शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते गुळगुळीत करणार

By admin | Updated: June 27, 2016 01:08 IST

औरंगाबाद : स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या औरंगाबाद शहरातील काही प्रमुख रस्ते गुळगुळीत करून देण्याची तयारी रस्ते विकास महामंडळाने दर्शविली आहे

औरंगाबाद : स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या औरंगाबाद शहरातील काही प्रमुख रस्ते गुळगुळीत करून देण्याची तयारी रस्ते विकास महामंडळाने दर्शविली आहे. सुमारे २०० कोटी रुपयांपर्यंतचे रस्ते महामंडळाने करून द्यावेत यासाठी मनपा प्रशासन तयारी करीत आहे. यासंदर्भातील अंतिम प्रस्ताव लवकरच महामंडळाला सादर करण्यात येणार असल्याचे मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी सांगितले.मागील २५ ते ३० वर्षांमध्ये महापालिकेने शहरातील प्रमुख रस्त्यांकडे फारसे लक्ष दिले नाही. दरवर्षी नगरसेवक आपल्याच वॉर्डातील रस्ते कसे गुळगुळीत होतील यावर भर देत आले. अंतर्गत रस्त्यांवर मनपाने आजपर्यंत कोट्यवधी रुपये खर्च केले. प्रमुख रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. मोठे रस्ते गुळगुळीत आणि दर्जेदार तयार करण्यासाठी मनपाकडे फारसा निधी नाही. एकात्मिक रस्ते विकास योजनेत रस्ते विकास महामंडळाने मागील १५ वर्षांमध्ये अनेक विकासाची कामे केली. सर्वात अगोदर रेल्वेस्टेशन येथील उड्डाणपूल उभारण्यात आला. त्यानंतर टाऊन हॉल, सेव्हन हिल, क्रांतीचौक, सिडको बसस्थानक चौक, महावीर चौक येथे उड्डाणपूल उभारण्यात आले. दहा वर्षांपूर्वी रस्ते विकास महामंडळाने सेव्हन हिल ते गजानन महाराज मंदिर रोड, अशा अनेक रस्त्यांची कामेही केली. सध्या शहरात कामे करण्यासाठी रस्ते विकास महामंडळाकडे काम नाही.1शहराची लाईफलाईन असलेल्या जालना रोडचा विकासही नॅशनल हायवेकडून करण्यात येणार आहे. सध्या जालना रोड कुठे ३० मीटर तर कुठे ३५ मीटर आहे. शहर विकास आराखड्यानुसार जालना रोड ४५ मीटर रुंद ठेवण्यात येणार आहे. 2जालना रोड किमान आठपदरी करण्याच्या दृष्टीने मनपाच्या नगररचना विभागाने तयारी सुरू केली आहे. मागील महिन्यात अनेक ठिकाणी मार्किंगही करण्यात आली. सुमारे ४० ते ५० कोटी रुपये खर्च करून महावीर चौक ते केम्ब्रिज स्कूलपर्यंत रस्ता विकसित करण्यात येणार आहे. नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनीही या कामासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. शहरात खराब रस्त्यांमुळे पर्यटक, उद्योजक, व्यावसायिक यांच्यासमोर मनपाची प्रतिमा मलीन होत आहे. शहरातील मोठे रस्ते चांगले गुळगुळीत करून त्यात सौंदर्यीकरणाची भर घालण्याचा विचार मनपा करीत आहे. रेल्वेस्टेशन ते हर्सूल टी पॉइंट हा रस्ता महामंडळाला तयार करण्यासाठी द्यावा. ४रस्त्याच्या दोन्ही बाजूने फुटपाथ असावेत, सायकलिंगसाठी जागा असावी, अशी कल्पना मनपाने मांडली आहे. याशिवाय आणखी काही रस्त्यांची निवड करून रस्ते विकास महामंडळाला प्रस्ताव देण्यात येणार आहे. शहरातील काही महत्त्वाच्या जागा द्याव्यात, अशी मागणी रस्ते विकास महामंडळाने केली आहे. या जागांवर व्यावसायिक इमारती उभारून काही आर्थिक उत्पन्न मनपाला देण्यात येईल. मात्र, मनपाकडे अशा जागाच उपलब्ध नाहीत, असे सांगण्यात येत आहे. यापूर्वी मनपाने बीओटीवर अनेक जागा खाजगी व्यावसायिकांना देऊन टाकल्या आहेत.