शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
2
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
5
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
6
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
7
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
9
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
10
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
11
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
12
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
13
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
14
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
15
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
16
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
17
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
18
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
19
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
20
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी

राजकीय आरोपांत रस्त्यांचा धुराळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:03 IST

औरंगाबाद : राज्यातील सगळ्याच ठप्प पडलेल्या, संथगतीने सुरू असलेल्या रस्त्यांची कामे केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्या लेटरबॉम्बनंतर संशयाच्या भोवऱ्यात ...

औरंगाबाद : राज्यातील सगळ्याच ठप्प पडलेल्या, संथगतीने सुरू असलेल्या रस्त्यांची कामे केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्या लेटरबॉम्बनंतर संशयाच्या भोवऱ्यात आली आहेत. कामे कुणामुळे थांबली यावरून चर्चा सुरू झाली आहे. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून शिवसैनिकांमुळे रस्त्यांच्या कामांना ब्रेक लागला. त्यांना आवर घाला, अशा सूचना पत्रातून केल्यानंतर जिल्ह्यात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांना राजकीय लुडबुडीमुळे ब्रेक लागल्याचे वारंवार होत असलेले आरोप खरे आहेत की काय, अशी चर्चा सुरू आहे. या सगळ्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांमध्ये रस्त्यांचा धुराळा उडतो आहे. खड्डेयुक्त आणि अर्धवट रस्त्यांवरून जाताना वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे.

औरंगाबाद ते जळगाव

मागील चार वर्षांपासून औरंगाबाद ते जळगाव रस्त्याचे काम सुरू आहे. कंत्राटदार बदलूनही या कामाला गती मिळत नाही. १ हजार कोटींतून रस्ता एनएचएआयच्या राज्य कार्यालयाच्या देखरेखीतून करण्यात येत आहे. फुलंब्रीपर्यंत देखील या रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही.

औरंगाबाद ते धुळे

२०११ पासून साेलापूर - औरंगाबादमार्गे धुळे या राष्ट्रीय महामार्ग क्र. २११ चे काम सुरू आहे. औरंगाबाद ते कन्नडपर्यंत रस्त्याचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. १२०० कोटींहून अधिक कोटींची निविदा या कामासाठी आहे. मध्यंतरी टक्केवारी मागण्याच्या आरोपावरून या रस्त्याचे प्रकरण गाजले होते.

औरंगाबाद ते शिर्डी

औरंगाबाद ते शिर्डी हा तीसगाव मार्गे जाणारा रस्ता एनएच २११ मुळे दुरुस्तीसाठी हाती घेतलाच नाही. बांधकाम विभागाने मध्यंतरी या रस्त्याचे काम केले. दहेगावजवळ दोन कि.मी. रस्त्याचे काम मागील अनेक वर्षांपासून राजकीय खोडा आणल्यामुळे पूर्ण होत नाही.

औरंगाबाद ते पैठण

लिंक रोड ते पैठण या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम ८ वर्षांपासून रेंगाळलेले आहे. सुरुवातीला ३५० कोटींतून हा रस्ता करण्यात येणार होता. त्यानंतर एनएचएआयने ९०० कोटींतून काम करण्याच्या अनुषंगाने रस्त्याच्या डीपीआरचे काम हाती घेतले; परंतु अद्याप या रस्त्याच्या कामाला मुहूर्त लागलेला नाही.

भाजपाचे आरोप

शिवसेनेच्या मतदारसंघात ज्याठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. तेथेच कामांच्या अडचणी आहेत. शिवसैनिकांकडून कंत्राटदारांना चांगली वागणूक मिळत नाही. त्यामुळेच कामांना गती मिळत नाही. ते कशासाठी करतात, हे सगळ्यांनाच माहिती आहे.

संजय केणेकर, शहर जिल्हाध्यक्ष भाजपा

शिवसेनेचे पलटवार असा

जळगाव रस्त्याचे ३ ते ४ वर्षांपासून काम सुरू आहे. शिवसेनेने तेथे कंत्राटदारांना मदत केली; परंतु भाजपाच्या नेत्यांच्या जाचामुळे कंत्राटदार पळून गेला. हप्तेखोरीचा प्रकार शिवसैनिकांनी केलेला नाही. पैठण रोडचा तर काय घोळ चालू हे केंद्र शासनालाच माहिती आहे.

नरेंद्र त्रिवेदी, जिल्हाप्रमुख शिवसेना

काँग्रेसची भूमिका

केंद्रीय मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांऐवजी जीएसटीची थकीत रक्कम देण्यासाठी पंतप्रधानांना पत्र लिहावे. जेणेकरून राज्यातील ठप्प पडलेली कामे काही प्रमाणात का होईना सुरळीत होतील. राजकीय आरोप करण्यात काहीही तथ्य नाही. रस्त्याची कामे पैशांअभावी थांबलेली आहेत.

सुमेंध निमगावकर, काँग्रेस प्रदेश सचिव

डमी क्रमांक

१०७९