शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
2
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
3
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
6
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
7
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
8
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
9
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
10
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
11
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
12
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
13
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
14
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
15
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
16
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
17
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!
18
चिनी विद्यार्थिनीला युक्रेनियन तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवल्याची शिक्षा, विद्यापीठानं उचललं टोकाचं पाऊल
19
नॅशनल पार्कमधील ‘वनराणी’चे रुपडे पालटले; व्हिस्टाडोमसह नव्या अवतारात सेवेत, कधी सुरू होणार?
20
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं

भाजीपाला खरेदी-विक्रीसाठी झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धुडकावत भरला अडत बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 14:19 IST

शेतकऱ्यांनी रात्री ११.०० ते ११.३० वाजेच्या सुमारास बाजार समितीचे मुख्य प्रवेशद्वार उघडले व आत प्रवेश केला.

ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाने बुधवारी रात्री ९ वाजता अचानक अडत बाजार तूर्त बंद ठेवण्याचा तोंडी आदेश दिला भाजीपाला घेऊन आलेले शेतकरी या प्रकारामुळे संतापले.

औरंगाबाद : भाजीपाल्याचा अडत बाजार तूर्त बंद ठेवण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश गुंडाळून ठेवत जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी पहाटेपासूनच भाजीपाला खरेदी- विक्री सुरू करण्यात आली. खरेदीसाठी नागरिक, विक्रेत्यांची प्रचंड गर्दी उसळली. यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

फळ व भाजीपाल्याच्या अडत बाजारात होणारी प्रचंड गर्दी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दि.११ ते १७ मार्चदरम्यान भाजीपाल्याचा अडत बाजार बंद ठेवण्याआ आदेश दिला होता. या काळात शेतकरी व किरकोळ विक्रेत्यांनी बाजार समितीबाहेरील सनी मार्केट ते पिसादेवी रस्त्यावर भाजीपाला विक्री करणे सुरू केले. यामुळे वाहतूक खोळंबून नवीन समस्या निर्माण झाली. त्यात शेतकरी व विक्रेत्यांना पोलिसांच्या काठीचा मारही खावा लागला. भाजीपाला अडत बाजार लॉकडाऊनची मुदत बुधवारी (दि.१७) संपली. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भाजीपाला विक्रीला आणला, अडत्यांनी परजिल्हा व परराज्यातून फळे व भाज्या मागविल्या होत्या. मात्र, जिल्हा प्रशासनाने बुधवारी रात्री ९ वाजता अचानक भाजीपाल्याचा अडत बाजार तूर्त बंद ठेवण्याचा तोंडी आदेश बाजार समितीला दिला. बाजार समितीने मुख्य प्रवेशद्वार बंद केले. भाजीपाला घेऊन आलेले शेतकरी या प्रकारामुळे संतापले. तालुक्यातील काही शेतकरी नेत्यांनी बाजार समितीचे सभापती राधाकिसन पठाडे यांना फोन लावून अडत बाजार सुरू करण्याची विनंती केली.

शेतकऱ्यांनी रात्री ११.०० ते ११.३० वाजेच्या सुमारास बाजार समितीचे मुख्य प्रवेशद्वार उघडले व आत प्रवेश केला. पहाटे अडत बाजारात व्यवहार सुरू झाले. किरकोळ विक्रेत्यांनी दुकाने मांडली. शहरातील फेरीवालेही पोहोचले. त्यापाठोपाठ ग्राहकही खरेदीसाठी जमले. बाजारात हजारो लोकांची गर्दी झाली. त्यातील अनेक जण विनामास्कच होते. नियोजनाअभावी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. कोरोनासंसर्ग रोखण्याची जबाबदारी व अधिकार राज्य सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करणे सर्वांची जबाबदारी आहे. बंदचा आदेश धुडकावत बाजाराचे दरवाजे कोणाच्या सांगण्यावरून उघडले. बंदी असूनही हजारो लोक एकत्र येतात. यास शेतकरी, अडते, किरकोळ विक्रेते, सभापती राधाकिसन पठाडे की सचिव विजय शिरसाट जबाबदार आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मनपा जबाबदारी झटकतेयशहरातील विविध मैदानांत किरकोळ विक्रेत्यांना भाजी विक्रीला परवानगी देणे, हे काम महानगरपालिकेचे आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फक्त अडत व्यवहार होतात. मात्र, मनपा आपली जबाबदारी झटकत असल्याने जाधववाडी बाजार समितीत प्रचंड गर्दी होत आहे व सर्व नियोजन कोलमडून जाते.-राधाकिसन पठाडे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद