शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
3
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
4
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
5
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
6
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
7
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
9
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
10
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
11
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
12
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
13
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
14
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
15
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
16
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
17
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
18
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
19
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
20
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या

ग्रामीण भागात आढळले २० टक्के दूषित पाणी

By admin | Updated: August 12, 2014 01:57 IST

जालना : जिल्ह्यात ग्रामीण भागात २० टक्के पिण्याचे पाणी दूषित असल्याची कबूली जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली असून याबाबत संबंधित ग्रामपंचायतींना

जालना : जिल्ह्यात ग्रामीण भागात २० टक्के पिण्याचे पाणी दूषित असल्याची कबूली जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली असून याबाबत संबंधित ग्रामपंचायतींना दूषित पाण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी विशेष काळजी घेण्याची सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, ग्रामीण भागात साथीचे आजार नसल्याचा दावाही जि.प. आरोग्य विभागाकडून सोमवारी करण्यात आला.‘लोकमत’ ने ग्रामीण भागातील दूषित पाणीपुरवठ्यासंबंधीचे सर्वेक्षण शनिवारी केले होते. या सर्वेक्षणाचे वृत्त रविवारच्या अंकातून प्रसिध्द झाल्यानंतर आरोग्य विभागाला जाग आली. त्यानंतर ग्रामपंचायतींना ही सूचना करण्यात आली.ग्रामीण भागात पावसाळ्यात पाणी दूषित होण्याचे प्रमाण अधिक असते. यामुळे जिल्ह्यात बहुतांश गावांमध्ये दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत. विशेष म्हणजे जि.प.चे कर्मचारी हे मुख्यालयाच्या ठिकाणी रहात नसल्याने गावाला पाणीपुरवठा होणाऱ्या योजनेमध्ये ब्लिचिंग पावडरचा वापर होतो की नाही याकडे कोणाचेही लक्ष नाही. अनेक जलवाहिनी फुटलेल्या आहेत. त्यामुळे नालीचे पाणी त्याद्वारे नळाना येते. अनेक ठिकाणी जलवाहिनी देखील कालबाह्य झालेली आहे. त्यामुळे जलवाहिनीला सतत गळती लागते. जलशुद्धीकरण यंत्र बंद असल्याचे प्रकारही काही ठिकाणी आढळून आले. काही ठिकाणी वेळेवर वीजपुरवठा होत नसल्याने गावात नियमित पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे कुपनलिकांमधील पाणी ग्रामस्थांना घ्यावे लागते. अशा कुपनलिकांभोवती घाणीचे साम्राज्य, गटारेही असतात. त्यामुळे हे पाणीही दूषित असते. जिल्ह्यात गोदाकाठावर सुमारे ४० गावांमध्ये तर बारा महिने दूषित पाणी असते. मात्र याकडेही आरोग्य विभागाचे दुर्लक्ष असल्याचे जाणवते. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. व्ही.पी. भटकर यांना विचारणा केली असता ग्रामीण भागात २० टक्के दूषित पाणी असल्याचे त्यांनी सांगितले. गावात सार्वजनिक पाणीपुरवठा करताना पाण्याचे शुद्धीकरण करावे, त्यासाठी आवश्यक ब्लिचिंग साठा अगोदरच उपलब्ध ठेवावा, कुठे गटार, घाणीचे साम्राज्य असल्यास तेथे साफसफाई करावी, अशी सूचना आरोग्य विभागासह संबंधित ग्रामपंचायतींना करण्यात आल्याचे डॉ. भटकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)