शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

२९६ कोटींचा आराखडा मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2017 23:15 IST

बीड: जिल्ह्याच्या विकासासाठी २०१७-१८ च्या वार्षिक योजनेच्या २९६ कोटी ४० लक्ष रूपयांच्या आराखड्यास मंगळवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली

बीड: जिल्ह्याच्या विकासासाठी २०१७-१८ च्या वार्षिक योजनेच्या २९६ कोटी ४० लक्ष रूपयांच्या आराखड्यास मंगळवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री पंकजा मुंडे या होत्या.जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झालेल्या बैठकीस खासदार डॉ.प्रीतम मुंडे, जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित, आ. भीमराव धोंडे, आ.आर.टी.देशमुख, आ.लक्ष्मण पवार, आ. संगीता ठोंबरे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जि.प.सीईओ नामदेव ननावरे, अप्पर जिल्हाधिकारी अनिल पवार, मराठवाडा विकास मंडळाचे सदस्य शंकरराव नागरे यांची उपस्थिती होती.२०१७-१८ या वर्षात जिल्ह्याच्या विकासासाठी लागणाऱ्या संभाव्य निधीच्या आराखड्याला मान्यता देण्यात आली. २९८ कोटी ४० लक्ष १३ हजार रूपयांच्या जिल्हा वार्षिक योजनेचा आराखडा यावेळी बैठकीत मांडण्यात आला. यामध्ये सर्वसाधारण योजनेसाठी २०४ कोटी ७४ लक्ष रूपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे बैठकीदरम्यान सांगण्यात आले.अनुसूचित जातीसाठी ८९ कोटी...जिल्ह्यातील अनुसूचित जातीतील नागरीकांच्या विकासाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्याच्या उद्देशाने अनुसूचित जाती उपयोजनेसाठी ८९ कोटी ६० लक्ष व आदिवासी उपयोजना बाह्य क्षेत्रासाठी २ कोटी ६ लक्ष १३ हजार रुपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील अनुसूचित जातीतील नागरिकांना विविध योजनांचा लाभ होण्यास मदत होईल. अशी अपेक्षा बैठकी दरम्यान व्यक्त करण्यात आली. कृषीला विशेष प्राधान्यकृषी विषयाला विशेष प्राधान्य देण्याचे ठरले. कृषी व सलंग्न सेवा, ग्रामविकास, पाटबंधारे, पूरनियंत्रण, सामाजिक व सामूहिक सेवा या गाभा क्षेत्रासाठी तसेच उर्जा, उद्योग व खाणकाम, परिवहन, सामान्य आर्थिक सेवा व सामान्य सेवा या बिगरगाभा क्षेत्रासाठी विभागांच्या मागणीनुसार निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. परिस्थितीनुसार या विभागांसाठी निधी उपलब्ध केला जाईल. याशिवाय टंचाई, नैसर्गिक आपत्ती जलयुक्त शिवार यासाठी विशेष निधी देण्यात आला असल्याचे पालकमंत्री मुंडे यांनी सांगितले. चालू वर्षातील खर्चाचा आढावा२०१६-१७ या चालू वर्षात विविध योजनांच्या खर्चाचा आढावा यावेळी घेण्यात आला. यामध्ये डिसेंबर २०१६ अखेर सर्वसाधारण योजनेचा ६८.९८ टक्के, अनुसूचित जाती उपयोजनेचा ३९.११ टक्के व आदिवासी उपयोजनाबाह्य क्षेत्र योजनेचा ३९.४० टक्के एवढा निधी खर्च झाला असल्याची माहिती देण्यात आली.पुर्नर्विनियोजन प्रस्तावाला मान्यता...मागील बैठकीच्या इतिवृत्तावरील कार्यवाहीबाबत सविस्तर चर्चा करु न आढावा घेण्यात आला. आर्थिक वर्षातील सर्वसाधारण योजनेच्या ८ कोटी ८२ हजार आणि आदिवासी उपयोजना बाह्य क्षेत्राच्या २४ लक्ष ९९ हजार अशा एकूण ८ कोटी २५ लक्ष ८१ हजार रुपयांच्या बचत झालेल्या निधीच्या पुर्नर्विनियोजन प्रस्तावास या बैठकीत मान्यता देण्यात आली तसेच पूरपरिस्थितीमुळे नादुरुस्त झालेल्या ग्रामीण भागातील रस्त्यांच्या विकासासाठी जिल्हा प्रशासनाने आढावा घेऊन आराखडा मदत व पुनर्वसन विभागाकडे पाठवावा, अशी सूचना पालकमंत्र्यांनी केली. यावेळी नियोजन समिती सदस्यांनी विविध प्रश्न उपस्थित करुन लक्ष वेधले. पालकमंत्र्यांनीही या संदर्भात खुलासे करुन तातडीच्या उपाययोजना करण्याबाबतच्या सूचना दिल्या. (प्रतिनिधी)