शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

मराठवाड्यातील आरटीओ निरीक्षकांची पळवापळवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:04 IST

संताेष हिरेमठ औरंगाबाद : कधी मराठवाड्याच्या हक्काचे पाणी पळविले जाते, तर कधी शैक्षणिक संस्था. आता तर मराठवाड्यातील आरटीओ निरीक्षकांचीही ...

संताेष हिरेमठ

औरंगाबाद : कधी मराठवाड्याच्या हक्काचे पाणी पळविले जाते, तर कधी शैक्षणिक संस्था. आता तर मराठवाड्यातील आरटीओ निरीक्षकांचीही पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पळवापळवी केली जात आहे. राज्यात गेल्या महिनाभरात राज्यातील १८५ मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या झाल्या. यात मराठवाड्यातून २१ निरीक्षक गेले. मात्र, त्या बदल्यात केवळ एक निरीक्षक मराठवाड्याला मिळाले.

औरंगाबादसह नांदेड, परभणी, हिंगोली, बीड येथील २१ निरीक्षकांच्या बारामती, मुंबई (मध्य), ठाणे, मुंबई (पश्चिम), पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी, चंद्रपूर, सांगली, वर्धा, सातारा आदी ठिकाणी बदल्या करण्यात आल्या, तर लातूर येथून उमरगा येथे आणि उमरगा येथून लातूरला दोघांची बदली झाली. यात काही विनंतीनुसारही बदल्या करण्यात आल्या आहेत. १८५ जणांमध्ये वाशिम येथून एका मोटार वाहन निरीक्षकाची लातूर येथे बदली झाली; परंतु मराठवाड्यातून बदली होऊन गेलेल्या २१ निरीक्षकांच्या ठिकाणी आता कर्मचारी येण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. निरीक्षक नसल्याचा थेट परिणाम आरटीओ कार्यालयातील कामकाजावर होत आहे. अपुऱ्या निरीक्षकांच्या जोरावरच कामकाज करावे लागत आहे. त्यामुळे मराठवाड्यातील मोटार वाहन निरीक्षक कार्यालयांपुरतेच राहत आहेत. रस्त्यांवर नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या वाहनांवर करवाईचा सगळा भार वाहतूक पोलिसांवर येत आहे.

१५ लाख वाहनांसाठी १७ निरीक्षक

औरंगाबाद जिल्ह्यातील वाहनांची संख्या १५ लाख ३१ हजारांवर गेली आहे. आरटीओ कार्यालयात मोटार वाहन निरीक्षकांची ३० पदे मंजूर आहेत. त्यामुळे आजघडीला १७ पदे भरलेली आहेत, तर १३ पदे रिक्त आहेत. निरीक्षकांअभावी आरटीओ कार्यालयास मिळालेली ३ अत्याधुनिक वाहने अजूनही कार्यालयातच उभी राहत आहेत.

सर्वसामान्य वाहनचालकांना फटका

मराठवाड्यावर नेहमीच अन्याय केला जात आहे. आरटीओ कार्यालयातील रिक्त पदे भरली जात नाही. त्याचा फटका सर्वसामान्य वाहनचालकांना बसत आहे. लायसन्स मिळण्यासाठी दोन-दोन महिने प्रतीक्षा करावी लागते. शासनाने रिक्त पदे तर भरलीच पाहिजेत, बदली होऊन कर्मचारी गेल्यानंतर त्या जागी लगेच अन्य कर्मचारी पाठविले पाहिजेत.

- किरण दळवी, सचिव, महाराष्ट्र मोटार ड्रायव्हिंग स्कूल मालक संघटना