे विचारणा केली होती. औरंगाबादेतील कोरोनाची सद्य:स्थिती कशी आहे. लॉकडाऊनची स्थिती कशी आहे. प्लांट उभारणीसाठी बांधकाम मजूर उपलब्ध होतील का. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, राज्य, तसेच केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांबाबत विचारणा करण्यात आली होती. तेव्हा कैलास जाधव यांनी या उद्योगाच्या रशियातील व्यवस्थापकीय संचालकांना तात्काळ उत्तर दिले व सप्टेंबर महिना किंवा त्यानंतर कधीही औरंगाबादेत येऊन ताबा घेऊ शकता व लगेच बांधकामालाही सुरुवात करता येईल, असे कळविले होते.

चौकट.....

‘आरबी’ समूहाचीही तयारी

घर, बाथरूम, कपडे स्वच्छ करण्यासाठी लागणारे हार्पिक, लायसॉल, डेटॉल, वनिश, फिनिश आदी आंतरराष्ट्रीय दर्जाची उत्पादने तयार करणाऱ्या रेकीट बेंकिजर (आरबी) या उद्योग समूहाने औरंगाबादेत कंपनी सुरू करण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, केंद्र व राज्य शासनाकडून मिळणाऱ्या सवलतीबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असल्यामुळे या कंपनीचा सामंजस्य करार तूर्तास थांबला आहे.