शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाला खरेदी-विक्रीसाठी झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धुडकावत भरला अडत बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 14:19 IST

शेतकऱ्यांनी रात्री ११.०० ते ११.३० वाजेच्या सुमारास बाजार समितीचे मुख्य प्रवेशद्वार उघडले व आत प्रवेश केला.

ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाने बुधवारी रात्री ९ वाजता अचानक अडत बाजार तूर्त बंद ठेवण्याचा तोंडी आदेश दिला भाजीपाला घेऊन आलेले शेतकरी या प्रकारामुळे संतापले.

औरंगाबाद : भाजीपाल्याचा अडत बाजार तूर्त बंद ठेवण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश गुंडाळून ठेवत जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी पहाटेपासूनच भाजीपाला खरेदी- विक्री सुरू करण्यात आली. खरेदीसाठी नागरिक, विक्रेत्यांची प्रचंड गर्दी उसळली. यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

फळ व भाजीपाल्याच्या अडत बाजारात होणारी प्रचंड गर्दी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दि.११ ते १७ मार्चदरम्यान भाजीपाल्याचा अडत बाजार बंद ठेवण्याआ आदेश दिला होता. या काळात शेतकरी व किरकोळ विक्रेत्यांनी बाजार समितीबाहेरील सनी मार्केट ते पिसादेवी रस्त्यावर भाजीपाला विक्री करणे सुरू केले. यामुळे वाहतूक खोळंबून नवीन समस्या निर्माण झाली. त्यात शेतकरी व विक्रेत्यांना पोलिसांच्या काठीचा मारही खावा लागला. भाजीपाला अडत बाजार लॉकडाऊनची मुदत बुधवारी (दि.१७) संपली. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भाजीपाला विक्रीला आणला, अडत्यांनी परजिल्हा व परराज्यातून फळे व भाज्या मागविल्या होत्या. मात्र, जिल्हा प्रशासनाने बुधवारी रात्री ९ वाजता अचानक भाजीपाल्याचा अडत बाजार तूर्त बंद ठेवण्याचा तोंडी आदेश बाजार समितीला दिला. बाजार समितीने मुख्य प्रवेशद्वार बंद केले. भाजीपाला घेऊन आलेले शेतकरी या प्रकारामुळे संतापले. तालुक्यातील काही शेतकरी नेत्यांनी बाजार समितीचे सभापती राधाकिसन पठाडे यांना फोन लावून अडत बाजार सुरू करण्याची विनंती केली.

शेतकऱ्यांनी रात्री ११.०० ते ११.३० वाजेच्या सुमारास बाजार समितीचे मुख्य प्रवेशद्वार उघडले व आत प्रवेश केला. पहाटे अडत बाजारात व्यवहार सुरू झाले. किरकोळ विक्रेत्यांनी दुकाने मांडली. शहरातील फेरीवालेही पोहोचले. त्यापाठोपाठ ग्राहकही खरेदीसाठी जमले. बाजारात हजारो लोकांची गर्दी झाली. त्यातील अनेक जण विनामास्कच होते. नियोजनाअभावी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. कोरोनासंसर्ग रोखण्याची जबाबदारी व अधिकार राज्य सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करणे सर्वांची जबाबदारी आहे. बंदचा आदेश धुडकावत बाजाराचे दरवाजे कोणाच्या सांगण्यावरून उघडले. बंदी असूनही हजारो लोक एकत्र येतात. यास शेतकरी, अडते, किरकोळ विक्रेते, सभापती राधाकिसन पठाडे की सचिव विजय शिरसाट जबाबदार आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मनपा जबाबदारी झटकतेयशहरातील विविध मैदानांत किरकोळ विक्रेत्यांना भाजी विक्रीला परवानगी देणे, हे काम महानगरपालिकेचे आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फक्त अडत व्यवहार होतात. मात्र, मनपा आपली जबाबदारी झटकत असल्याने जाधववाडी बाजार समितीत प्रचंड गर्दी होत आहे व सर्व नियोजन कोलमडून जाते.-राधाकिसन पठाडे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद