शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
8
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
9
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
10
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
11
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
12
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
13
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
14
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
15
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
16
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
17
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
18
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
19
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
20
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश

दहावीचा निकाल लांबणार, बोर्डाकडून युद्धपातळीवर चुकांची दुरुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:05 IST

औरंगाबाद : दहावीचा निकाल भरताना शाळांकडून झालेल्या चुका, राहिलेल्या त्रुटी घेऊन अजूनही शाळांची रीघ बोर्डात लागली आहे. आतापर्यंत केवळ ...

औरंगाबाद : दहावीचा निकाल भरताना शाळांकडून झालेल्या चुका, राहिलेल्या त्रुटी घेऊन अजूनही शाळांची रीघ बोर्डात लागली आहे. आतापर्यंत केवळ ६० टक्के चुकांची दुरुस्ती बोर्डाकडून पूर्ण झाली असून, उर्वरित ४० टक्के त्रुटी, चुकांची दुरुस्ती युद्धपातळीवर सुरू आहे. निकाल सर्वंच विद्यार्थ्यांचा एकाच वेळी लागणार असल्याचे विभागीय परीक्षा मंडळाने स्पष्ट केले असून, चुकांच्या दुरुस्तीसाठी किती वेळ लागेल याचे उत्तर अद्यापतरी नाही. मात्र, ही प्रक्रिया वेळखाऊ असल्याने निकाल आणखी काही दिवस लांबणीवर पडण्याची शक्यता वरिष्ठ अधिकार्यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संगणकीय प्रणालीवर शाळांकडून दहावीच्या विद्यार्थ्यांच्या भरलेल्या निकालात चुकांचा भडिमार केला आहे. त्या चुकांची दुरुस्ती करताना नाकीनव आल्याने विभागीय शिक्षण मंडळाकडून पुढे तीन दिवसांची मुदतवाढ देण्याची विनंती केली. तोही काळ संपला. अद्याप काम पूर्ण झालेले नाही. ७ जुलैपासून दुरुस्त्या सुरू असून, आतापर्यंत केवळ ६० टक्केच चुकांची दुरुस्ती होऊ शकली आहे. अजूनही शाळांकडून राहिलेल्या त्रुटींचे प्रस्ताव येणे सुरूच आहे. प्रत्येक जिल्ह्यातून दीडशेहून अधिक शाळांतून दुरुस्तीचे प्रस्ताव आले असून, जिल्हानिहाय पाच कक्षामार्फत दुरुस्तीचे कामे सुरू असल्याचे सोमवारी दिसून आले.

इयत्ता नववी व दहावीच्या मूल्यांकनाच्या आधारे दहावीचा निकाल लागणार आहे. हा निकाल जून महिन्याच्या अखेरपर्यंत लागेल, असे सुरुवातीला सांगण्यात येत होते. त्यानंतर १५ जुलैपर्यंत निकाल लागेल, असे शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केले. मात्र, शाळांनी असंख्य चुका निकाल भरताना केल्या आहेत. त्यांची दुरुस्ती आणि तांत्रिक अडचणींमुळे प्रक्रिया आणखी वेळखाऊ होऊ शकते.

विभागीय शिक्षण मंडळात दहावीसाठी अर्ज केलेल्या १ लाख ७७ हजार ५७१ विद्यार्थ्यांपैकी २ हजार ५६० विद्यार्थ्यांचा निकाल अंतिम केलेला नाही. त्यात औरंगाबाद जिल्ह्यात ६०१ जणांच्या निकालाची निश्चिती झाली नाही, तर ९७ विद्यार्थ्यांचे निकाल अद्याप अपूर्ण आहेत. तर रीपिटर विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनातही गुणपत्रिकांच्या त्रुटी आहेत, असे विभागीय सचिव पुन्ने यांनी सांगितले.

-----

चुकांच्या दुरुस्तीनंतरच निकाल

शाळांनी दहावीच्या भरलेल्या निकालात असंख्य चुका आहेत. चुकांचे प्रकार वेगवेगळे आहेत. अजूनही दुरुस्तीचे प्रस्ताव शाळांकडून येतच आहेत. सर्वच विद्यार्थ्यांचा एकाच वेळी निकाल लावावे लागतील. त्यापूर्वी या दुरुस्त्या पूर्ण कराव्या लागणार आहे. त्याला किती वेळ लागले. हे सांगता येणार नाही. ६० टक्के काम झाले आहे. उर्वरित कामही सुरू आहे. राज्य मंडळाच्या निर्देशानुसार पुढील कार्यवाही होईल.

-सुगता पुन्ने, सचिव, विभागीय शिक्षण मंडळ, औरंगाबाद

----

जिल्हा -शाळा - विद्यार्थी

औरंगाबाद -९०४-६५,०११

जालना -३९८-३१,२९६

बीड-६५२-४२,५८८

परभणी -४२५-२८,४४०

हिंगोली -२१६-१६,२७६