शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
2
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
3
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
4
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
5
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
7
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
8
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
9
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
10
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
11
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
12
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
13
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
14
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
15
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
16
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
17
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
18
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
19
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
20
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

कर्मचाऱ्यांच्या हिताचीच भूमिका

By admin | Updated: May 24, 2016 01:19 IST

औरंगाबाद : मुख्य कार्यकारी अधिकारी हटाव, हा मुद्दा काही दुखावलेल्या कर्मचाऱ्यांनीच उपस्थित केला आहे. आपण आजपर्यंत नियमानुसारच कामे केलेली आहेत.

औरंगाबाद : मुख्य कार्यकारी अधिकारी हटाव, हा मुद्दा काही दुखावलेल्या कर्मचाऱ्यांनीच उपस्थित केला आहे. आपण आजपर्यंत नियमानुसारच कामे केलेली आहेत. सर्वसामान्य कर्मचाऱ्यांच्या हितासाठीच मी इथे बसलो आहे. यापुढेही सर्वांना न्याय देण्याचा माझा प्रयत्न असेल. कर्मचाऱ्यांना जाणीवपूर्वक त्रास देण्याचा माझा हेतू नाही आणि पुढेही असणार नाही, अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली. ‘सीईओ’ हटाव हा मुद्दा योग्य आहे का’ या वाक्यापासूनच मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चौधरी यांनी चर्चेला सुरुवात केली. ते आज दुपारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, नियमबाह्य कामे मी करीत नाही. त्यामुळे काही जण दुखावले असतील. त्यांनीच हा मुद्दा कळीचा करून कर्मचारी व शिक्षक संघटना वेठीस धरल्या आहेत. खरोखरच जिल्हा परिषदेत अनेक कर्मचारी तसेच शिक्षक चांगले आहेत. त्यांच्या संघटनाही चांगल्या आहेत. जाणीवपूर्वक कर्मचाऱ्याला त्रास देण्याचा माझा हेतू नाही. एखाद्या कर्मचाऱ्याने गंभीर स्वरुपाच्या चुका केल्या असतील, तर त्याच्यावर कारवाई करावीच लागेल. कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या वेळी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना सूट दिली नाही. संघटनेला शासन मान्यता असेल, तर तसे पत्र दाखवावे आणि बदलीमध्ये सवलत घ्यावी, असे आपण सर्वांना सांगितले होते. एकाही संघटनेच्या पदाधिकाऱ्याने संघटना शासन मान्य असल्याचे पत्र दिले नाही. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहायक श्याम भाले हे सांगतील, त्याच फायली निकाली काढल्या जातात, हा आरोप कर्मचारी- शिक्षक संघटनांनी केला आहे, याकडेही त्यांचे लक्ष वेधले असता, डॉ. चौधरी म्हणाले की, माझे स्वीय सहायक फक्त फायली ‘पूटअप’ करतात. त्यावर निर्णय मी घेत असतो.बालिशपणाचे आरोप करून त्यांना काय साध्य करायचे आहे हेच कळत नाही. मग, त्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करणार का, या प्रश्नावर सीईओ म्हणाले की, नाही. कारवाई केल्याने हे प्रश्न सुटणार आहेत का? काही दिवसानंतर त्यांना सद्बुद्धी येईल. आज शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया सुरू झाली. समायोजनानंतर बदल्या होतील. त्यानंतर पदोन्नतीची प्रक्रिया सुरू केली जाईल. शासन मान्य संघटना असल्याचे पत्र दाखविल्याशिवाय शिक्षक पदाधिकाऱ्यांनादेखील बदल्यांमध्ये सूट नाही. संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना बदलीमध्ये सूट देण्याबाबत २०१४ चा शासन निर्णय आहे. उच्च न्यायालयामध्येसुद्धा यासंबंधीची याचिका दाखल आहे. त्यामुळे शासनाची मान्यता नसेल, तर बदलीमध्ये सूट नाही. नाही तर उच्च न्यायालयाचाही अवमान होईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चौधरी म्हणाले. शिक्षक सेनेने ग्रामविकास विभागाचे एक पत्र आणले आहे, याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, त्यांनी शासन निर्णय आणला नाही, पत्र आणले आहे. त्यात शासन निर्णयाच्या अधीन राहून सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना समान न्याय देण्याचे नमूद केले आहे.