शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

ग्रामीण भाग येतोय कोरोनाच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:05 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात गेल्या महिन्यापासून कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत असून, ग्रामीण भाग कोरोनाच्या विळख्यात आला आहे. गेल्या काही दिवसांत ...

औरंगाबाद : जिल्ह्यात गेल्या महिन्यापासून कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत असून, ग्रामीण भाग कोरोनाच्या विळख्यात आला आहे. गेल्या काही दिवसांत शहरासह ग्रामीण भागातही संसर्ग वाढत असून, ज्या गावांमध्ये रुग्णसंख्या जास्त आहे, त्या ठिकाणी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, संबंधित आरोग्य अधिकारी या सर्वांनी एकत्रित प्रयत्नांतून तातडीने संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोमवारी दिले.

सर्व संबंधित यंत्रणा प्रमुखांनी पाहणी करून संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने उपाययोजना, प्रतिबंधात्मक कार्यवाही करावी. कन्नड, पैठण, सिल्लोडसह अन्य तालुक्यांत ज्या ठिकाणी संसर्ग वाढतो आहे, त्या ठिकाणी उपविभागीय अधिकाऱ्यांनी पथकाकडून परिस्थिती नियंत्रणात आणावी. संपर्कातील व्यक्तींच्या वाढीव प्रमाणात चाचण्या कराव्यात. ग्रामीण भागात रोज १०० च्या पुढे रुग्ण आढळत आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोविड संसर्ग प्रतिबंधात्मक उपाय, लसीकरण मोहिमेच्या आढावा बैठकीत चव्हाण बोलत होते. यावेळी जि. प. सीईओ डॉ. मंगेश गोंदावले, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, मनपा अतिरिक्त आयुक्त बी. नेमाने, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. विजय वाघ, एफडीएचे सहसंचालक संजय काळे, डॉ. नीता पाडळकर, डॉ. सुंदर कुलकर्णी, डॉ. एस. शेळके, आदींची उपस्थिती होती.

शिक्षक, आशा सेविकांवर जबाबदारी

शिक्षक, आशा सेविकांच्या पथकाद्वारे सर्वेक्षण, जनजागृती करावी. गावांमध्ये ग्रामसेवक, सरपंच, ग्रामदक्षता समितीच्या साहाय्याने जनजागृती करून रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन चाचण्या कराव्यात. जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेत उपचार सुविधा उभारल्या होत्या. त्या सर्व उपचार सुविधा मनुष्यबळ, आवश्यक साधन सामग्रीसह सज्ज ठेवा. पूर्वीचे सर्व कोविड केअर सेंटर वाढीव रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर तयार ठेवावेत.