शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

शेतक-यांचा जालन्यात रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 00:16 IST

दैठणातील शेतक-यांच्या मृत्यूप्रकरणी संतप्त शेतकºयांनी आज रास्ता रोको शहरातील अंबड चौफुलीवर रास्ता रोको केला. महावितरण आणि अधिका-यांवर गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी शेतक-यांनी केलेल्या रास्तारोकोमुळे मार्गावरील वाहतूकी दीड तासांहून अधिक काळ ठप्प झाली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दैठणातील शेतक-यांच्या मृत्यूप्रकरणी संतप्त शेतकºयांनी आज रास्ता रोको शहरातील अंबड चौफुलीवर रास्ता रोको केला. महावितरण आणि अधिका-यांवर गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी शेतक-यांनी केलेल्या रास्तारोकोमुळे मार्गावरील वाहतूकी दीड तासांहून अधिक काळ ठप्प झाली होती. गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.घनसावंगी तालुक्यातील दैठणा शिवारात डिझेल पंप सुरु करताना तीन शेतकºयांचा गुदमरुन मृत्यू झाला होता. तर तीनजण गंभीर जखमी झाले. या घटनेचे आज तीव्र पडसाद उमटले. बुधवारी दैठण्यातील संतप्त शेतकºयांनी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास अंबड चौफुलीवर रास्तारोको आंदोलन सुरु केले. महावितरण व अधिकाºयांविरुध्द गुन्हे दाखल करुन संबंधिताना अटक करेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा आंदोलनकांनी घेतला.शेतकºयांच्या इशाºयाने पोलीस प्रशासनही भांबावून गेले. दरम्यान, जि. प. अध्यक्ष अनिरुध्द खोतकर, उपाध्यक्ष सतीश टोपे, माजी आ. कैलास गोरंट्याल, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, संतोष मोहिते, अनिल घनवट यांच्यासह शेतकरी संघटनेचे आप्पासाहेब कदम, जगन्नाथ काकडे, अरविंद देशमुख, संतोष कºहाळे, अ‍ॅड. शैलेश देशमुख, अशोक भुतेकर, अशोक पडूळ आदी मंडळी चौफुलीवर दाखल झाली. आंदोलनकर्त्यांशी चर्चा करुन नेत्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे आणि पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांना निवेदन सादर केले. महावितरणच्या गलथान कारभारामुळे तीन शेतकºयांचा मृत्यू झाला असून, वीज पुरवठा सुरळीत असता तर ही घटना घडलीच नसती. त्यामुळे संबंधितांविरुध्द तात्काळ गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. शिष्टमंडळात जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुध्द खोतकर, माजी आ. कैलास गोरंट्याल, भास्कर अंबेकर यांचा समावेश होता.जिल्हाधिकाºयांशी चर्चा करुन शिष्टमंडळाने शेतकरºयांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. परंतू महावितरणच्या अधिकाºयांना अटक करण्याच्या भूमिकेवर आंदोलक ठाम होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी यांनी प्रकरणाच्या चौकशीनंतर कडक कारवाई केली जाईल, अशी ग्वाही दिली.त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दैठणा येथील घटनेत मृत्यू पावलेल्या शेतकºयांच्या वारसांना शासकीय नोकरीत समाविष्ट करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.सदरील घटनेत बाबासाहेब बापूराव वाबळे (५५), रामेश्वर बाबासाहेब वाबळे (२८) व अर्जुन साहेबराव धांडे या तिघांचा मृत्यू झाला. तर परमेश्वर बाबासाहेब वाबळे, अशोक बापूराव वाबळे हे बेशुद्ध झाले होते.