शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

योगेश्वरी महोत्सवासाठी कडेकोट बंदोबस्त

By admin | Updated: September 25, 2014 00:54 IST

अंबाजोगाई : महाराष्ट्राचे शक्तीपीठ व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील श्री योगेश्वरी देवीचा नवरात्र महोत्सव २५ सप्टेंबर ते ३ आॅक्टोबर या कालावधीत संपन्न होत आहेत.

अंबाजोगाई : महाराष्ट्राचे शक्तीपीठ व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील श्री योगेश्वरी देवीचा नवरात्र महोत्सव २५ सप्टेंबर ते ३ आॅक्टोबर या कालावधीत संपन्न होत आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. त्या पार्श्वभूमीवर मंदिर सुरक्षा व्यवस्थेसाठी प्रशासनाच्या वतीने ठोस उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. अडीच वर्षापूर्वी योगेश्वरी देवीच्या अंगावरील दागिन्यांची झालेली चोरी, यावरून महाराष्ट्रात उठलेले वादळ तसेच दागिन्यांच्या तपासाबाबत अजूनही असलेली संभ्रमावस्था. अशा घटना पुन्हा घडू नयेत. याची खबरदारी घेत. यावर्षी नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था आखण्यात आली आहे. मंदिर परिसरात १७ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर राहणार आहे. तसेच पोलिस बंदोबस्तासाठी ६० पोलिस चार अधिकारी यांची विविध पथके स्थापन करण्यात आली आहे. मंदिरात मोबाईल नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच प्रवेशद्वारात सुरक्षेसाठी दोन धातूशोधक यंत्र बसविण्यात आले आहेत. चिडीमार पथक, आरोग्यसुविधा देणारी पथके महोत्सवाच्या निमित्ताने स्थापन करण्यात आली आहेत. महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अप्पर पोलिस अधीक्षक मारोती कराडे, पोलिस उपअधीक्षक काकासाहेब डोळे, पोलिस निरीक्षक श्रीराम पौळ, उपजिल्हाधिकारी प्रशांत सुर्यवंशी, तहसीलदार तथा योगेश्वरी देवल कमिटीचे अध्यक्ष राहुल पाटील सचिव कमलाकर चौसाळकर, विश्वस्त भगवानराव शिंदे, मुख्य पुजारी मुकुंद पुजारी, सारंग पुजारी, यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. मंदिर परिसरातील स्वच्छता व विविध सोयीसुविधा भक्तांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे तहसीलदार राहुल पाटील म्हणाले. (वार्ताहर)श्री योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने २५ सप्टेंबर ते ३ आॅक्टोबर या कालावधीत मंदिर परिसरात सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. २५ सप्टेंबर गुरुवारी सकाळी नऊ वाजता घटस्थापनेने नवरात्र महोत्सवास प्रारंभ होणार आहे. याच दिवशी रात्री ८ ते १० या वेळेत ह.भ.प. माधवबुवा शास्त्री यांचे कीर्तन होणार आहे. शुक्रवारपासून दुपारी १ ते रात्री १० वाजेपर्यंत कीर्तन, भजन, महिला भजनी मंडळाचे, संगीत भजन, प्रवचन, अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन सलग नऊ दिवस करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमास भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन देवल कमिटीचे अध्यक्ष तहसीलदार राहुल पाटील, सचिव कमलाकर चौसाळकर, यांनी केले आहे.