शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

आसूड बैलांवर नव्हे, सरकारवर चालवा

By admin | Updated: April 15, 2017 00:28 IST

उस्मानाबाद :सरकारची मानसिकता ही शेतकऱ्यांच्या विरोधात असून, शेतकऱ्यांचा आसूड बैलावर नाही तर सरकारवर चालविला पाहिजे, असे प्रतिपादन आ़ बच्चू कडू यांनी केले़

उस्मानाबाद : कर्जमाफी केल्यावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाहीत, याची हमी मुख्यमंत्री मागत आहेत़ मात्र, नोकरदारांना सातवा वेतन आयोग लागू केल्यावर भ्रष्टाचार होणार नाही, याची हमी मुख्यमंत्र्यांनी दिली होती का ? असा सवाल करीत सरकारची मानसिकता ही शेतकऱ्यांच्या विरोधात असून, शेतकऱ्यांचा आसूड बैलावर नाही तर सरकारवर चालविला पाहिजे, असे प्रतिपादन आ़ बच्चू कडू यांनी केले़शेतकरी संघटना व प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शेतकरी, शेतमजूर, उद्योजक, दिव्यांग, विधवा आणि सैनिकांच्या हक्कासाठी ‘सीएम टू पीएम’ शेतकरी आसूड यात्रा काढण्यात आली आहे. सदरील यात्रा ११ एप्रिलपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरापासून सुरु करण्यात आली असून, २१ एप्रिल रोजी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात येथील वडनगर मधील घरावर जाणार आहे. ही यात्रा शुक्रवारी उस्मानाबाद शहरात दाखल झाली़ या यात्रेचे शहरात स्वागत करण्यात आले़ त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत आ़ कडू बोलत होते़ यावेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील, कार्याध्यक्ष कालिदास आपेट, मराठवाडा अध्यक्ष रामजीवन बोंदर, प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष मयूर काकडे, चंद्रकांत जाधव आदींची उपस्थिती होती़ आ़ कडू म्हणाले, राज्यात साडेतीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत़ ही साधी बाब नाही. सरकारची शेतकऱ्यांविषयींची मानसिकता काय आहे, हे तपासण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यापासून ते पंतप्रधानापर्यंत सर्वांना शेतकऱ्यांचे प्रश्न कळावेत, सरकार चालविणाऱ्यांना जाग आणण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करुन शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी ही आसूड यात्रा काढल्याचेही ते म्हणाले़ शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील म्हणाले, शेतकरी आत्महत्या करत आहेत. राज्यकर्त्यांना तरीही शरम नाही़ निवडणुकीपूर्वी जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने वाऱ्यावर सोडली आहेत. हे शासन येवून तीन वर्षे झाली मात्र अधिकाऱ्यांच्या तोंडून नेते आजही बोलत आहेत. त्यामुळे या विरोधात ही आमची लढाई आहे. शासनाने शेतकरी, कष्टकरी जनतेचे प्रश्न नाही सोडविले तर ही जनता त्यांना गावात फिरकू देणार नाही, असे पाटील म्हणाले़ (प्रतिनिधी)