शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
2
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
3
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
4
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
5
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
6
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
7
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
8
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
9
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
10
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
11
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
12
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
13
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
14
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले
15
शेअर बाजार पुन्हा घसरला, सेन्सेक्स १४७ अंकांनी आपटला; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
16
Online Shopping Tips: ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक
17
Post Office Scheme: बँक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक
18
डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला!
19
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
20
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी

पुरवणी परीक्षेचा निकाल ३१ टक्के

By admin | Updated: August 25, 2016 01:01 IST

उस्मानाबाद : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल २४ आॅगस्ट रोजी जाहीर झाला.

उस्मानाबाद : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल २४ आॅगस्ट रोजी जाहीर झाला. या परीक्षेसाठी जिल्हाभरातील १ हजार ३३२ विद्यार्थी बसले असता ४२० जण उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेचे प्रमाण ३१.५३ टक्के एवढे आहे.दहावी, बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान होवू नये, म्हणून पुरवणी परीक्षा घेण्यात येते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने ९ ते २९ जुलै या कालावधीत पुरवणी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी जिल्हाभरातील १०७ कॉलेजमधून १ हजार ३४३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्ष परीक्षेला १ हजार ३३२ जण बसले. यामध्ये १ हजार ३८ पैकी १०३० मुले तर ३०५ पैकी ३०२ मुली अशा एकूण १ हजार ३३२ जणांनी परीक्षा दिली. सदरील परीक्षेचा आॅनलाईन निकाल २४ आॅगस्ट रोजी दुपारी १ वाजता जाहीर झाला असता केवळ ३१.५३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये २९९ मुले तर १२१ मुली अशा ४२० जणांचा समावेश आहे. पुरवणी परीक्षेतही मुलींचेच वर्चस्व असल्याचे दिसून येते. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ४०.७ टक्के तर मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण २८.०३ टक्के एवढे आहे. (प्रतिनिधी)