शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
6
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
7
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
8
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
9
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
10
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
11
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
12
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
13
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
14
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
15
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
16
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
17
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
18
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
19
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
20
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 

रिक्षा बंदचा फज्जा

By admin | Updated: March 22, 2016 01:33 IST

औरंगाबाद : मीटर सक्तीसह वाहतूक सुरळीत करण्याच्या नावाखाली पोलिसांनी घेतलेल्या विविध निर्णयाच्या विरोधात औरंगाबाद रिक्षाचालक-मालक कृती समितीतर्फे सोमवारपासून

औरंगाबाद : मीटर सक्तीसह वाहतूक सुरळीत करण्याच्या नावाखाली पोलिसांनी घेतलेल्या विविध निर्णयाच्या विरोधात औरंगाबाद रिक्षाचालक-मालक कृती समितीतर्फे सोमवारपासून तीनदिवसीय बंद पुकारण्यात आला; परंतु आधीच मीटर सक्तीमुळे हैराण झालेल्या रिक्षाचालकांनी पहिल्याच दिवशी या बंदला फारसा प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे शहरातील बहुतांश रस्त्यांवर प्रवाशांना घेऊन रिक्षा धावताना दिसून आल्या. रिक्षाचालकांच्या भूमिकेमुळे या बंदचा पहिल्या दिवशी फज्जा उडाल्याचे दिसून आले. बंदच्या नावाखाली रिक्षाचालकांनी सर्वसामान्य प्रवाशांकडून अतिरिक्त पैसे उकळून लूट केली.शहरात १५ मार्चपासून आॅटोरिक्षांसाठी ‘मीटर सक्ती’ करण्यात आली. मीटरशिवाय धावणाऱ्या रिक्षांवर पोलीस आणि आरटीओ कार्यालयाने कारवाईचा बडगा उगारला. परिणामी विनामीटरच्या रिक्षा शहरातून गायब झाल्या अन् सर्वसामान्यांचे हाल सुरू झाले. मीटर सक्तीबरोबरच गणवेश नसणे, तीनपेक्षा अधिक प्रवासी बसविणे, उजव्या बाजूला रॉड नसणे, परमिट नसणे आदी बाबींची तपासणी करून पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. मीटर सक्ती केल्यामुळे मीटरची दुरुस्ती करण्यासाठी रिक्षाचालकांची सर्व्हिस सेंटरवर गर्दी होत आहे. परंतु आठ-आठ दिवस उलटूनही मीटर दुरुस्त करून मिळत नाही. त्यातच सर्व्हिस सेंटर बंद ठेवून त्यास आणखी विलंब केला जात आहे. यामुळे रिक्षा उभी करावी लागत असून, उपासमारीची वेळ येत असल्याने शेकडो रिक्षाचालक (पान २ वर)मीटर सक्ती लागू करण्यात आल्यानंतर काही दिवसांपासून अनेक रिक्षाचालक नावाला मीटर टाकून सीटरप्रमाणे प्रवाशांची वाहतूक करीत आहेत. अशा वेळी मीटर सक्ती असल्याचे सांगून प्रवाशांकडून जादा पैसे उकळले जात आहेत. बंदला ७० टक्के प्रतिसाद मिळाला आहे. मोर्चामध्ये सहभागी होणाऱ्यांची संख्या कमी होती. काही रिक्षा रस्त्यांवरून धावत होत्या. त्याचे कारण वेगळे आहे. रिक्षातून चार प्रवासी वाहतुकीची परवानगी मिळाली पाहिजे. मीटर दुरुस्तीला वेळ लागत आहे. त्यामुळे मीटर सक्तीला मुदतवाढ द्यावी.-कॉ. बुद्धिनाथ बराळ, लाल बावटा रिक्षाचालक- मालक युनियन