शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात आढळले २० टक्के दूषित पाणी

By admin | Updated: August 12, 2014 01:57 IST

जालना : जिल्ह्यात ग्रामीण भागात २० टक्के पिण्याचे पाणी दूषित असल्याची कबूली जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली असून याबाबत संबंधित ग्रामपंचायतींना

जालना : जिल्ह्यात ग्रामीण भागात २० टक्के पिण्याचे पाणी दूषित असल्याची कबूली जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली असून याबाबत संबंधित ग्रामपंचायतींना दूषित पाण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी विशेष काळजी घेण्याची सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, ग्रामीण भागात साथीचे आजार नसल्याचा दावाही जि.प. आरोग्य विभागाकडून सोमवारी करण्यात आला.‘लोकमत’ ने ग्रामीण भागातील दूषित पाणीपुरवठ्यासंबंधीचे सर्वेक्षण शनिवारी केले होते. या सर्वेक्षणाचे वृत्त रविवारच्या अंकातून प्रसिध्द झाल्यानंतर आरोग्य विभागाला जाग आली. त्यानंतर ग्रामपंचायतींना ही सूचना करण्यात आली.ग्रामीण भागात पावसाळ्यात पाणी दूषित होण्याचे प्रमाण अधिक असते. यामुळे जिल्ह्यात बहुतांश गावांमध्ये दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत. विशेष म्हणजे जि.प.चे कर्मचारी हे मुख्यालयाच्या ठिकाणी रहात नसल्याने गावाला पाणीपुरवठा होणाऱ्या योजनेमध्ये ब्लिचिंग पावडरचा वापर होतो की नाही याकडे कोणाचेही लक्ष नाही. अनेक जलवाहिनी फुटलेल्या आहेत. त्यामुळे नालीचे पाणी त्याद्वारे नळाना येते. अनेक ठिकाणी जलवाहिनी देखील कालबाह्य झालेली आहे. त्यामुळे जलवाहिनीला सतत गळती लागते. जलशुद्धीकरण यंत्र बंद असल्याचे प्रकारही काही ठिकाणी आढळून आले. काही ठिकाणी वेळेवर वीजपुरवठा होत नसल्याने गावात नियमित पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे कुपनलिकांमधील पाणी ग्रामस्थांना घ्यावे लागते. अशा कुपनलिकांभोवती घाणीचे साम्राज्य, गटारेही असतात. त्यामुळे हे पाणीही दूषित असते. जिल्ह्यात गोदाकाठावर सुमारे ४० गावांमध्ये तर बारा महिने दूषित पाणी असते. मात्र याकडेही आरोग्य विभागाचे दुर्लक्ष असल्याचे जाणवते. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. व्ही.पी. भटकर यांना विचारणा केली असता ग्रामीण भागात २० टक्के दूषित पाणी असल्याचे त्यांनी सांगितले. गावात सार्वजनिक पाणीपुरवठा करताना पाण्याचे शुद्धीकरण करावे, त्यासाठी आवश्यक ब्लिचिंग साठा अगोदरच उपलब्ध ठेवावा, कुठे गटार, घाणीचे साम्राज्य असल्यास तेथे साफसफाई करावी, अशी सूचना आरोग्य विभागासह संबंधित ग्रामपंचायतींना करण्यात आल्याचे डॉ. भटकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)