शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
3
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
4
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
5
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
6
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
7
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
8
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
9
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
10
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
11
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
12
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
13
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
14
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
15
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
16
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
17
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
18
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
19
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
20
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम

शहरात सिमेंट संस्कृतीचा उदय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 00:58 IST

जनआंदोलनानंतर महापालिकेने शहरात जिकडे तिकडे दर्जेदार रस्त्यांची बांधणी सुरू केली. मागील चार वर्षांमध्ये तब्बल ३०० कोटींच्या रस्त्यांची कामे करण्यात आली. आणखी १५० कोटी रुपये खर्च करून लवकरच शहरातील ५० रस्ते गुळगुळीत करण्यात येणार आहेत.

मुजीब देवणीकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ऐतिहासिक औरंगाबाद शहरातील रस्त्यांची कीर्ती राष्टÑीय आणि आंतरराष्टÑीय पातळीवर पोहोचली होती. खड्ड्यांमुळे प्रचंड टीकेची झोड उठविण्यात येत होती. महापालिकेच्या कारभारावर प्रत्येक औरंगाबादकर मनातल्या मनात कुढत होते. औरंगाबादकरांचे हे दु:ख ‘लोकमत’ने ‘आता बस्स’या उपक्रमांतर्गत सर्वप्रथम मांडले. २३ सप्टेंबर २०१३ रोजी क्रांतीचौकात हजारोंच्या साक्षीने जनआंदोलन करण्यात आले. या जनआंदोलनानंतर महापालिकेने शहरात जिकडे तिकडे दर्जेदार रस्त्यांची बांधणी सुरू केली. मागील चार वर्षांमध्ये तब्बल ३०० कोटींच्या रस्त्यांची कामे करण्यात आली. आणखी १५० कोटी रुपये खर्च करून लवकरच शहरातील५० रस्ते गुळगुळीत करण्यातयेणार आहेत.१९८८ पासून २०१० पर्यंत महापालिकेत डांबर लॉबीचा बोलबाला होता. दरवर्षी कोट्यवधी रुपयांच्या रस्त्यांची कामे करण्यात येत असत.या कामांचा दर्जा एवढा निकृष्ट असायचा की, एका वर्षात रस्त्यांवर खड्डेच खड्डे पाहायला मिळायचे. अधिकारी, पदाधिकारी आणि कंत्राटदारांची युती एवढी घट्ट होती की ती तोडणे अशक्यप्राय होते. मनपाच्या या कारभाराचा फटका शहराच्या गुंतवणुकीवर, पर्यटनावर होत होता. औरंगाबाद शहराची सर्वत्र नाचक्की होत असायची. खड्ड्यांचे शहर अशी प्रतिमा शहराची तयार होत होती. शहरातील १५ लाख नागरिकांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत होता. ‘लोकमत’ने औरंगाबादकरांचे दु:ख लक्षात घेऊन खड्ड्यांच्या विरोधात ‘आता बस्स’या सदराखाली वृत्तमालिकाच प्रकाशित केली. या उपक्रमाला औरंगाबादकरांनी उदंड प्रतिसाद दिला.त्यांच्या मनातील दु:खाला ‘लोकमत’ने वाट मोकळी करून दिली होती. ‘लोकमत’वृत्तपत्र समूह एवढ्यावरच न थांबता ऐतिहासिक क्रांतीचौकात हजारो नागरिकांच्या साक्षीने जनआंदोलनही केले. त्यानंतर महापालिका खडबडून जागी झाली. शहरात हळूहळू डांबरी रस्त्यांची कामे बंद करण्यात आली. जिकडे तिकडे फक्त आणि फक्त सिमेंट रस्त्यांचीच कामे सुरू करण्यात आली. डांबरी रस्त्यांपेक्षा सिमेंट रस्त्यांवर खर्च जास्त असला तरी नागरिक, नगरसेवक सिमेंट रस्त्यांचीच आग्रही मागणी करू लागले. मागील चार वर्षांमध्ये मनपाने सुमारे ३०० कोटी रुपयांची कामे ११४ वॉर्डांमध्ये केली. अजूनही १०० कोटींची छोटी-छोटी कामे प्रस्तावित आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात या कामांचा समावेश करण्यात आला आहे.