शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

आठवडी बाजार बंदमुळे ग्रामीण अर्थकारण 'लॉक'डाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:04 IST

औरंगाबाद : कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील ८ तालुक्यांतील ९२ आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आणि ...

औरंगाबाद : कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील ८ तालुक्यांतील ९२ आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आणि ग्रामीण भागातील अर्थकारण 'लॉक'डाऊन झाले.

आठवडी बाजार म्हणजे नुसती भाजीमंडई नसून त्यावर त्या गावातील अर्थकारण चालते. अर्थात आठवड्यातील एका ठराविक वाराच्या दिवशी भरविण्यात येणारा आठवडी बाजार त्या गावातीलच नव्हे तर पंचक्रोशीतील २० ते २५ गावांचे अर्थकारणाचे केंद्र बनले आहे. यावर त्या गावातील १५० पेक्षा अधिक कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. एवढेच नव्हे तर आठवडी बाजाराच्या लिलावातून ग्रामपंचायतीला मोठी रक्कम मिळते. त्यातून गावात विकासकामे केली जातात. या ९२ आठवडी बाजारांतील एकूण वार्षिक उलाढाल ३०० कोटींपेक्षा अधिक आहे.

या आठवडी बाजारात होणाऱ्या गर्दी मुळे व कोणतेच नियम पाळले जात नसल्याने जिल्हा प्रशासनाने मार्चपासून पुन्हा एकदा आठवडी बाजार बंद केले आहेत. यामुळे आठवडी बाजारावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबांना आता दुसरा रोजगार शोधण्याची वेळ आली आहे.

शेतकऱ्यांना शेतमाल अन्य बाजार समितीमध्ये विकावा लागत आहे. भाजीपाला, धान्य, कडधान्य, खाद्यतेल, किरकोळ विक्रेते, कपडे, कटलरी, मोबाइल ॲक्सेसिरीज आदी विक्रेते आर्थिक अडचणीत आले आहेत. लॉकडाऊन रद्द केला सर्व दुकाने सुरू आहेत. मग आठवडी बाजारच बंद का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. आठवडी बाजारालाही परवानगी देण्यात यावी, अशी मागणी आता पुढे येत आहे.

चौकट

ग्रामपंचायतींना आर्थिक फटका

वडोदाबाजार येथे दर सोमवारी आठवडी बाजार भरतो. जिल्ह्यातील मोठ्या आठवडी बाजारांपैकी हा एक बाजार आहे. येथे राज्य परराज्यातून जनावरे विक्रीला आणली जातात. एका आठवडीबाजारात सुमारे २ ते ३ कोटींची उलाढाल येथे होते. या बाजाराच्या कंत्राटीच्या लिलावातून ग्रामपंचायतीला वार्षिक ५० लाखांपर्यंत उत्त्पन्न मिळते. असे जिल्ह्यात ९२ आठवडी बाजार जिथे भरला जातो त्या सर्व ग्रामपंचायतीला मार्चपासून आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. यामुळे विकासकामे ठप्प झाली आहेत.

गोपाल वाघ

उपसरपंच, वडोदबाजार ग्रामपंचायत

---

दैनंदिन खर्च भागविणे झाले कठीण

आठवडी बाजारात फरसाण विक्रीचा आमचा ७० वर्षांपासून पारंपरिक व्यवसाय आहे. रविवारी मोंढा, सोमवारी करमाड, गुरुवारी छावणी या आठवडी बाजारात फरसाण विकतो आमच्यासारखे २० ते २२ परिवार आहेत. एका आठवडी बाजारात प्रत्येक विक्रेत्यांचा २० हजारांपर्यंत व्यवसाय होतो, पण मार्चपासून बाजार बंद असल्याने आमचा दैनंदिन घर खर्च भागविणे कठीण झाले आहे. हातगाडीवर फरसाण विकत नाही. यामुळे काहींनी रिक्षा चालविणे, काहींनी मोंढ्यात हमाली करणे सुरू केले आहे. मागील वर्षी नोव्हेंबरपर्यंत आठवडी बाजार बंद होते.

जगदीश जैस्वाल

फरसाण विक्रेता