शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

दोनच प्रवासी नेणारे रिक्षाचालक : शहराची आम्हालाही काळजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:02 IST

जास्त प्रवासी नेणारे रिक्षाचालक : कुटुंबाला कसे सांभाळायचे ? किमान तीन प्रवासी हवे : दोन प्रवाशांच्या वाहतुकीतून इंधन खर्चही ...

जास्त प्रवासी नेणारे रिक्षाचालक : कुटुंबाला कसे सांभाळायचे ?

किमान तीन प्रवासी हवे : दोन प्रवाशांच्या वाहतुकीतून इंधन खर्चही निघत नसल्याची ओरड

औरंगाबाद : अंशत: लाॅकडाऊन पहिल्याच दिवशी गुरुवारी जालना रोडवर क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेऊन जाणाऱ्या रिक्षांचे प्रमाण काहीसे कमी राहिले. कारवाईची भीतीबरोबर कोरोना रोखण्याची आमचीही जबाबदारी म्हणून अनेकांनी दोनच प्रवासी नेण्यास प्राधान्य दिला, पण त्याच वेळी दोन प्रवाशांच्या वाहतुकीतून इंधन खर्चही निघत नाही. घर कसे चालवायचे, कुटुंब कसे सांभाळायचे? असा सवाल उपस्थित करीत काहींनी दोनपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक केली.

अंशत: लाॅकडाऊनदरम्यान रिक्षांमधून दोनच प्रवाशांची वाहतूक करता येणार आहे. दोनपेक्षा अधिक प्रवासी आणि मास्क नसेल तर कारवाईचा बडगा उगारला जाईल, अशा सक्त सूचना आरटीओ कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी रिक्षाचालकांना केल्या. रिक्षाचालकांनी मास्कचा वापर केला पाहिजे. रिक्षाचालकांनी, प्रवाशांनी मास्कचा वापर करावा, अशा सूचना आहेत. त्यानुसार गुरुवारी रिक्षाचालक आणि मास्कचा वापरत करताना दिसून आले. जालना रोड, रेल्वेस्टेशन, बसस्थानक परिसरात काही रिक्षाचालक दोनच प्रवाशांना घेऊन जात होते. त्यासाठी भाडे अधिक आकारले जात होते. काहींनी मात्र, कमी भाडे घेत अधिक प्रवासी वाहतूक सुरूच ठेवली होती.

-----

रिक्षाचालक म्हणाले...

रिक्षाचालक गणेश ठोले म्हणाले, दोन प्रवाशांच्या वाहतुकीतून इंधनाचा खर्चही निघत नाही. आधीच प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. किमान तीन प्रवाशांची वाहतूक करण्यास परवानगी मिळाली पाहिजे. आधीच्या लाॅकडाऊनच्या परिणामातून आता कुठे सावरत होतो. मात्र, आता पुन्हा नव्या लाॅकडाऊनमुळे दोन प्रवाशांची वाहतूक करण्याची सूचना आहे. याचाही फटका सहन करावा लागत असल्याचे काही रिक्षाचालकांनी म्हटले.

---

दोन दिवस सूचना, नंतर कारवाई

पहिलाच दिवस असल्याने कारवाईऐवजी रिक्षाचालकांना दोनच प्रवासी वाहतूक करण्यासंदर्भात सूचना करण्यास प्राधान्य दिला. दोन दिवसांनंतर अधिक प्रवासी वाहतूक करणार्या रिक्षांवर कारवाई केली जाईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मैत्रेवार म्हणाले.

----

जिल्ह्यातील एकूण रिक्षा- ३५,७८२

शहरात धावणाऱ्या- ३०,०००

रिक्षाचालकांची संख्या- ४५,०००