शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
5
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
6
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
7
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
8
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
9
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
10
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
11
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
12
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
13
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
14
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
15
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
16
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
17
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
18
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
19
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
20
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?

रस्ते गुळगुळीत करणार

By admin | Updated: June 27, 2016 01:08 IST

औरंगाबाद : स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या औरंगाबाद शहरातील काही प्रमुख रस्ते गुळगुळीत करून देण्याची तयारी रस्ते विकास महामंडळाने दर्शविली आहे

औरंगाबाद : स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या औरंगाबाद शहरातील काही प्रमुख रस्ते गुळगुळीत करून देण्याची तयारी रस्ते विकास महामंडळाने दर्शविली आहे. सुमारे २०० कोटी रुपयांपर्यंतचे रस्ते महामंडळाने करून द्यावेत यासाठी मनपा प्रशासन तयारी करीत आहे. यासंदर्भातील अंतिम प्रस्ताव लवकरच महामंडळाला सादर करण्यात येणार असल्याचे मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी सांगितले.मागील २५ ते ३० वर्षांमध्ये महापालिकेने शहरातील प्रमुख रस्त्यांकडे फारसे लक्ष दिले नाही. दरवर्षी नगरसेवक आपल्याच वॉर्डातील रस्ते कसे गुळगुळीत होतील यावर भर देत आले. अंतर्गत रस्त्यांवर मनपाने आजपर्यंत कोट्यवधी रुपये खर्च केले. प्रमुख रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. मोठे रस्ते गुळगुळीत आणि दर्जेदार तयार करण्यासाठी मनपाकडे फारसा निधी नाही. एकात्मिक रस्ते विकास योजनेत रस्ते विकास महामंडळाने मागील १५ वर्षांमध्ये अनेक विकासाची कामे केली. सर्वात अगोदर रेल्वेस्टेशन येथील उड्डाणपूल उभारण्यात आला. त्यानंतर टाऊन हॉल, सेव्हन हिल, क्रांतीचौक, सिडको बसस्थानक चौक, महावीर चौक येथे उड्डाणपूल उभारण्यात आले. दहा वर्षांपूर्वी रस्ते विकास महामंडळाने सेव्हन हिल ते गजानन महाराज मंदिर रोड, अशा अनेक रस्त्यांची कामेही केली. सध्या शहरात कामे करण्यासाठी रस्ते विकास महामंडळाकडे काम नाही.1शहराची लाईफलाईन असलेल्या जालना रोडचा विकासही नॅशनल हायवेकडून करण्यात येणार आहे. सध्या जालना रोड कुठे ३० मीटर तर कुठे ३५ मीटर आहे. शहर विकास आराखड्यानुसार जालना रोड ४५ मीटर रुंद ठेवण्यात येणार आहे. 2जालना रोड किमान आठपदरी करण्याच्या दृष्टीने मनपाच्या नगररचना विभागाने तयारी सुरू केली आहे. मागील महिन्यात अनेक ठिकाणी मार्किंगही करण्यात आली. सुमारे ४० ते ५० कोटी रुपये खर्च करून महावीर चौक ते केम्ब्रिज स्कूलपर्यंत रस्ता विकसित करण्यात येणार आहे. नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनीही या कामासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. शहरात खराब रस्त्यांमुळे पर्यटक, उद्योजक, व्यावसायिक यांच्यासमोर मनपाची प्रतिमा मलीन होत आहे. शहरातील मोठे रस्ते चांगले गुळगुळीत करून त्यात सौंदर्यीकरणाची भर घालण्याचा विचार मनपा करीत आहे. रेल्वेस्टेशन ते हर्सूल टी पॉइंट हा रस्ता महामंडळाला तयार करण्यासाठी द्यावा. ४रस्त्याच्या दोन्ही बाजूने फुटपाथ असावेत, सायकलिंगसाठी जागा असावी, अशी कल्पना मनपाने मांडली आहे. याशिवाय आणखी काही रस्त्यांची निवड करून रस्ते विकास महामंडळाला प्रस्ताव देण्यात येणार आहे. शहरातील काही महत्त्वाच्या जागा द्याव्यात, अशी मागणी रस्ते विकास महामंडळाने केली आहे. या जागांवर व्यावसायिक इमारती उभारून काही आर्थिक उत्पन्न मनपाला देण्यात येईल. मात्र, मनपाकडे अशा जागाच उपलब्ध नाहीत, असे सांगण्यात येत आहे. यापूर्वी मनपाने बीओटीवर अनेक जागा खाजगी व्यावसायिकांना देऊन टाकल्या आहेत.