शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

शहरातील रस्ते अंधारातच; प्रशासन निद्रिस्त

By admin | Updated: October 30, 2014 00:30 IST

औरंगाबाद :अंतर्गत राजकारण आणि ११२ कोटी रुपयांच्या पथदिव्यांच्या निविदेवर कोर्टाने ओढलेले ताशेरे. यामुळे शहरातील सर्व मुख्य रस्ते अंधारात गेले

औरंगाबाद : महापालिका प्रशासनाची बेफिकिरी, सत्ताधारी शिवसेना- भाजपा पदाधिकाऱ्यांमधील अंतर्गत राजकारण आणि ११२ कोटी रुपयांच्या पथदिव्यांच्या निविदेवर कोर्टाने ओढलेले ताशेरे. यामुळे शहरातील सर्व मुख्य रस्ते अंधारात गेले आहेत. प्रशासनातील जबाबदार अधिकारी पदाधिकाऱ्यांना जुमानत नाहीत. पथदिव्यांचे काम पाहणारी विनवॉक ही कंपनी पालिका प्रशासनाला दाद देत नाही, तर वॉर्डातील अंतर्गत पथदिव्यांचे काम करणारे कंत्राटदारही हताश झालेले आहेत. अशा सगळ्या कचाट्यात पथदिव्यांचा प्रकाश अडकला आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवरील पथदिवे दिवाळीतही बंद होते. ते अजून सुरू झालेले नाहीत. दिवाळीच्या सणात रस्ते अंधारातच होते. तरीही पथदिव्यांकडे पालिका दुर्लक्ष करीत आहे. पथदिव्यांसाठी ११२ कोटी रुपयांतून बीओटीवर मनपाने कंत्राट दिले होते. त्या कंत्राटात अनेक त्रुटी असल्यामुळे कोर्टाने त्यावर ताशेरे ओढले आहेत. ११२ कोटी रुपयांचे कंत्राट इलेक्ट्रॉन लायटिंग सिस्टीम्स प्रा.लि. आणि पॅरागॉन केबल इंडिया या संस्थेला दिले होती. त्या कंपनीने आता सर्वाेच्च न्यायालयात धाव घेतली आहे. जुन्या विनवॉक कंपनीकडून सर्व पथदिवे सुरू करून घेतल्यानंतरच वरील कंपनी काम सुरू करील. ११ नोव्हेंबरपर्यंत विनवॉक कंपनीला मुदत दिली आहे. मात्र, ती कंपनीही काम करीत नाही. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे बंद पथदिव्यांकडे कुणाचेही लक्ष नाही. पदाधिकारी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात होते, तर अधिकारी निवडणुकीच्या कामात होते.जालना रोड, एन-५, बजरंग चौक ते बळीराम पाटील चौक, औरंगपुरा ते बाराभाई ताजिया, शहागंज ते सिटीचौक, टिळकपथ ते गुलमंडी, निराला बाजार ते जि.प. मैदानापर्यंत या मुख्य रस्त्यांवरील अनेक पथदिवे बंद आहेत, तसेच पुंडलिकनगर ते गजानन महाराज मंदिर ते शिवाजी चौक, एन-११, एन-१२, सिडकोतील रस्त्यांवर पथदिवे बंद आहेत.