शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांच्या पैशांना फुटल्या ‘वाटा’

By admin | Updated: November 19, 2014 01:01 IST

औरंगाबाद : शहरात फोर-जी सेवेचे केबल टाकण्यासाठी रिलायन्ससह इतर तीन कंपन्यांनी मनपाकडे परवानगीपोटी भरलेल्या ४० कोटी रुपयांना अनेक वाटा फुटल्यामुळे शहर पुन्हा खड्ड्यात गेले आहे.

औरंगाबाद : शहरात फोर-जी सेवेचे केबल टाकण्यासाठी रिलायन्ससह इतर तीन कंपन्यांनी मनपाकडे परवानगीपोटी भरलेल्या ४० कोटी रुपयांना अनेक वाटा फुटल्यामुळे शहर पुन्हा खड्ड्यात गेले आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये पर्यटननगरी खड्ड्यातून बाहेर काढण्यासाठी ‘लोकमत’ने जनआंदोलन उभारले होते. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने २१ कोटी ५० लाख आणि मनपाने ५२ कोटी रुपयांचे रस्ते हाती घेतले; मात्र या दोन्ही संस्थांनी नागरिकांचा पूर्णत: भ्रमनिरास केला असून, शहर पुन्हा खड्ड्यात गेले आहे. ५२ कोटी रुपयांची मनपाने हाती घेतलेली कामे अर्धवट पडली आहेत, तर बांधकाम विभागाची फक्त २ कोटी रुपयांची कामे झाली आहेत. आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये रिलायन्स कंपनीने दिलेल्या ४० कोटींचा चुराडा कुणावर व कुणाच्या आदेशाने केला यावरून सदस्यांनी आक्रमकपणे प्रशासनाची कोंडी केली. रस्त्यांसाठी ठेवलेली रक्कम कुठे खर्च झाली. कोणत्या कंत्राटदाराला त्यातून पैसे दिले. त्या कंत्राटदारांची कामे सुरू आहेत की बंद, याचा अहवाल तीन दिवसांत सादर करण्याचे आदेश सभापती विजय वाघचौरे यांनी प्रशासनाला दिले. काम न करणाऱ्या कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करण्याचा इशाराही त्यांनी दिला. मनपा निवडणुका जवळ आल्यामुळे आता नगरसेवकांनादेखील पालिकेची व शहराची साडेचार वर्षांत पहिल्यांदाच काळजी वाटल्याचे आज दिसून आले.नगरसेवक म्हणालेनगरसेवक काशीनाथ कोकाटे म्हणाले, २३ कोटी रुपये कंत्राटदारांना दिले तर मग ते काम करीत नाहीत. काम न करणाऱ्यांना पैसे दिल्याचे यातून दिसते आहे. मीर हिदायत अली म्हणाले, रस्ते, कामे, कंत्राटदार आणि दिलेली रक्कम अशी यादी लेखा विभागाने दिली पाहिजे. त्र्यंबक तुपे म्हणाले, ४० कोटी रस्त्यांवर खर्च न करता कुणाला दिले. नागरिकांना होणाऱ्या दुखापतींना मनपा जबाबदार आहे. सुरेंद्र कुलकर्णी, संजय चौधरी, अनिल जैस्वाल यांनीही शहर खड्ड्यात जाण्यास प्रशासन दोषी असल्याचा आरोप केला. नगरसेवक जहाँगीरखान म्हणाले, नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी वेळ पुरत नाहीय, त्यामुळे दाढी करायलादेखील जाता येत नाही. यावरून सभागृहात हास्यकल्लोळ झाला. यावर खान संतापून म्हणाले, माझ्यावर हसून काय उपयोग आहे? सगळे शहर पालिकेवर हसते आहे. नगरसेविका फिरदौस फातेमा, सत्यभामा शिंदे यांनीदेखील रस्ते खड्ड्यात गेल्यामुळे नागरिकांना यातना होत असल्याचे सांगितले. रस्ते लवकर होणे अवघड४आता रस्ते लवकर होणे अवघड असल्याचे शहर अभियंता एस.डी.पानझडे यांनी सांगितले, रस्ता खोदण्याच्या परवानगीतून ४० कोटी मिळाले होते. इलेक्ट्रिसिटी ड्यूटीतून ३० कोटी मिळाले होते. ही रक्कम समांतरच्या एएसओजी खात्यावर टाकावी, असे सुचविले होते. रस्त्यांच्या कामांसाठी ४० कोटींची रक्कम ठेवण्याचेही सांगितले होते. त्या रकमेच्या भरवशावरच ५२ कोटींची कामे हाती घेतली होती. आता व्हाईट टॉपिंगची कामे रखडली आहेत. या रस्त्यांच्या कामांना मुदतवाढ द्यावी लागणार आहे. लेखाधिकारी म्हणाले...४४० कोटी रस्त्यांसाठी वेगळे ठेवायचे असे सांगितले होते. २३ कोटी रुपये कंत्राटदारांना देण्यात आले आहेत. असे मुख्य लेखाधिकारी अशोक थोरात यांनी सांगितले. ४आजवर मनपाने १९५ कोटींचे उत्पन्न मिळविले असून त्यामध्ये १२ कोटींच्या रिलायन्सच्या रकमेचा समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले.