शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
4
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
5
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
6
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
7
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
8
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
9
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
10
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
11
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
12
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
13
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
14
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
15
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
16
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
17
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
18
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
19
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
20
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी

रुग्ण घरी गेला की जबाबदारी संपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:02 IST

औरंगाबाद : कोरोनाचे उपचार घेऊन घरी गेल्यानंतर पुढील ३ महिने खबरदारी घेणे गरजेचे आहे. कारण, घरी गेल्यानंतरही रुग्णांना त्रास ...

औरंगाबाद : कोरोनाचे उपचार घेऊन घरी गेल्यानंतर पुढील ३ महिने खबरदारी घेणे गरजेचे आहे. कारण, घरी गेल्यानंतरही रुग्णांना त्रास उद्भवण्याचा धोका असतो. परंतु, एकीकडे रुग्ण कोरोनामुक्त झाल्याचे समज करतात, दुसरीकडे कोरोना रुग्ण घरी गेला की, जबाबदारी संपली, अशी अवस्था प्रशासनाची आहे. परिणामी, गंभीर अवस्थेत अनेक रुग्ण परत येतात. प्रशासनाचा वॉच नसल्याने जिल्ह्यात पोस्ट कोविड रुग्ण वाऱ्यावर आहेत.

कोरोनाचे उपचार घेऊन घरी गेल्यानंतर काही रुग्णांना विविध दुखण्यांना सामोरे जावे लागते. अशा रुग्णांसाठी घाटी आणि जिल्हा रुग्णालयात पोस्ट कोविड ओपीडी सेवा सुरू करण्यात आली आहे. घरी गेल्यानंतर दम लागणे, थकवा, सांधेदुखी अशा त्रासाला अनेक रुग्णांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे रुग्णांना पुन्हा उपचाराची गरज भासते. परंतु भीतीपोटी अनेक रुग्ण वेळीच उपचार घेण्याकडे दुर्लक्ष करतात. शिवाय प्रशासनाकडूनही रुग्णांच्या प्रकृतीबाबत आढावाही घेतला जात नाही. त्यामुळे त्रास वाढल्यानंतरच रुग्ण रुग्णालय गाठतात. हा प्रकार रुग्णांच्या जीवावर बेतण्याचा आहे. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर म्हणाले, पोस्ट कोविड रुग्ण येण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. ज्यांना काही त्रास होतो, असेच रुग्ण येतात.

जिल्ह्यातील एकूण रुग्ण-४५, ३२२

बरे झालेले रुग्ण-४३,६१८

सध्या उपचार घेणारे रुग्ण-५०६

यांनी घ्यावी काळजी

- आयसीयूमध्ये उपचार घेतलेले कोविड रुग्ण.

-उपचार घेताना ऑक्सिजन द्यावा लागलेले रुग्ण.

-कोरोनातून बरे झालेले रुग्ण.

परत येण्याचे प्रमाण कमी

कोरोना रुग्ण परत रुग्णालयात येण्याचे प्रमाण खूप कमी आहे. महिन्याला एखाददुसरा रुग्ण येतो. प्रतिकारशक्ती कमी असलेले हे रुग्ण असतात. रुग्णांनी किमान ३ महिने रक्त पातळ होणारी औषधी सुरू ठेवली पाहिजे. चांगला आहार घेतला पाहिजे.

- डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य, मेडिसीन विभागप्रमुख, घाटी