शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

शहरातील रस्ते अंधारातच; प्रशासन निद्रिस्त

By admin | Updated: October 30, 2014 00:30 IST

औरंगाबाद :अंतर्गत राजकारण आणि ११२ कोटी रुपयांच्या पथदिव्यांच्या निविदेवर कोर्टाने ओढलेले ताशेरे. यामुळे शहरातील सर्व मुख्य रस्ते अंधारात गेले

औरंगाबाद : महापालिका प्रशासनाची बेफिकिरी, सत्ताधारी शिवसेना- भाजपा पदाधिकाऱ्यांमधील अंतर्गत राजकारण आणि ११२ कोटी रुपयांच्या पथदिव्यांच्या निविदेवर कोर्टाने ओढलेले ताशेरे. यामुळे शहरातील सर्व मुख्य रस्ते अंधारात गेले आहेत. प्रशासनातील जबाबदार अधिकारी पदाधिकाऱ्यांना जुमानत नाहीत. पथदिव्यांचे काम पाहणारी विनवॉक ही कंपनी पालिका प्रशासनाला दाद देत नाही, तर वॉर्डातील अंतर्गत पथदिव्यांचे काम करणारे कंत्राटदारही हताश झालेले आहेत. अशा सगळ्या कचाट्यात पथदिव्यांचा प्रकाश अडकला आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवरील पथदिवे दिवाळीतही बंद होते. ते अजून सुरू झालेले नाहीत. दिवाळीच्या सणात रस्ते अंधारातच होते. तरीही पथदिव्यांकडे पालिका दुर्लक्ष करीत आहे. पथदिव्यांसाठी ११२ कोटी रुपयांतून बीओटीवर मनपाने कंत्राट दिले होते. त्या कंत्राटात अनेक त्रुटी असल्यामुळे कोर्टाने त्यावर ताशेरे ओढले आहेत. ११२ कोटी रुपयांचे कंत्राट इलेक्ट्रॉन लायटिंग सिस्टीम्स प्रा.लि. आणि पॅरागॉन केबल इंडिया या संस्थेला दिले होती. त्या कंपनीने आता सर्वाेच्च न्यायालयात धाव घेतली आहे. जुन्या विनवॉक कंपनीकडून सर्व पथदिवे सुरू करून घेतल्यानंतरच वरील कंपनी काम सुरू करील. ११ नोव्हेंबरपर्यंत विनवॉक कंपनीला मुदत दिली आहे. मात्र, ती कंपनीही काम करीत नाही. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे बंद पथदिव्यांकडे कुणाचेही लक्ष नाही. पदाधिकारी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात होते, तर अधिकारी निवडणुकीच्या कामात होते.जालना रोड, एन-५, बजरंग चौक ते बळीराम पाटील चौक, औरंगपुरा ते बाराभाई ताजिया, शहागंज ते सिटीचौक, टिळकपथ ते गुलमंडी, निराला बाजार ते जि.प. मैदानापर्यंत या मुख्य रस्त्यांवरील अनेक पथदिवे बंद आहेत, तसेच पुंडलिकनगर ते गजानन महाराज मंदिर ते शिवाजी चौक, एन-११, एन-१२, सिडकोतील रस्त्यांवर पथदिवे बंद आहेत.