शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
2
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
3
युद्धबंदीनंतर पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
4
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
5
'युद्धबंदीचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
6
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
7
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
8
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
9
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
10
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
11
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
12
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धबंदीनंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
13
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
14
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
15
'आम्हाला तिसऱ्या पक्षाची...', ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर
16
पाकिस्तानचे अपयश उघड! बिकानेरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र बूस्टर, नोज कॅप सापडले
17
तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचेत? गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत ३ बेस्ट पर्याय
18
बोरीवलीच्या नँसी व सुकरवाडी एसटी डेपोसाठी ३ महिन्यांत निविदा काढणार; परिवहन मंत्री सरनाईकांची घोषणा
19
चौकारांच्या हॅटट्रिकसह स्मृती मानधनाने साजरी केली विक्रमी सेंच्युरी!
20
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले

‘सीबीएसई’ १२वीचा निकाल जाहीर

By admin | Updated: May 22, 2016 00:40 IST

औरंगाबाद : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) बारावीचा निकाल शनिवारी दुपारी आॅनलाईन जाहीर झाला. यंदाच्या निकालातही पुन्हा एकदा मुलींनीच बाजी मारली.

औरंगाबाद : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) बारावीचा निकाल शनिवारी दुपारी आॅनलाईन जाहीर झाला. यंदाच्या निकालातही पुन्हा एकदा मुलींनीच बाजी मारली. १ मार्च ते २२ एप्रिल २०१६ या कालावधीत झालेली ही परीक्षा औरंगाबादेतील जवळपास अडीचशे ते तीनशे विद्यार्थ्यांनी दिली होती. शहरातील जैन इंटरनॅशनल, रेव्हरडेल स्कूल, स्टेपिंग स्टोन, केंद्रीय विद्यालय, नाथ व्हॅली, पोदार इंटरनॅशनल आणि पद्मश्री शंकरबापू आपेगावकर स्कूल या शाळांनी यशाची परंपरा यंदाही कायम राखली आहे. दुपारी १२ वाजता आॅनलाईन निकाल जाहीर होताच संबंधित शाळांचे प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक या सर्वांनी एकाच वेळी इंटरनेटवर निकाल पाहण्याची घाई केली. त्यामुळे सातत्याने निकालाची वेबसाईट हँग होत होती. वेबसाईटवर निकाल पाहताच यशस्वी विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. रेव्हरडेलचा शंभर टक्के निकालरेव्हरडेल शाळेने यंदाही बारावी परीक्षेत निकालाची यशस्वी परंपरा कायम राखली. या शाळेचे विद्यार्थी प्रीतम शिर्के आणि आदित्य सोनी यांनी ९३.४ टक्के गुण मिळवून प्रथम येण्याचा मान पटकावला. अभिनव बैद याने ९३.२ टक्के , सचित सहेगल याने ९२.६ टक्के आणि सुश्मिता देऊळगावकर हिने ९०.२० टक्के गुण मिळविले आहेत. या शाळेतील प्रीतम शिर्के, सचित सेहगल, सुश्मिता देऊळगावकर आणि अनुषा जेथवानी या विद्यार्थ्यांनी संगीत शास्त्रात १०० पैकी १०० गुण मिळविले आहेत.नाथ व्हॅली स्कूलचा निकाल शंभर टक्के लागला आहे. वाणिज्य शाखेतून सिरत निऱ्ह हिने ९६.२ टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम येण्याचा मान मिळविला. दाऊम जंग आणि आरुष बोहरा ९५.६ टक्के गुण घेतले असून, ते दोघेही द्वितीय आले आहेत. विज्ञान शाखेतून अनंत काळे हा ९४.४ टक्के गुण घेऊन प्रथम आला. प्रभ्लीन बिंद्रा हिने ९४.२ टक्के गुण घेतले असून, ती द्वितीय, तर ९४ टक्के गुण घेऊन कोमल सोनवणे आणि जय थिरानी हे तृतीय आले आहेत. अमृता छटवाल आणि सिरत निऱ्ह या दोघींनी इंग्रजी विषयात सर्वाधिक ९७ गुण, अर्थशास्त्र विषयात श्रेया ग्रामले आणि रिधिमा लहरिया या दोघींनी ९७ आणि आयुष बोहरा याने गणित विषयात ९६ गुण प्राप्त केले आहेत. प्राचार्य रंजित दास यांनी यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले आहे.