शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
5
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
6
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
7
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
8
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
9
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
10
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
11
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
12
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
13
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
14
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
15
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
17
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
18
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
19
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

पालकमंत्र्यांकडून टंचाईचा आढावा

By admin | Updated: July 14, 2014 01:03 IST

हिंगोली : जिल्ह्यात झालेल्या गारपिटीमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत, अशा तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त होताच सदरचे पंचनामे त्वरित करून शासनाकडे अहवाल पाठवावा.

हिंगोली : जिल्ह्यात झालेल्या गारपिटीमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत, अशा तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त होताच सदरचे पंचनामे त्वरित करून शासनाकडे अहवाल पाठवावा. तसेच पंचनामे करण्यात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करण्याची सूचना पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी केली.जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात आयोजित बैठकीमध्ये संभाव्य टंचाईसदृश्य परिस्थितीचा आढावा घेताना पालकमंत्री गायकवाड बोलत होत्या. खा. अ‍ॅड. राजीव सातव, आ. भाऊराव पाटील गोरेगावकर, आ. जयप्रकाश दांडेगावकर, विधान परिषद सदस्य रामराव वडकुते, जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. व्ही. बनसोडे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी पवार, जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर आदी उपस्थित होते. प्रा. गायकवाड म्हणाल्या की, जिल्ह्यात गारपिटीने नुकसान झालेला एकही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहू नये, याकरिता शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्यावर त्वरित पंचनामे करून सदरचा अहवाल शासनाकडे पाठवावा.तसेच प्रशासनाने जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या उपाययोजनांचा आराखडा तयार करून प्रत्येक गावाला पाणीपुरवठा व्हावा, याबाबत दक्षता घेण्याची सूचना प्रा. गायकवाड यांनी केली. टंचाईग्रस्त गावांची टँकर, खाजगी विहीर अथवा बोअरवेल अधिग्रहणांची मागणी आल्यास त्यावर तत्परतेने कार्यवाही करण्याचे आदेश संबंधितांना द्यावेत, असेही त्यांनी सांगितले.जिल्ह्यात पावसाअभावी खरिपाची ५० टक्के पिके गेलेली असून प्रशासनाने तसा अहवाल शासनाकडे पाठविण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी यावेळी केली. प्रारंभी जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम यांनी जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या पावसाची व टंचाईच्या भागात करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. तसेच जिल्ह्यात आॅगस्ट अखेरपर्यंत पाणीटंचाई भासणार नसल्याचे त्यांनी सांगितले.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पवार यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या क्षेत्राची माहिती दिली. यात जिल्ह्यात ९ हजार ८०१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून यापैकी ४ हजार ६०० हेक्टरवर कापूस व २ हजार ७८८ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरणी झालेली आहे. प्रशासनाने टंचाईच्या परिस्थितीची माहिती घेवून जिल्ह्यात झालेली पेरणी क्षेत्र, पावसाचे प्रमाण, पाण्याची सद्य:स्थिती याचा अहवाल आपल्याकडे द्यावा, याबाबतची बैठक मदत व पुनर्वसनमंत्री यांच्याकडे घेण्यात येईल, असे पालकमंत्री प्रा. गायकवाड यांनी सांगितले. (प्रतिनिधी)लोकप्रतिनिधी उपस्थितजिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात पालकमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी बैठकीत संभाव्य टंचाई- सदृश्य परिस्थितीचा आढावा घेतला.प्रशासनाने जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या उपाययोजनांचा आराखडा तयार करून प्रत्येक गावाला पाणीपुरवठा होण्याबाबत दक्षता घेण्याची सूचना दिली.जिल्ह्यात गारपिटीने नुकसान झालेला एकही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहू नये, या करिता शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्यावर त्वरित पंचनामे करून सदरचा अहवाल शासनाकडे पाठवावा.टंचाईग्रस्त गावांची टँकर, खाजगी विहीर अथवा बोअरवेल अधिग्रहणांची मागणी आल्यास त्यावर तत्परतेने कार्यवाही करण्याचे आदेश संबंधितांना द्यावेत, असेही प्रा.गायकवाड यांनी सांगितले.जिल्ह्यात पावसाअभावी खरिपाची ५० टक्के पिके गेलेली असून प्रशासनाने तसा अहवाल शासनाकडे पाठविण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी यावेळी केली.