शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

आसूड बैलांवर नव्हे, सरकारवर चालवा

By admin | Updated: April 15, 2017 00:28 IST

उस्मानाबाद :सरकारची मानसिकता ही शेतकऱ्यांच्या विरोधात असून, शेतकऱ्यांचा आसूड बैलावर नाही तर सरकारवर चालविला पाहिजे, असे प्रतिपादन आ़ बच्चू कडू यांनी केले़

उस्मानाबाद : कर्जमाफी केल्यावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाहीत, याची हमी मुख्यमंत्री मागत आहेत़ मात्र, नोकरदारांना सातवा वेतन आयोग लागू केल्यावर भ्रष्टाचार होणार नाही, याची हमी मुख्यमंत्र्यांनी दिली होती का ? असा सवाल करीत सरकारची मानसिकता ही शेतकऱ्यांच्या विरोधात असून, शेतकऱ्यांचा आसूड बैलावर नाही तर सरकारवर चालविला पाहिजे, असे प्रतिपादन आ़ बच्चू कडू यांनी केले़शेतकरी संघटना व प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शेतकरी, शेतमजूर, उद्योजक, दिव्यांग, विधवा आणि सैनिकांच्या हक्कासाठी ‘सीएम टू पीएम’ शेतकरी आसूड यात्रा काढण्यात आली आहे. सदरील यात्रा ११ एप्रिलपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरापासून सुरु करण्यात आली असून, २१ एप्रिल रोजी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात येथील वडनगर मधील घरावर जाणार आहे. ही यात्रा शुक्रवारी उस्मानाबाद शहरात दाखल झाली़ या यात्रेचे शहरात स्वागत करण्यात आले़ त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत आ़ कडू बोलत होते़ यावेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील, कार्याध्यक्ष कालिदास आपेट, मराठवाडा अध्यक्ष रामजीवन बोंदर, प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष मयूर काकडे, चंद्रकांत जाधव आदींची उपस्थिती होती़ आ़ कडू म्हणाले, राज्यात साडेतीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत़ ही साधी बाब नाही. सरकारची शेतकऱ्यांविषयींची मानसिकता काय आहे, हे तपासण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यापासून ते पंतप्रधानापर्यंत सर्वांना शेतकऱ्यांचे प्रश्न कळावेत, सरकार चालविणाऱ्यांना जाग आणण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करुन शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी ही आसूड यात्रा काढल्याचेही ते म्हणाले़ शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील म्हणाले, शेतकरी आत्महत्या करत आहेत. राज्यकर्त्यांना तरीही शरम नाही़ निवडणुकीपूर्वी जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने वाऱ्यावर सोडली आहेत. हे शासन येवून तीन वर्षे झाली मात्र अधिकाऱ्यांच्या तोंडून नेते आजही बोलत आहेत. त्यामुळे या विरोधात ही आमची लढाई आहे. शासनाने शेतकरी, कष्टकरी जनतेचे प्रश्न नाही सोडविले तर ही जनता त्यांना गावात फिरकू देणार नाही, असे पाटील म्हणाले़ (प्रतिनिधी)