शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
3
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
4
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
5
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
6
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
7
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
8
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
9
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
10
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
11
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
12
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
13
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
14
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
15
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
16
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
17
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
18
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
19
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
20
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  

अतिक्रमणांना मनपाच जबाबदार

By admin | Updated: September 15, 2015 00:36 IST

अशोक कारके , औरंगाबाद महापालिका प्रशासन आणि १३ लाख नागरिक गेल्या काही महिन्यांपासून ‘स्मार्ट औरंगाबाद’चे स्वप्न पाहत आहेत. याच स्वप्नातील औरंगाबादमध्ये

अशोक कारके , औरंगाबादमहापालिका प्रशासन आणि १३ लाख नागरिक गेल्या काही महिन्यांपासून ‘स्मार्ट औरंगाबाद’चे स्वप्न पाहत आहेत. याच स्वप्नातील औरंगाबादमध्ये आजघडीला अनेक समस्या आहेत. त्यातील मुख्य समस्या म्हणजे शहरातील अरुंद आणि खड्डेमय रस्ते. मनपाने याच अरुंद रस्त्यांपैकी जयभवानीनगर, शिवाजी चौक ते मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन रस्त्यांवरील अतिक्रमणांवर नुकतीच कारवाई केली आहे. या कारवाईत अनेकांची घरे भुईसपाट झाली आहेत. या मोहिमेनंतर प्रशासनाने ५० रस्त्यांची मार्किंग केली असून, याच पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने ‘शहरातील रस्त्यावरील अतिक्रमण आणि मनपाची कारवाई’ याविषयी सर्वेक्षण केले असता, या सर्वेक्षणात रस्त्यावरील ‘अतिक्रमणाला मनपाच जबाबदार’ असल्याचे मत ७६ टक्के औरंगाबादकरांनी व्यक्त केले आहे.महापालिकेने जयभवानीनगर, शिवाजी चौक ते मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन रस्त्यावरील अतिक्रमणे हटविली आहेत. याचदरम्यान न्यायालयाच्या आदेशाने महसूल विभागाने मकबरा परिसरातील रेणुकामातानगर येथेही कारवाई केली. त्यामध्ये हक्काची घरे असणाऱ्या नागरिकांना बेघर व्हावे लागले. यानंतर मनपाने शहरातील ५० रस्त्यांचे मार्किंग केले. या मार्किंगमध्ये अनेकांची घरे तुटणार हे निश्चित झाल्यामुळे शहरातील वातावरण चांगलेच ढवळले होते. याच पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणात ‘अतिक्रमणास जबाबदार असणाऱ्या भूखंड माफियांवर आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करावी’, असे मत ८० टक्के नागरिकांनी व्यक्त केले, तर मनपाच्या रस्ता रुंदीकरण मोहिमेला ६६ टक्के नागरिकांनी पाठिंबा दिला आहे. २४ टक्के नागरिकांनी मोहिमेशी सहमत नसल्याचे म्हटले आहे. १० टक्के नागरिकांनी काही प्रमाणात पाठिंबा असल्याचे सर्वेक्षणात मत व्यक्त केले आहे, तर शहरातील ‘अतिक्रमणाला मनपा प्रशासन जबाबदार आहे’, असे मत ७६ टक्के नागरिकांनी सर्वेक्षणात मांडले आहे, तर १८ टक्के नागरिकांनी मनपा जबाबदार नसल्याचे म्हटले.