शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
3
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
4
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
5
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
6
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
7
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
8
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
9
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
10
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
11
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
12
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
13
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
14
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
15
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
16
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
17
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
18
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
19
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
20
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी

ऑक्सिजन पातळी कमी झाल्यावर ग्रामीण रुग्ण सरळ शहरात ‘रेफर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:02 IST

औरंगाबाद : जिल्ह्यातील ग्रामीण भागातून ऑक्सिजन पातळी कमी होणाऱ्या कोरोना रुग्णांना सरळ शहरात पाठविले जात आहे. असे रुग्ण घाटीत ...

औरंगाबाद : जिल्ह्यातील ग्रामीण भागातून ऑक्सिजन पातळी कमी होणाऱ्या कोरोना रुग्णांना सरळ शहरात पाठविले जात आहे. असे रुग्ण घाटीत येण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा आणि उपचार सुविधांविषयी प्रश्न उपस्थित होत आहे. केंद्रीय पथकानेही ही बाब गंभीरतेने घेत यासंदर्भात सुधारणा करण्याची सूचना केली आहे.

घाटीत बुधवारी झालेल्या बैठकीत केंद्रीय पथकाने शहरातील इतर रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयांतून ऑक्सिजन पातळी अगदी कमी असलेले रुग्ण संदर्भीत होत असल्याबाबत काळजी व्यक्त केली. ज्या रुग्णालयांमधून हे रुग्ण संदर्भीत केले जातात, त्या रुग्णालयांना याबाबत अभिप्राय देऊन अधिक कमी ऑक्सिजन पातळीचे रुग्ण का संदर्भीत करण्यात येतात, याबाबत सखोल विचार करण्याची आवश्यकता असल्याचे पथकाने सांगितल्याची माहिती घाटी प्रशासनातर्फे देण्यात आली.

कोरोनाग्रस्त रुग्णाची प्रकृती गंभीर झाली की, ग्रामीण भागांतून सरळ घाटीत रुग्णांना रेफर केले जात आहे. घाटीत मृत्यू पावलेल्या एकूण रुग्णांत बहुतांश रुग्ण 'रेफर' केलेले आहेत. ग्रामीण भागातील गंभीर रुग्णांना दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. अशांना घाटीत पाठविले जाते. ऑक्सिजन सिलिंडर लावून रुग्णांना अनेक कि.मी.चा प्रवास करीत शहर गाठावे लागत आहे. त्यामुळे उपचाराला उशीर होऊन रुग्णांचा जीव धोक्यात येत आहे.

गंभीर रुग्णांचा वाढता आलेख

घाटीत दाखल गंभीर रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याठिकाणी गुरुवारी गंभीर रुग्णांची संख्या १७७ झाली. तर १५४ रुग्णांची प्रकृती सामान्य आहे. याठिकाणी सामान्य रुग्णांपेक्षा गंभीर रुग्णच अधिक दाखल होत असून, उपचारासाठी डाॅक्टर, परिचारिका, कर्मचारी प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहेत.