शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांकडून टंचाईचा आढावा

By admin | Updated: July 14, 2014 01:03 IST

हिंगोली : जिल्ह्यात झालेल्या गारपिटीमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत, अशा तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त होताच सदरचे पंचनामे त्वरित करून शासनाकडे अहवाल पाठवावा.

हिंगोली : जिल्ह्यात झालेल्या गारपिटीमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत, अशा तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त होताच सदरचे पंचनामे त्वरित करून शासनाकडे अहवाल पाठवावा. तसेच पंचनामे करण्यात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करण्याची सूचना पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी केली.जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात आयोजित बैठकीमध्ये संभाव्य टंचाईसदृश्य परिस्थितीचा आढावा घेताना पालकमंत्री गायकवाड बोलत होत्या. खा. अ‍ॅड. राजीव सातव, आ. भाऊराव पाटील गोरेगावकर, आ. जयप्रकाश दांडेगावकर, विधान परिषद सदस्य रामराव वडकुते, जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. व्ही. बनसोडे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी पवार, जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर आदी उपस्थित होते. प्रा. गायकवाड म्हणाल्या की, जिल्ह्यात गारपिटीने नुकसान झालेला एकही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहू नये, याकरिता शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्यावर त्वरित पंचनामे करून सदरचा अहवाल शासनाकडे पाठवावा.तसेच प्रशासनाने जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या उपाययोजनांचा आराखडा तयार करून प्रत्येक गावाला पाणीपुरवठा व्हावा, याबाबत दक्षता घेण्याची सूचना प्रा. गायकवाड यांनी केली. टंचाईग्रस्त गावांची टँकर, खाजगी विहीर अथवा बोअरवेल अधिग्रहणांची मागणी आल्यास त्यावर तत्परतेने कार्यवाही करण्याचे आदेश संबंधितांना द्यावेत, असेही त्यांनी सांगितले.जिल्ह्यात पावसाअभावी खरिपाची ५० टक्के पिके गेलेली असून प्रशासनाने तसा अहवाल शासनाकडे पाठविण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी यावेळी केली. प्रारंभी जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम यांनी जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या पावसाची व टंचाईच्या भागात करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. तसेच जिल्ह्यात आॅगस्ट अखेरपर्यंत पाणीटंचाई भासणार नसल्याचे त्यांनी सांगितले.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पवार यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या क्षेत्राची माहिती दिली. यात जिल्ह्यात ९ हजार ८०१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून यापैकी ४ हजार ६०० हेक्टरवर कापूस व २ हजार ७८८ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरणी झालेली आहे. प्रशासनाने टंचाईच्या परिस्थितीची माहिती घेवून जिल्ह्यात झालेली पेरणी क्षेत्र, पावसाचे प्रमाण, पाण्याची सद्य:स्थिती याचा अहवाल आपल्याकडे द्यावा, याबाबतची बैठक मदत व पुनर्वसनमंत्री यांच्याकडे घेण्यात येईल, असे पालकमंत्री प्रा. गायकवाड यांनी सांगितले. (प्रतिनिधी)लोकप्रतिनिधी उपस्थितजिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात पालकमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी बैठकीत संभाव्य टंचाई- सदृश्य परिस्थितीचा आढावा घेतला.प्रशासनाने जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या उपाययोजनांचा आराखडा तयार करून प्रत्येक गावाला पाणीपुरवठा होण्याबाबत दक्षता घेण्याची सूचना दिली.जिल्ह्यात गारपिटीने नुकसान झालेला एकही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहू नये, या करिता शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्यावर त्वरित पंचनामे करून सदरचा अहवाल शासनाकडे पाठवावा.टंचाईग्रस्त गावांची टँकर, खाजगी विहीर अथवा बोअरवेल अधिग्रहणांची मागणी आल्यास त्यावर तत्परतेने कार्यवाही करण्याचे आदेश संबंधितांना द्यावेत, असेही प्रा.गायकवाड यांनी सांगितले.जिल्ह्यात पावसाअभावी खरिपाची ५० टक्के पिके गेलेली असून प्रशासनाने तसा अहवाल शासनाकडे पाठविण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी यावेळी केली.