शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

रुग्ण घरी गेला की जबाबदारी संपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:02 IST

औरंगाबाद : कोरोनाचे उपचार घेऊन घरी गेल्यानंतर पुढील ३ महिने खबरदारी घेणे गरजेचे आहे. कारण, घरी गेल्यानंतरही रुग्णांना त्रास ...

औरंगाबाद : कोरोनाचे उपचार घेऊन घरी गेल्यानंतर पुढील ३ महिने खबरदारी घेणे गरजेचे आहे. कारण, घरी गेल्यानंतरही रुग्णांना त्रास उद्भवण्याचा धोका असतो. परंतु, एकीकडे रुग्ण कोरोनामुक्त झाल्याचे समज करतात, दुसरीकडे कोरोना रुग्ण घरी गेला की, जबाबदारी संपली, अशी अवस्था प्रशासनाची आहे. परिणामी, गंभीर अवस्थेत अनेक रुग्ण परत येतात. प्रशासनाचा वॉच नसल्याने जिल्ह्यात पोस्ट कोविड रुग्ण वाऱ्यावर आहेत.

कोरोनाचे उपचार घेऊन घरी गेल्यानंतर काही रुग्णांना विविध दुखण्यांना सामोरे जावे लागते. अशा रुग्णांसाठी घाटी आणि जिल्हा रुग्णालयात पोस्ट कोविड ओपीडी सेवा सुरू करण्यात आली आहे. घरी गेल्यानंतर दम लागणे, थकवा, सांधेदुखी अशा त्रासाला अनेक रुग्णांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे रुग्णांना पुन्हा उपचाराची गरज भासते. परंतु भीतीपोटी अनेक रुग्ण वेळीच उपचार घेण्याकडे दुर्लक्ष करतात. शिवाय प्रशासनाकडूनही रुग्णांच्या प्रकृतीबाबत आढावाही घेतला जात नाही. त्यामुळे त्रास वाढल्यानंतरच रुग्ण रुग्णालय गाठतात. हा प्रकार रुग्णांच्या जीवावर बेतण्याचा आहे. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर म्हणाले, पोस्ट कोविड रुग्ण येण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. ज्यांना काही त्रास होतो, असेच रुग्ण येतात.

जिल्ह्यातील एकूण रुग्ण-४५, ३२२

बरे झालेले रुग्ण-४३,६१८

सध्या उपचार घेणारे रुग्ण-५०६

यांनी घ्यावी काळजी

- आयसीयूमध्ये उपचार घेतलेले कोविड रुग्ण.

-उपचार घेताना ऑक्सिजन द्यावा लागलेले रुग्ण.

-कोरोनातून बरे झालेले रुग्ण.

परत येण्याचे प्रमाण कमी

कोरोना रुग्ण परत रुग्णालयात येण्याचे प्रमाण खूप कमी आहे. महिन्याला एखाददुसरा रुग्ण येतो. प्रतिकारशक्ती कमी असलेले हे रुग्ण असतात. रुग्णांनी किमान ३ महिने रक्त पातळ होणारी औषधी सुरू ठेवली पाहिजे. चांगला आहार घेतला पाहिजे.

- डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य, मेडिसीन विभागप्रमुख, घाटी