शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाला खरेदी-विक्रीसाठी झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धुडकावत भरला अडत बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 14:19 IST

शेतकऱ्यांनी रात्री ११.०० ते ११.३० वाजेच्या सुमारास बाजार समितीचे मुख्य प्रवेशद्वार उघडले व आत प्रवेश केला.

ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाने बुधवारी रात्री ९ वाजता अचानक अडत बाजार तूर्त बंद ठेवण्याचा तोंडी आदेश दिला भाजीपाला घेऊन आलेले शेतकरी या प्रकारामुळे संतापले.

औरंगाबाद : भाजीपाल्याचा अडत बाजार तूर्त बंद ठेवण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश गुंडाळून ठेवत जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी पहाटेपासूनच भाजीपाला खरेदी- विक्री सुरू करण्यात आली. खरेदीसाठी नागरिक, विक्रेत्यांची प्रचंड गर्दी उसळली. यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

फळ व भाजीपाल्याच्या अडत बाजारात होणारी प्रचंड गर्दी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दि.११ ते १७ मार्चदरम्यान भाजीपाल्याचा अडत बाजार बंद ठेवण्याआ आदेश दिला होता. या काळात शेतकरी व किरकोळ विक्रेत्यांनी बाजार समितीबाहेरील सनी मार्केट ते पिसादेवी रस्त्यावर भाजीपाला विक्री करणे सुरू केले. यामुळे वाहतूक खोळंबून नवीन समस्या निर्माण झाली. त्यात शेतकरी व विक्रेत्यांना पोलिसांच्या काठीचा मारही खावा लागला. भाजीपाला अडत बाजार लॉकडाऊनची मुदत बुधवारी (दि.१७) संपली. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भाजीपाला विक्रीला आणला, अडत्यांनी परजिल्हा व परराज्यातून फळे व भाज्या मागविल्या होत्या. मात्र, जिल्हा प्रशासनाने बुधवारी रात्री ९ वाजता अचानक भाजीपाल्याचा अडत बाजार तूर्त बंद ठेवण्याचा तोंडी आदेश बाजार समितीला दिला. बाजार समितीने मुख्य प्रवेशद्वार बंद केले. भाजीपाला घेऊन आलेले शेतकरी या प्रकारामुळे संतापले. तालुक्यातील काही शेतकरी नेत्यांनी बाजार समितीचे सभापती राधाकिसन पठाडे यांना फोन लावून अडत बाजार सुरू करण्याची विनंती केली.

शेतकऱ्यांनी रात्री ११.०० ते ११.३० वाजेच्या सुमारास बाजार समितीचे मुख्य प्रवेशद्वार उघडले व आत प्रवेश केला. पहाटे अडत बाजारात व्यवहार सुरू झाले. किरकोळ विक्रेत्यांनी दुकाने मांडली. शहरातील फेरीवालेही पोहोचले. त्यापाठोपाठ ग्राहकही खरेदीसाठी जमले. बाजारात हजारो लोकांची गर्दी झाली. त्यातील अनेक जण विनामास्कच होते. नियोजनाअभावी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. कोरोनासंसर्ग रोखण्याची जबाबदारी व अधिकार राज्य सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करणे सर्वांची जबाबदारी आहे. बंदचा आदेश धुडकावत बाजाराचे दरवाजे कोणाच्या सांगण्यावरून उघडले. बंदी असूनही हजारो लोक एकत्र येतात. यास शेतकरी, अडते, किरकोळ विक्रेते, सभापती राधाकिसन पठाडे की सचिव विजय शिरसाट जबाबदार आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मनपा जबाबदारी झटकतेयशहरातील विविध मैदानांत किरकोळ विक्रेत्यांना भाजी विक्रीला परवानगी देणे, हे काम महानगरपालिकेचे आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फक्त अडत व्यवहार होतात. मात्र, मनपा आपली जबाबदारी झटकत असल्याने जाधववाडी बाजार समितीत प्रचंड गर्दी होत आहे व सर्व नियोजन कोलमडून जाते.-राधाकिसन पठाडे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद