शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

शेतक-यांचा जालन्यात रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 00:16 IST

दैठणातील शेतक-यांच्या मृत्यूप्रकरणी संतप्त शेतकºयांनी आज रास्ता रोको शहरातील अंबड चौफुलीवर रास्ता रोको केला. महावितरण आणि अधिका-यांवर गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी शेतक-यांनी केलेल्या रास्तारोकोमुळे मार्गावरील वाहतूकी दीड तासांहून अधिक काळ ठप्प झाली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दैठणातील शेतक-यांच्या मृत्यूप्रकरणी संतप्त शेतकºयांनी आज रास्ता रोको शहरातील अंबड चौफुलीवर रास्ता रोको केला. महावितरण आणि अधिका-यांवर गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी शेतक-यांनी केलेल्या रास्तारोकोमुळे मार्गावरील वाहतूकी दीड तासांहून अधिक काळ ठप्प झाली होती. गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.घनसावंगी तालुक्यातील दैठणा शिवारात डिझेल पंप सुरु करताना तीन शेतकºयांचा गुदमरुन मृत्यू झाला होता. तर तीनजण गंभीर जखमी झाले. या घटनेचे आज तीव्र पडसाद उमटले. बुधवारी दैठण्यातील संतप्त शेतकºयांनी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास अंबड चौफुलीवर रास्तारोको आंदोलन सुरु केले. महावितरण व अधिकाºयांविरुध्द गुन्हे दाखल करुन संबंधिताना अटक करेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा आंदोलनकांनी घेतला.शेतकºयांच्या इशाºयाने पोलीस प्रशासनही भांबावून गेले. दरम्यान, जि. प. अध्यक्ष अनिरुध्द खोतकर, उपाध्यक्ष सतीश टोपे, माजी आ. कैलास गोरंट्याल, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, संतोष मोहिते, अनिल घनवट यांच्यासह शेतकरी संघटनेचे आप्पासाहेब कदम, जगन्नाथ काकडे, अरविंद देशमुख, संतोष कºहाळे, अ‍ॅड. शैलेश देशमुख, अशोक भुतेकर, अशोक पडूळ आदी मंडळी चौफुलीवर दाखल झाली. आंदोलनकर्त्यांशी चर्चा करुन नेत्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे आणि पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांना निवेदन सादर केले. महावितरणच्या गलथान कारभारामुळे तीन शेतकºयांचा मृत्यू झाला असून, वीज पुरवठा सुरळीत असता तर ही घटना घडलीच नसती. त्यामुळे संबंधितांविरुध्द तात्काळ गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. शिष्टमंडळात जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुध्द खोतकर, माजी आ. कैलास गोरंट्याल, भास्कर अंबेकर यांचा समावेश होता.जिल्हाधिकाºयांशी चर्चा करुन शिष्टमंडळाने शेतकरºयांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. परंतू महावितरणच्या अधिकाºयांना अटक करण्याच्या भूमिकेवर आंदोलक ठाम होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी यांनी प्रकरणाच्या चौकशीनंतर कडक कारवाई केली जाईल, अशी ग्वाही दिली.त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दैठणा येथील घटनेत मृत्यू पावलेल्या शेतकºयांच्या वारसांना शासकीय नोकरीत समाविष्ट करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.सदरील घटनेत बाबासाहेब बापूराव वाबळे (५५), रामेश्वर बाबासाहेब वाबळे (२८) व अर्जुन साहेबराव धांडे या तिघांचा मृत्यू झाला. तर परमेश्वर बाबासाहेब वाबळे, अशोक बापूराव वाबळे हे बेशुद्ध झाले होते.