शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

रिक्षा बंदचा फज्जा

By admin | Updated: March 22, 2016 01:33 IST

औरंगाबाद : मीटर सक्तीसह वाहतूक सुरळीत करण्याच्या नावाखाली पोलिसांनी घेतलेल्या विविध निर्णयाच्या विरोधात औरंगाबाद रिक्षाचालक-मालक कृती समितीतर्फे सोमवारपासून

औरंगाबाद : मीटर सक्तीसह वाहतूक सुरळीत करण्याच्या नावाखाली पोलिसांनी घेतलेल्या विविध निर्णयाच्या विरोधात औरंगाबाद रिक्षाचालक-मालक कृती समितीतर्फे सोमवारपासून तीनदिवसीय बंद पुकारण्यात आला; परंतु आधीच मीटर सक्तीमुळे हैराण झालेल्या रिक्षाचालकांनी पहिल्याच दिवशी या बंदला फारसा प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे शहरातील बहुतांश रस्त्यांवर प्रवाशांना घेऊन रिक्षा धावताना दिसून आल्या. रिक्षाचालकांच्या भूमिकेमुळे या बंदचा पहिल्या दिवशी फज्जा उडाल्याचे दिसून आले. बंदच्या नावाखाली रिक्षाचालकांनी सर्वसामान्य प्रवाशांकडून अतिरिक्त पैसे उकळून लूट केली.शहरात १५ मार्चपासून आॅटोरिक्षांसाठी ‘मीटर सक्ती’ करण्यात आली. मीटरशिवाय धावणाऱ्या रिक्षांवर पोलीस आणि आरटीओ कार्यालयाने कारवाईचा बडगा उगारला. परिणामी विनामीटरच्या रिक्षा शहरातून गायब झाल्या अन् सर्वसामान्यांचे हाल सुरू झाले. मीटर सक्तीबरोबरच गणवेश नसणे, तीनपेक्षा अधिक प्रवासी बसविणे, उजव्या बाजूला रॉड नसणे, परमिट नसणे आदी बाबींची तपासणी करून पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. मीटर सक्ती केल्यामुळे मीटरची दुरुस्ती करण्यासाठी रिक्षाचालकांची सर्व्हिस सेंटरवर गर्दी होत आहे. परंतु आठ-आठ दिवस उलटूनही मीटर दुरुस्त करून मिळत नाही. त्यातच सर्व्हिस सेंटर बंद ठेवून त्यास आणखी विलंब केला जात आहे. यामुळे रिक्षा उभी करावी लागत असून, उपासमारीची वेळ येत असल्याने शेकडो रिक्षाचालक (पान २ वर)मीटर सक्ती लागू करण्यात आल्यानंतर काही दिवसांपासून अनेक रिक्षाचालक नावाला मीटर टाकून सीटरप्रमाणे प्रवाशांची वाहतूक करीत आहेत. अशा वेळी मीटर सक्ती असल्याचे सांगून प्रवाशांकडून जादा पैसे उकळले जात आहेत. बंदला ७० टक्के प्रतिसाद मिळाला आहे. मोर्चामध्ये सहभागी होणाऱ्यांची संख्या कमी होती. काही रिक्षा रस्त्यांवरून धावत होत्या. त्याचे कारण वेगळे आहे. रिक्षातून चार प्रवासी वाहतुकीची परवानगी मिळाली पाहिजे. मीटर दुरुस्तीला वेळ लागत आहे. त्यामुळे मीटर सक्तीला मुदतवाढ द्यावी.-कॉ. बुद्धिनाथ बराळ, लाल बावटा रिक्षाचालक- मालक युनियन