शहरं
Join us  
Trending Stories
1
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
4
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
5
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
6
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
7
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
8
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
9
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
10
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
11
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
12
"आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?
13
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
14
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
15
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
16
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
17
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
18
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
19
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
20
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले

नदीपात्र की डम्पिंग ग्राऊंड?

By admin | Updated: May 27, 2014 00:59 IST

जालना : शहरातून वाहणार्‍या सीना आणि कुंडलिका नद्यांच्या पात्रात प्रचंड प्रमाणात कचरा आणून टाकला जात असल्यामुळे या नद्या आहेत की डंपींग ग्राऊंड हा प्रश्नच पडला आहे.

जालना : शहरातून वाहणार्‍या सीना आणि कुंडलिका नद्यांच्या पात्रात प्रचंड प्रमाणात कचरा आणून टाकला जात असल्यामुळे या नद्या आहेत की डंपींग ग्राऊंड हा प्रश्नच पडला आहे. एकीकडे पर्यावरणप्रेमींकडून नद्या वाचविण्यासाठी विविधस्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत. गतवर्षी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन दोन्ही नद्यातील कचरा, झाडे आदी सफाई केली होती. परंतु आजघडीला दोन्ही नद्यांच्या पात्रात कचर्‍याचे ढिगार लागले आहेत. नद्याच्या काठांना अतिक्रमणांचा विळखा घातला आहे. गतवर्षी भीषण दुष्काळामुळे जालनेकरांना पाण्याची किंमत कळाली. त्यामुळेच जलसंवर्धनासाठी विविध सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला. घाणेवाडी जलसंरक्षण मंचाने येथील कुंडलिका नदीवर शिरपूर पॅटर्नचे बंधारे बांधण्याचे काम हाती घेतले. त्याचे परिणाम आज समोर आहेत. बंधारे तुडूंब भरलेले आहेतच. शिवाय पाच कि़मी.च्या परिसरातील पाणीपातळीत कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळेच गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी फारच कमी नागरिकांना पाण्याची टंचाई भासली. भविष्यात पाणीटंचाई भासू नये म्हणून आजही प्रयत्न होत आहेत. परंतु शाश्वत स्त्रोत असलेल्या दोन्ही नद्या आजही दुर्लक्षितच आहेत. दोन्ही नद्यांना नाल्या,गटाराचे स्वरूप आले आहे. परिसरातील नागरिक कचरा मोठ्या प्रमाणात नदीपात्रात आणून टाकण्यात येत आहे. त्यामुळे नद्यांचे पात्र उथळ, अरूंद होत आहे. पालिकेकडून सुशोभिकरण सोडाच पण पात्र प्रदूषित करण्यासाठी मोठा हातभार लावला जात आहे. पालिकेचे अनेक कर्मचारी बिनधास्त नदीपात्राचे डंपिंग ग्राऊंड करीत आहेत. नदीपात्रातील दोन्ही बाजंूना मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे. कायम दुर्गंधी असते. कचर्‍यासोबतच काटेरी झुडुपे, मोठी झाडे, कॅरिबॅगचा ढिग पडलेला आहे. नदीपात्रातही काठावरील वस्त्या, नगरांमधून सांडपाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे नद्यांचे पाणी प्रदूषित होत आहे. तसेच नद्यांना गटाराचे स्वरूप आले आहे. या परिसरात कायम दुर्गंधी पसरलेली आहे. सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत पात्रांची सफाई केली परंतु आज जैसेथे परिस्थिती असल्यामुळे पर्यावरणप्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. पालिकेने या प्रमुख जलस्त्रोतांचे जतन केल्यास पाणीटंचाई निर्माण होणार नाही. परिसरातील पाणीपातळीतही वाढ होईल, अशी आशा पर्यावरणप्रेमींतून व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी) शहराच्या दोन्ही बाजूला नदीपात्रांमध्ये अतिक्रमण झाले आहे. पाणी वाहून जाण्यास अडथळा येतो. काहीनी तर पक्के बांधकाम केल्याचेही दिसून येते. लाखो रुपये खर्च करुन घनकचरा प्रकल्प उभारण्यात आला. मात्र प्रकल्पाची अवस्था बिकट बनली आहे, प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुुरु झालेला नाही. प्रकल्पाचे तीन तेरा वाजले. नदीपात्रांमधून कचरा व पाणी प्रदूषित होण्याला नागरिकही तेवढेच जबाबदार आहेत. घरा-घरांमधून साठलेला कचरा प्लास्टीकच्या कॅरीबॅगमध्ये भरून या ठिकाणी आणून टाकण्यात येतो. त्यामुळे प्लास्टीकच्या पिशव्या ठिकठिकाणी अडकलेल्या दिसतात. नागरिकांनीही पर्यावरण व जलस्त्रोतांची काळजी घेण्याची गरज आहे. अशा प्रकारचा कचरा, प्लास्टीक पिशव्या या पात्रांत टाकू नये अशी अपेक्षा पर्यावरणप्रेमींकडून करण्यात येत आहे.