शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

‘सीबीएसई’ १२वीचा निकाल जाहीर

By admin | Updated: May 22, 2016 00:40 IST

औरंगाबाद : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) बारावीचा निकाल शनिवारी दुपारी आॅनलाईन जाहीर झाला. यंदाच्या निकालातही पुन्हा एकदा मुलींनीच बाजी मारली.

औरंगाबाद : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) बारावीचा निकाल शनिवारी दुपारी आॅनलाईन जाहीर झाला. यंदाच्या निकालातही पुन्हा एकदा मुलींनीच बाजी मारली. १ मार्च ते २२ एप्रिल २०१६ या कालावधीत झालेली ही परीक्षा औरंगाबादेतील जवळपास अडीचशे ते तीनशे विद्यार्थ्यांनी दिली होती. शहरातील जैन इंटरनॅशनल, रेव्हरडेल स्कूल, स्टेपिंग स्टोन, केंद्रीय विद्यालय, नाथ व्हॅली, पोदार इंटरनॅशनल आणि पद्मश्री शंकरबापू आपेगावकर स्कूल या शाळांनी यशाची परंपरा यंदाही कायम राखली आहे. दुपारी १२ वाजता आॅनलाईन निकाल जाहीर होताच संबंधित शाळांचे प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक या सर्वांनी एकाच वेळी इंटरनेटवर निकाल पाहण्याची घाई केली. त्यामुळे सातत्याने निकालाची वेबसाईट हँग होत होती. वेबसाईटवर निकाल पाहताच यशस्वी विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. रेव्हरडेलचा शंभर टक्के निकालरेव्हरडेल शाळेने यंदाही बारावी परीक्षेत निकालाची यशस्वी परंपरा कायम राखली. या शाळेचे विद्यार्थी प्रीतम शिर्के आणि आदित्य सोनी यांनी ९३.४ टक्के गुण मिळवून प्रथम येण्याचा मान पटकावला. अभिनव बैद याने ९३.२ टक्के , सचित सहेगल याने ९२.६ टक्के आणि सुश्मिता देऊळगावकर हिने ९०.२० टक्के गुण मिळविले आहेत. या शाळेतील प्रीतम शिर्के, सचित सेहगल, सुश्मिता देऊळगावकर आणि अनुषा जेथवानी या विद्यार्थ्यांनी संगीत शास्त्रात १०० पैकी १०० गुण मिळविले आहेत.नाथ व्हॅली स्कूलचा निकाल शंभर टक्के लागला आहे. वाणिज्य शाखेतून सिरत निऱ्ह हिने ९६.२ टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम येण्याचा मान मिळविला. दाऊम जंग आणि आरुष बोहरा ९५.६ टक्के गुण घेतले असून, ते दोघेही द्वितीय आले आहेत. विज्ञान शाखेतून अनंत काळे हा ९४.४ टक्के गुण घेऊन प्रथम आला. प्रभ्लीन बिंद्रा हिने ९४.२ टक्के गुण घेतले असून, ती द्वितीय, तर ९४ टक्के गुण घेऊन कोमल सोनवणे आणि जय थिरानी हे तृतीय आले आहेत. अमृता छटवाल आणि सिरत निऱ्ह या दोघींनी इंग्रजी विषयात सर्वाधिक ९७ गुण, अर्थशास्त्र विषयात श्रेया ग्रामले आणि रिधिमा लहरिया या दोघींनी ९७ आणि आयुष बोहरा याने गणित विषयात ९६ गुण प्राप्त केले आहेत. प्राचार्य रंजित दास यांनी यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले आहे.