शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

शहरात सिमेंट संस्कृतीचा उदय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 00:58 IST

जनआंदोलनानंतर महापालिकेने शहरात जिकडे तिकडे दर्जेदार रस्त्यांची बांधणी सुरू केली. मागील चार वर्षांमध्ये तब्बल ३०० कोटींच्या रस्त्यांची कामे करण्यात आली. आणखी १५० कोटी रुपये खर्च करून लवकरच शहरातील ५० रस्ते गुळगुळीत करण्यात येणार आहेत.

मुजीब देवणीकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ऐतिहासिक औरंगाबाद शहरातील रस्त्यांची कीर्ती राष्टÑीय आणि आंतरराष्टÑीय पातळीवर पोहोचली होती. खड्ड्यांमुळे प्रचंड टीकेची झोड उठविण्यात येत होती. महापालिकेच्या कारभारावर प्रत्येक औरंगाबादकर मनातल्या मनात कुढत होते. औरंगाबादकरांचे हे दु:ख ‘लोकमत’ने ‘आता बस्स’या उपक्रमांतर्गत सर्वप्रथम मांडले. २३ सप्टेंबर २०१३ रोजी क्रांतीचौकात हजारोंच्या साक्षीने जनआंदोलन करण्यात आले. या जनआंदोलनानंतर महापालिकेने शहरात जिकडे तिकडे दर्जेदार रस्त्यांची बांधणी सुरू केली. मागील चार वर्षांमध्ये तब्बल ३०० कोटींच्या रस्त्यांची कामे करण्यात आली. आणखी १५० कोटी रुपये खर्च करून लवकरच शहरातील५० रस्ते गुळगुळीत करण्यातयेणार आहेत.१९८८ पासून २०१० पर्यंत महापालिकेत डांबर लॉबीचा बोलबाला होता. दरवर्षी कोट्यवधी रुपयांच्या रस्त्यांची कामे करण्यात येत असत.या कामांचा दर्जा एवढा निकृष्ट असायचा की, एका वर्षात रस्त्यांवर खड्डेच खड्डे पाहायला मिळायचे. अधिकारी, पदाधिकारी आणि कंत्राटदारांची युती एवढी घट्ट होती की ती तोडणे अशक्यप्राय होते. मनपाच्या या कारभाराचा फटका शहराच्या गुंतवणुकीवर, पर्यटनावर होत होता. औरंगाबाद शहराची सर्वत्र नाचक्की होत असायची. खड्ड्यांचे शहर अशी प्रतिमा शहराची तयार होत होती. शहरातील १५ लाख नागरिकांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत होता. ‘लोकमत’ने औरंगाबादकरांचे दु:ख लक्षात घेऊन खड्ड्यांच्या विरोधात ‘आता बस्स’या सदराखाली वृत्तमालिकाच प्रकाशित केली. या उपक्रमाला औरंगाबादकरांनी उदंड प्रतिसाद दिला.त्यांच्या मनातील दु:खाला ‘लोकमत’ने वाट मोकळी करून दिली होती. ‘लोकमत’वृत्तपत्र समूह एवढ्यावरच न थांबता ऐतिहासिक क्रांतीचौकात हजारो नागरिकांच्या साक्षीने जनआंदोलनही केले. त्यानंतर महापालिका खडबडून जागी झाली. शहरात हळूहळू डांबरी रस्त्यांची कामे बंद करण्यात आली. जिकडे तिकडे फक्त आणि फक्त सिमेंट रस्त्यांचीच कामे सुरू करण्यात आली. डांबरी रस्त्यांपेक्षा सिमेंट रस्त्यांवर खर्च जास्त असला तरी नागरिक, नगरसेवक सिमेंट रस्त्यांचीच आग्रही मागणी करू लागले. मागील चार वर्षांमध्ये मनपाने सुमारे ३०० कोटी रुपयांची कामे ११४ वॉर्डांमध्ये केली. अजूनही १०० कोटींची छोटी-छोटी कामे प्रस्तावित आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात या कामांचा समावेश करण्यात आला आहे.