शहरं
Join us  
Trending Stories
1
"सकाळी उठा, व्होटर डेलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
2
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
3
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
4
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
5
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
6
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
7
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
8
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
9
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
10
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
11
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
12
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
13
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
14
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
15
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
16
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
17
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
18
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
19
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
20
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल

कराचे साडेचौदा लाख ग्रामपंचायतीला परत द्या

By admin | Updated: June 16, 2014 01:17 IST

उस्मानाबाद : धाराशिव कारखान्याकडील कर म्हणून वसूल केलेल्या रक्कमेतील साडेचौदा लाख रूपये चोराखळी ग्रामपंचायतीला देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत़

उस्मानाबाद : धाराशिव कारखान्याकडील कर म्हणून वसूल केलेल्या रक्कमेतील साडेचौदा लाख रूपये चोराखळी ग्रामपंचायतीला देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत़ या निर्णयामुळे चोराखळी ग्रामपंचायतला मोठा निधी उपलब्ध होणार असून, याद्वारे गावातील विविध विकास कामे करण्यात येणार असल्याचे तत्कालीन सरपंच अ‍ॅड़ मिराजी मैंदाड यांनी सांगितले,याबाबत अ‍ॅड़मिराजी मैंदाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, कळंब तालुक्यातील चोराखळी गावच्या शिवारात धाराशिव साखर कारखान्याची निर्मिती झाल्यानंतर तत्कालीन सरपंच अ‍ॅड़ मिराजी मैंदाड यांनी मालमत्ता कर ग्रामपंचयतीला मिळावा, यासाठी पाठपुरावा सुरू केला होता़ पंचायत समितीपासून ते ग्रामविकास मंत्रालयस्तरावरही ग्रामपंचयतीच्या बाजूने निर्णय देण्यात आला होता़ तर तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी कारखान्याकडून २८ लाख,९८ हजार २७५ रूपये वसूल केले़ मात्र, कारखान्याने यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती़ त्यामुळे वसूल झालेली रक्कम जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यावर ठेवण्यात आली होती़ याबाबत औरंगाबाद खंडपीठाने वसूल रक्कमेपैकी ५० टक्के रक्कम चोराखळी ग्रामपंचायतीकडे जमा करण्याचे व उर्वरित रक्कम औरंगाबाद खंडपीठात जमा करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत़ याप्रकरणी ग्रामपंचायतच्या वतीने अ‍ॅड़ सुशात चौधरी, अ‍ॅड़सागर फटाळे यांनी, जिल्हा परिषदेकडून अ‍ॅड़प्रशांत दामा, अ‍ॅडग़णेश कोरे तर शासनाकडून व्ही़ए़शिंदे यांनी काम पाहिले़ या प्रकरणाची अंतीम सुनावणी २१ जून रोजी होणार असल्याचेही अ‍ॅड़मैंदाड यांनी सांगितले़ दरम्यान, या निधीमुळे गावातील विकास कामे करण्यास मदत होणार असल्याचे म्हटले जात आहे़ (प्रतिनिधी)