शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

बीपीएल रेशनकार्ड काढून देण्याच्या नावे लूट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:04 IST

औरंगाबाद : दारिद्र्य रेषेखालील रेशनकार्ड (बीपीएल) काढून देण्यासाठी सामान्य नागरिकांची सध्या लूट सुरू असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. सध्या ...

औरंगाबाद : दारिद्र्य रेषेखालील रेशनकार्ड (बीपीएल) काढून देण्यासाठी सामान्य नागरिकांची सध्या लूट सुरू असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. सध्या दारिद्र्य रेषेखालील पिवळे रंगाचे रेशनकार्ड मिळणे बंद आहे, असे पुरवठा विभागाने वारंवार स्पष्ट केलेले असताना काही वसाहतींमध्ये नागरिकांची कागदपत्रे आणि ठराविक रक्कम गोळा करण्याचा सपाटा सुरू झाला आहे. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने असा प्रकार असल्याचे सध्या तरी दिसते आहे. बीपीएल सर्व्हेनुसार अन्न योजनेनुसार धान्य पुरवठा केला जातो. याची यादी सर्व्हेनुसार असून आता नव्याने बीपीएलचे रेशनकार्ड देता येत नाही.

जिल्ह्यात १ हजार ८०१ स्वस्त धान्य दुकाने असून ७ लाख ३२ हजार ४४४ कार्डधारकांची संख्या आहे. यातील प्राधान्य कुटूुब, अंत्योदय अन्न योजना तसेच अंत्योदय योजनेतील शेतकरी असे एकूण ५ लाख ५१ हजार ८०२ कार्डधारक आहेत. जिल्ह्यात प्राधान्य कुटुंबातील शेतकरी खात्याची संख्या ७८ हजार २८०, अंत्योदय अन्न योजनेतील ६५ हजार ४८२ तर प्राधान्य कुटुंबातील ४ लाख ८ हजार ४० असे एकूण ५ लाख ५१ हजार ८०२ कार्डधारकांची संख्या आहे.

जिल्ह्यातील रेशनिंगची सद्यस्थिती अशी

जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकाने - १ हजार ८०१

एकूण रेशनकार्डधारक - ७ लाख ३२ हजार ४४४

पिवळे रेशनकार्डधारक - ६५ हजार ४८२

केशरी रेशनकार्डधारक - ४ लाख ८ हजार ४०

पांढरे रेशनकार्डधारक - ३ लाख २४ हजार ४०४

पुरवठा अधिकाऱ्यांनी केले आवाहन

पुरवठा अधिकारी दत्ता भारस्कर यांनी आवाहन केले की, बीपीएल अंतर्गत रेशनकार्ड देणे बंद आहे. त्यामुळे कोणत्याही भागात, कुणालाही नागरिकांनी कागदपत्रे आणि रक्कम देऊन कार्ड मिळण्याच्या प्रलोभनास बळी पडू नये. रेशनकार्डसाठी सेतू सुविधा केंद्रात येऊन नियमित अर्ज करण्याचे आवाहन त्यांनी केले.