शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

नांदेड जिल्ह्याचा निकाल १९ टक्क््यांनी वाढला

By admin | Updated: June 18, 2014 01:29 IST

नांदेड : येथील केंब्रिज विद्यालयाची चारुशिला ब्रह्मानंद गिरी हिने ९९ टक्के गुण मिळवून लातूर विभागात अव्वल येण्याचा मान मिळविला आहे़

नांदेड : येथील केंब्रिज विद्यालयाची चारुशिला ब्रह्मानंद गिरी हिने ९९ टक्के गुण मिळवून लातूर विभागात अव्वल येण्याचा मान मिळविला आहे़आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार चारूशिलाचे गुण सर्वाधिक आहेत़ तर सचिन बाबुराव जाधव या विद्यार्थ्याने ९८़८० टक्के गुण मिळविले आहेत़ तसेच इंग्रजी माध्यमात सय्यद उबेद अली हा ९६़२० टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम आला़ आहे. याही वर्षी केंब्रिजने निकालाचा उच्चांक गाठला आहे़ दरम्यान, शालांत परीक्षेत नांदेड जिल्ह्याचा निकाल ७४़२९ टक्के लागला़ गत वर्षीच्या तुलनेत निकालाची टक्केवारी १८़८९ टक्क्यांनी वाढली आहे़ कॉपीमुक्ती अभियानानंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता उत्तरोत्तर वाढत असल्याचे टक्केवारीवरुन स्पष्ट होते़ बारावी परीक्षेपाठोपाठ दहावी परीक्षेतही टक्केवारीच्या बाबतीत मुलींचा वरचष्मा कायम राहिला़ जिल्ह्यातील ६२० शाळातून ३६ हजार ११८ विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेसाठी नोंदणी केली़ यापैकी ३५ हजार ८६७ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली़ एकुण २६ हजार ६४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले़ यात १४ हजार २२८ मुले तर १२ हजार ४१९ मुलींचा समावेश आहे़ मुले उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ७१़८२ तर मुलींचे प्रमाण ७७़३५ टक्के आहे़ दहावीसाठी ५८६ शाळांतून ७ हजार ८२७ विद्यार्थी पुनर्रप्रविष्ट होते़ यापैकी १०९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले़ पहिल्यांदाच दहावी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी ५ हजार २७ जण विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले़ ८ हजार १०५ विद्यार्थी प्रथम श्रेणी, १० हजार ३२४ द्वितीय श्रेणी तर ३ हजार १९१ विद्यार्थी सर्वसाधारण श्रेणीत उत्तीर्ण झाले़ जिल्ह्यातील १८ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला़ तर पाच शाळांचा निकाल शून्य टक्के लागला़ यात जि़प़ हायस्कूल, मुखेड, नुरजहाँ उर्दू माध्यमिक शाळा, नायगाव, जय महाराष्ट्र माध्यमिक विद्यालय रिसनगाव ता़ लोहा, जिल्हा परिषद मुलांचे हायस्कूल कंधार व संत ज्ञानेश्वर विद्यालय हंगिरगा ता़ उमरी या शाळांचा समावेश आहे़ तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ़ श्रीकर परदेशी यांनी चार वर्षापूर्वी जिल्ह्यात कॉपीमुक्ती अभियान राबविले़ परिणामी दहावी, बारावीच्या निकालात घसरण झाली़ गुणवत्तेला पर्याय नसल्याची बाब समोर आल्यावर विद्यार्थी जोमाने अभ्यासाला लागले़ त्यामुळे गुणवत्ता वाढीस लागली असून यात उत्तरोत्तर वाढ होत आहे़ २०१२ मध्ये दहावीचा निकाल ५३़७५ टक्के लागला़ २०१३ मध्ये ही आकडेवारी ५५़४० टक्क्यांवर पोहोचली़ २०१२ व १३ या वर्षात निकाल २ टक्क्यांनी वाढला़ यंदा दहावीच्या निकालात गतवर्षीच्या तुलनेत १८़८९ टक्क्यांची घसघसीत वाढ झाल्याचे दिसून येते़ विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण होणाऱ्यांत मुलांपेक्षा मुलींचे प्रमाण अधिक आहे़ विशेषत: ग्रामीण भागातील मुली गुणवत्तेच्या बाबतीत मुलांपेक्षा सरस ठरल्या आहेत़ (प्रतिनिधी)१८ शाळांचा १०० टक्के निकालजिल्ह्यातील १८ शाळांचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे़ शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळा पुढीलप्रमाणे-युनिव्हर्सल इंग्लिश माध्यमिक प्रशाला नांदेड, हजरत फातेमा कन्या विद्यालय नांदेड, सांदिपनी पब्लिक स्कूल, लिटल स्कॉलर्स पब्लिक स्कूल, होलिसीटी पब्लिक स्कूल, टायनी एंजल्स स्कूल, राजर्षी पब्लिक स्कूल, लीटल पावर कॉनव्हेंट स्कूल बिलोली, ज्ञानसरस्वती इंग्लिश स्कूल रामपूर, देगलूर, शांतीदूत जी़ पाटील माध्यमिक विद्यालय, खानापूर ता़ देगलूर, सरस विद्यालय इंग्रजी माध्यम मांडवी, कै़ प्रल्हादरावजी गरुड माध्यमिक विद्यालय इस्लापूर, श्री डी़ देशमुख मा़ विद्यालय, कंडाळा ता़ नायगाव, ब्लू बेल्स इंग्लिश स्कूल नायगाव या शाळांचा समावेश आहे़