शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
2
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
3
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
4
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
7
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
8
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
9
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
10
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
11
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
12
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
13
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
14
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
15
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
16
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
17
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
18
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
19
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
20
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली

आरटीपीसीआरची डेडलाईन संपली; आता व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:05 IST

औरंगाबाद: शहर ७ जूनपासून १०० टक्के अनलॉक करण्यात आले आहे, तर ग्रामीण भागात सायंकाळी ४ वाजेपर्यंत सर्व दुकाने, ...

औरंगाबाद: शहर ७ जूनपासून १०० टक्के अनलॉक करण्यात आले आहे, तर ग्रामीण भागात सायंकाळी ४ वाजेपर्यंत सर्व दुकाने, हॉटेल्स, रेस्टॉरंट सुरू करण्यात आले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर व्यापारी व त्यांच्याकडील कर्मचाऱ्यांना सात दिवसात आरटीपीसीआर चाचण्यांसाठी दिलेली डेडलाईन आता संपली आहे. आरटीपीसीआर चाचण्या न करणाऱ्या व्यापाऱ्यांवर शुक्रवारपासून कारवाईचा बडगा उगारणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मंगळवारी दिला.

७ जूनपासून अनलॉक करताना सर्व दुकानदार हॉटेल, रेस्टॉरंट, बारमालकांना त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचण्या करून घेण्याच्या सूृचना प्रशासनाने दिल्या होत्या. त्यासाठी ७ दिवसांची मुदत देण्यात आली होती. ही मुदत १४ जून रोजी संपली आहे. या मुदतीत ज्या व्यापाऱ्यांनी कोरोना चाचण्या केल्या नाहीत. त्यांच्याविरोधात कारवाईचा इशारा जिल्हाधिकारी चव्हाण यांनी दिला आहे. शहरात मनपा, ग्रामीणमध्ये तहसील, जिल्हा परिषद आणि नगर पालिका प्रशासनाला याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

कोरोनाची दुसरी लाट सर्व घटकांसाठी भयावह ठरली आहे. अर्थकारणासह सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य उपचार मिळण्यात अनेक अडचणी आल्या. त्यामुळे १५ एप्रिलपासून जीवनावश्यक आणि अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद असणारे लॉकडाऊन शासनाने लागू केले होते. दीड महिन्यानंतर राज्यातील १८ जिल्हे लॉकडाऊनमधून बाहेर आले. त्यासाठी पाच स्तर निश्चित करून निर्बंधात शिथिलता दिली. यात औरंगाबाद जिल्ह्याची शहर आणि ग्रामीण अशी विभागणी करून त्यानुसार पॉझिटिव्ह दराचा विचार करण्यात आला.

चौकट...

आधी आवाहन, नंतर कारवाई

अनलॉक झाल्याने बाजारपेठेत गर्दी आहे. त्यात बहुतेक नागरिक, व्यापारी कोरोना नियमावलींकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते आहे. ही बेशिस्त रोखण्यासाठी मनपा, जिल्हा परिषद, तहसील कार्यालयांनी फिरत्या पथकांद्वारे व्यापाऱ्यांसह नागरिकांना मास्क लावा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, कोरोना चाचणी तातडीने करून घ्या, असे आवाहन करण्याच्या सूचना केल्या आहेत. पुढील दोन दिवस हे आवाहन केले जाणार आहे. त्यानंतर दंडात्मक कारवाईला सुरुवात केली जाणार आहे.

सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी.