शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
2
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
3
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
4
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
5
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
6
संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
7
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
8
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
9
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
10
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
11
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
12
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
13
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
14
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
15
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
16
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
17
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
18
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
19
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
20
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?

रुग्ण घरी गेला की जबाबदारी संपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:02 IST

औरंगाबाद : कोरोनाचे उपचार घेऊन घरी गेल्यानंतर पुढील ३ महिने खबरदारी घेणे गरजेचे आहे. कारण, घरी गेल्यानंतरही रुग्णांना त्रास ...

औरंगाबाद : कोरोनाचे उपचार घेऊन घरी गेल्यानंतर पुढील ३ महिने खबरदारी घेणे गरजेचे आहे. कारण, घरी गेल्यानंतरही रुग्णांना त्रास उद्भवण्याचा धोका असतो. परंतु, एकीकडे रुग्ण कोरोनामुक्त झाल्याचे समज करतात, दुसरीकडे कोरोना रुग्ण घरी गेला की, जबाबदारी संपली, अशी अवस्था प्रशासनाची आहे. परिणामी, गंभीर अवस्थेत अनेक रुग्ण परत येतात. प्रशासनाचा वॉच नसल्याने जिल्ह्यात पोस्ट कोविड रुग्ण वाऱ्यावर आहेत.

कोरोनाचे उपचार घेऊन घरी गेल्यानंतर काही रुग्णांना विविध दुखण्यांना सामोरे जावे लागते. अशा रुग्णांसाठी घाटी आणि जिल्हा रुग्णालयात पोस्ट कोविड ओपीडी सेवा सुरू करण्यात आली आहे. घरी गेल्यानंतर दम लागणे, थकवा, सांधेदुखी अशा त्रासाला अनेक रुग्णांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे रुग्णांना पुन्हा उपचाराची गरज भासते. परंतु भीतीपोटी अनेक रुग्ण वेळीच उपचार घेण्याकडे दुर्लक्ष करतात. शिवाय प्रशासनाकडूनही रुग्णांच्या प्रकृतीबाबत आढावाही घेतला जात नाही. त्यामुळे त्रास वाढल्यानंतरच रुग्ण रुग्णालय गाठतात. हा प्रकार रुग्णांच्या जीवावर बेतण्याचा आहे. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर म्हणाले, पोस्ट कोविड रुग्ण येण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. ज्यांना काही त्रास होतो, असेच रुग्ण येतात.

जिल्ह्यातील एकूण रुग्ण-४५, ३२२

बरे झालेले रुग्ण-४३,६१८

सध्या उपचार घेणारे रुग्ण-५०६

यांनी घ्यावी काळजी

- आयसीयूमध्ये उपचार घेतलेले कोविड रुग्ण.

-उपचार घेताना ऑक्सिजन द्यावा लागलेले रुग्ण.

-कोरोनातून बरे झालेले रुग्ण.

परत येण्याचे प्रमाण कमी

कोरोना रुग्ण परत रुग्णालयात येण्याचे प्रमाण खूप कमी आहे. महिन्याला एखाददुसरा रुग्ण येतो. प्रतिकारशक्ती कमी असलेले हे रुग्ण असतात. रुग्णांनी किमान ३ महिने रक्त पातळ होणारी औषधी सुरू ठेवली पाहिजे. चांगला आहार घेतला पाहिजे.

- डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य, मेडिसीन विभागप्रमुख, घाटी