शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

रुग्ण घरी गेला की जबाबदारी संपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:02 IST

औरंगाबाद : कोरोनाचे उपचार घेऊन घरी गेल्यानंतर पुढील ३ महिने खबरदारी घेणे गरजेचे आहे. कारण, घरी गेल्यानंतरही रुग्णांना त्रास ...

औरंगाबाद : कोरोनाचे उपचार घेऊन घरी गेल्यानंतर पुढील ३ महिने खबरदारी घेणे गरजेचे आहे. कारण, घरी गेल्यानंतरही रुग्णांना त्रास उद्भवण्याचा धोका असतो. परंतु, एकीकडे रुग्ण कोरोनामुक्त झाल्याचे समज करतात, दुसरीकडे कोरोना रुग्ण घरी गेला की, जबाबदारी संपली, अशी अवस्था प्रशासनाची आहे. परिणामी, गंभीर अवस्थेत अनेक रुग्ण परत येतात. प्रशासनाचा वॉच नसल्याने जिल्ह्यात पोस्ट कोविड रुग्ण वाऱ्यावर आहेत.

कोरोनाचे उपचार घेऊन घरी गेल्यानंतर काही रुग्णांना विविध दुखण्यांना सामोरे जावे लागते. अशा रुग्णांसाठी घाटी आणि जिल्हा रुग्णालयात पोस्ट कोविड ओपीडी सेवा सुरू करण्यात आली आहे. घरी गेल्यानंतर दम लागणे, थकवा, सांधेदुखी अशा त्रासाला अनेक रुग्णांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे रुग्णांना पुन्हा उपचाराची गरज भासते. परंतु भीतीपोटी अनेक रुग्ण वेळीच उपचार घेण्याकडे दुर्लक्ष करतात. शिवाय प्रशासनाकडूनही रुग्णांच्या प्रकृतीबाबत आढावाही घेतला जात नाही. त्यामुळे त्रास वाढल्यानंतरच रुग्ण रुग्णालय गाठतात. हा प्रकार रुग्णांच्या जीवावर बेतण्याचा आहे. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर म्हणाले, पोस्ट कोविड रुग्ण येण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. ज्यांना काही त्रास होतो, असेच रुग्ण येतात.

जिल्ह्यातील एकूण रुग्ण-४५, ३२२

बरे झालेले रुग्ण-४३,६१८

सध्या उपचार घेणारे रुग्ण-५०६

यांनी घ्यावी काळजी

- आयसीयूमध्ये उपचार घेतलेले कोविड रुग्ण.

-उपचार घेताना ऑक्सिजन द्यावा लागलेले रुग्ण.

-कोरोनातून बरे झालेले रुग्ण.

परत येण्याचे प्रमाण कमी

कोरोना रुग्ण परत रुग्णालयात येण्याचे प्रमाण खूप कमी आहे. महिन्याला एखाददुसरा रुग्ण येतो. प्रतिकारशक्ती कमी असलेले हे रुग्ण असतात. रुग्णांनी किमान ३ महिने रक्त पातळ होणारी औषधी सुरू ठेवली पाहिजे. चांगला आहार घेतला पाहिजे.

- डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य, मेडिसीन विभागप्रमुख, घाटी